शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सातबारा ‘आॅनलाईन’साठी ३० जून ‘डेडलाईन’

By admin | Updated: May 24, 2016 00:34 IST

संगणकीकृत सातबारा प्रक्रियेतील सर्व त्रुटी दूर करुन ३० जूनपर्यंत १०० टक्के सातबारे आॅनलाईन करण्याच्या सूचना शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

कर्जप्रक्रियेत अडचणी : शेतकऱ्यांना हस्तलिखित सातबारा देण्याचे आदेशअमरावती : संगणकीकृत सातबारा प्रक्रियेतील सर्व त्रुटी दूर करुन ३० जूनपर्यंत १०० टक्के सातबारे आॅनलाईन करण्याच्या सूचना शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. खरीप हंगामासाठी कर्जप्रक्रियेत सातबाऱ्याचा अडसर येत असल्याने ३१ मे अखेरपर्यंत शेतकऱ्यांना हस्तलिखित सातबारे देण्याची मुभा तलाठ्यांना देण्यात आली आहे. सर्व्हरचा स्पीड, नवीन लॅपटॉप व प्रिंटर पुरविणे, एमपीएसएलचे कनेक्शन देणे, सॉफ्टवेअरमधील दुरुस्त्या तातडीने करण्याची मागणी करून देखील शासन दुर्लक्ष करीत असल्याने आॅनलाईन सातबारा व संगणकीकृत कामांमध्ये अडथळे येत असल्याच्या तलाठी संघटनेच्या तक्रारी आहेत. यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना एप्रिल-मे महिन्यात पीककर्ज घ्यावे लागते. आॅनलाईन सातबाऱ्यात असणाऱ्या चुकांमुळे शेतकरी पीककर्जापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे आॅनलाईन सातबारा प्रक्रियेतील सर्व चुका दुरूस्त करण्याची व हस्तलिखित सातबारे देण्याची मागणी तलाठी संघटनांनी शासनाकडे केली होती. तलाठी संघटनेची ही मागणी लक्षात घेऊन हस्तलिखित सातबारे देण्यास अखेर परवानगी दिली आहे. तसेच आॅनलाईन सातबारा दुरूस्तीसाठी ‘एडिट आॅप्शन’ देऊन तलाठ्यांचे काम सुकर केले आहे. संगणकीकृत सातबाऱ्यामध्ये केलेल्या तात्पुरत्या दुरूस्त्यांसाठी सूची योग्य व वस्तुस्थितीप्रमाणे असल्याची खात्री तलाठ्याने करायची आहेत. त्यावर मंडळ अधिकाऱ्यांची स्वाक्षरी राहिल. त्यानंतर फेरफरसाठी ते प्रकरण तहसीलदारांकडे पाठविले जाणार आहे. तहसीलदारांच्या आदेशानंतर फेरफाराच्या नोंदी घेतल्या जातील. मंडळ अधिकारी डिजीटल, स्वाक्षरीने साक्षांकीत करुन ते प्रमाणित करेल व यासर्व प्रणालीवर तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांचे नियंत्रण राहणार आहे. संगणकीकृत सातबारा हा हस्तलिखित सातबाऱ्याशी जुळेल, हे सुनिश्चित करण्यासाठी ३० जून डेडलाईन दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची देखील सोय झाली आहे. तलाठ्यांचे काम देखील या निर्णयामुळे सुकर होणार आहे. (प्रतिनिधी)३१ मेपर्यंत हस्तलिखित सातबारे देणारखरीप हंगामासाठी सातबारा असल्याने शेतकऱ्यांना अडचणी उद्भवत आहे. संगणकीकृत सातबाऱ्यात त्रुटी व चुकीची नोंद होत आहे. त्यामुळे ई-फेरफार प्रणालीत दुरुस्ती होईस्तोवर संबंधित तलाठ्याने शेतकऱ्यांना हस्तलिखित सातबारा दिला पाहिजे. यासाठी शासनाने तलाठ्यांना ३१ मेपर्यंत हस्तलिखित सातबाऱ्याची मुभा दिली आहे.