शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 
2
चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन
3
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
4
२२ खून, अनेक गुन्हे, वेशांतर करून रामललांच्या दर्शनाला गेला असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
5
हे आहेत लोकसभा निवडणूक लढवत असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून विस्फारतील डोळे  
6
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
7
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
8
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
9
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
10
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
11
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
12
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
13
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
14
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
15
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
16
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
17
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
18
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
19
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
20
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

अमरावती जिल्ह्यातल्या चिखली आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थिनीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 1:23 PM

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चिखलदरा तालुक्यातील चिखली येथील शासकीय आश्रमशाळेतील संवर्गाच्या विद्यार्थिनीचा शनिवारी रात्री धारणी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आदिवासींमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात मुख्याध्यापकासह संबंधित शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहेप्रीती साबुलाल कासदेकर (१०, रा. कारा) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. चिखली येथील शासकीय ...

ठळक मुद्देआजारी असताना पायी चालत गेली गावालाआदिवासींमध्ये संताप, गुन्हा दाखल करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चिखलदरा तालुक्यातील चिखली येथील शासकीय आश्रमशाळेतील संवर्गाच्या विद्यार्थिनीचा शनिवारी रात्री धारणी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आदिवासींमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात मुख्याध्यापकासह संबंधित शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहेप्रीती साबुलाल कासदेकर (१०, रा. कारा) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. चिखली येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत इयत्ता सहावीत शिकणारी प्रीती मागील सहा दिवसांपासून आजारी होती. शनिवारी सायंकाळी प्रकृती बिघडल्यानंतर ती दोन किलोमीटर अंतरावरील आपल्या गावी पायी गेली. प्रकृती खालावल्याने पालकांनी तिला हरिसाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथून धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु शनिवारी रात्री १२ वाजता तिचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी १२ वाजता तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्याध्यापक, अधीक्षक किंवा वर्गशिक्षकांपैकी तिच्याकडे कोणीच लक्ष दिले नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

संबंधितांवर गुन्हे दाखल कराप्रीती ही आजारी असतानाही सर्वांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले. त्यातच तिची प्रकृती जास्त खालावली आणि मृत्यू झाला असल्याचा आरोप करीत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पालकांसह आदिवासी गावकऱ्यांनी केली आहे. युवक काँग्रेसचे पंकज मोरे यांच्या नेतृत्वात सोमवारी प्रकल्प अधिकाऱ्यांसह संबंधितांना निवेदन दिले जाणार आहे.

शवविच्छेदन झालेच नाहीउपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना प्रीती मृतावस्थेतच तेथे दाखल झाल्याचे लेखी बयान वडील साबुलाल कासदेकर यांनी दिले. याशिवाय शवविच्छेदन न करण्याचेसुद्धा लिहून दिले. यामुळे शवविच्छेदन न करताच मध्यरात्री २ वाजता प्रीतीचा मृतदेह परिजनांच्या ताब्यात मृतदेह दिला, अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक हेमंत भिलावेकर यांनी दिली. त्यामुळे प्रीतीचा मृत्यू नेमका कशाने झाला, याचा खुलासा झालेला नाही. हरिसाल येथील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, प्रीतीला उपजिल्हा रुग्णालयात जिवंतच दाखल करण्यात आले होते. आता मृत्यूचे कारण शोधण्यासाठी न्यायालयाच्या आदेशावरूनच पुन्हा मृतदेह काढून शवविच्छेदन करावे लागणार, हे विशेष.चिखली शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यूची घटना दु:खद आहे. यासंदर्भात आपण संपूर्ण चौकशीचे आदेश दिले आहे. दोषींवर कारवाई करण्यात येईल.- राहुल कर्डिले, प्रकल्प अधिकारी, धारणी

टॅग्स :Deathमृत्यूStudentविद्यार्थी