शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

इर्विनमध्ये डेंग्यूचे आणखी सात रुग्ण दाखल

By admin | Updated: July 26, 2014 23:51 IST

जुलै महिना सरता-सरता डेंग्यू आजाराने बाधित सात रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णलयात दाखल करण्यात आले. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा करते तरी काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रतिबंधात्मक उपायांची गरज : आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्हअमरावती : जुलै महिना सरता-सरता डेंग्यू आजाराने बाधित सात रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णलयात दाखल करण्यात आले. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा करते तरी काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या वर्षीपासून जिल्ह्यात डेंग्यू आजाराचा प्रभाव झपाट्याने वाढतोय. गेल्या वर्षी जिल्ह्यात डेंग्यूसदृश तापाने ८ ते १० जणांचे बळी घेतले होते. त्यामुळे डासांपासून निर्माण होणारे आजार वाढत असल्याचे चित्र आहे. विविध तापांचा प्रादुर्भाव होण्यास विशिष्ट ऋतुची मर्यादा राहिलेली नाही. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतुंमध्ये हे आजार डोके वर काढीत आहेत. यावरून डासांचा प्रादुर्भाव रोखण्साठी मुळात उपाययोजना करण्याची गरज आहे. नागरिकांनीदेखील आरोग्यविषयक सतर्कता बाळगल्यास या आजारांवर नियंत्रण मिळविता येते. ३० टक्क्यांनी वाढले डेंग्यू रुग्णकाही वर्षांत कीटकजन्य व जलजन्य आजारांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जगभरात डेंग्यू आजाराचा फैलाव झाला आहे. मागील पन्नास वर्षांत डेंग्यू आजारात ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेचा आहे. वाढते शहरीकरण, दुषित पाणी या आजारात भर टाकत आहे. डेंग्यू आजार डासांमुळे पसरतो. एडिस डासाच्या मादीमुळे डेंग्यूची लागण होते. हा डास स्वच्छ पाण्यामध्ये अंडी देवून आपली संख्या वाढवितो. तीव्र ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी, डोळ्याच्या खोबणीमध्ये दुखणे, अंगावर लासर पूरळ, तीव्र पोटदुखी, गंभीर रुग्णास रक्तस्त्राव असे डेंग्यूचे लक्षण आहे. डेंग्यू रुग्णांचा प्लेटलेट कमी झाल्याने होणाऱ्या रक्तस्त्रावामुळे आणि शॉकमुळे रुग्णांचा मृत्यूदेखील होतो. त्यामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखणे अत्यंत गरजेचे आहे. दीड वर्षात जिल्ह्यात १०० पेक्षा अधिक रुग्णांना हा आजार झाल्याने त्यांना उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामध्ये बहुतांश रुग्ण उपचाराने बरे झाले असून एक ते दोन रुग्ण दगावल्याचे सांगण्यात येते. दर महिन्यात डेंग्यूचे रुग्ण दाखल होत असून जुलै महिन्यात ७ रुग्णांची नोंद आहे. प्रशासन स्तरावर उपाययोजना केल्या जात असून नागरिकांनीही डासांची उत्पत्ती रोखणे गरजेचे आहे.