शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेची होणार चौकशी

By admin | Updated: October 18, 2015 00:40 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेद्वारा यंदा कर्जाचे पुनर्गठन न केल्याने शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला नसल्याचा मुद्दा गुरूवारी विभागीय आयुक्त कार्यालयात ...

पालकमंत्र्यांचे आदेश : कर्ज वाटपात अनियमितताअमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेद्वारा यंदा कर्जाचे पुनर्गठन न केल्याने शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला नसल्याचा मुद्दा गुरूवारी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी ताणून धरला. यावर पालकमंत्र्यांनी जिल्हा उपनिबंधकांना चौकशीचे आदेश दिले व अहवाल प्राप्त झाल्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन ना.प्रवीण पोटे यांनी दिले. शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाणाऱ्या जिल्हा सहकारी बँकेत यंदाच्या हंगामात कर्जवाटपात भेदभाव झाल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी डीपीसीच्या बैठकीत केला. जिल्हा बँकेला ५६३ कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना यंदा ३८३ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले व शासनाने हमी घेतलेल्या ९१ कोटी रुपयांची उचल केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळू शकले नाहीत. १८० कोटीचे कर्जवाटप अद्याप बाकी आहे. पुनर्गठनाच्या १३२ कोटींपैकी ९१ कोटींची उचल केली. त्यामुळे शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळू शकले नाही. शेतकरी हित साधले जात नसल्याने पालकमंत्र्यांनी या बँकेच्या चौकसीचे आदेश दिले. जिल्हा उपनिबंधक याची चौकसी करणार आहे व चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे पालकमंत्री पोटे यांनी डीपीसी बैठकीनंतर गुरुवारी सायंकाळी आयुक्त कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत सांगितले.जिल्हा नियोजन समितीच्या २१७ कोटी रुपयाच्या आराखड्यातील वितरित निधीचा योग्य विनियोग उर्वरित आर्थिक वर्षात केल्यासच त्यांना पुढील निधी देता येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)चौकसीला सामोरे जाण्यास तयार - बबलू देशमुखहा राजकीय स्टंट आहे. जिल्हा बँकेने १३२ कोटी रूपयांचे पुनर्गठन केले आहे. शासनाने उशिरा प्रक्रिया सुरू केली ज्यांची मागणी होती त्या शेतकऱ्यांचे पुनर्गठन केले आहे. ज्यांची मागणी नाही त्यांच्यावर जबरदस्ती कसी करणार? ज्या शेतकऱ्यांनी थकीत कर्ज भरले त्यांना अधिकचे कर्ज देण्यात आले. बँकेचे डिपॉझीट १३५० कोटी व कर्जाचा लक्ष्यांक ५६३ कोटी, ४४० कोटीचे यंदा करण्यात आले आहे. २०० कोटी ईतर कर्ज वाटप आहे. नाबार्ड व आरबीआयच्या निर्देशाने अन्य गुंतवणूक करण्यात आली ऐवढे झाल्यावर नवीन कर्ज देण्यासाठी पैसेच नाही. ३०० कोटीचे फिरते भांडवल आहे ते केव्हाही काढू शकतात. ५६३ कोटीचा लक्ष्यांक साधने शक्य नाही असे अधिकाऱ्यांनी यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. हे सरकार आल्यावर यापूर्वी ही चौकसी करण्यात आली. कुठल्याही चौकसीला सामोरे जाण्यास तयार आहो असे जिल्हा बँकेचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी सांगितले.