शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

बेलोऱ्याच्या अभिमन्यूने भेदले अचलपूरचे चक्रव्यूह

By admin | Updated: October 25, 2014 02:02 IST

लोकशाहीचा राज्यस्तरीय पंचवार्षिक सण नुकताच पार पडला. यात राजकीय पक्षांच्या ‘दुकानदाऱ्या’ आणि मतदार त्यांचे ‘ग्राहक’ असतात.

सुरेश सवळे चांदूरबाजारलोकशाहीचा राज्यस्तरीय पंचवार्षिक सण नुकताच पार पडला. यात राजकीय पक्षांच्या ‘दुकानदाऱ्या’ आणि मतदार त्यांचे ‘ग्राहक’ असतात. ग्राहकांना आपल्याकडे वळविण्याचे कसब शासकीय धुरंदर पार पाडतात. हे कसब ज्यांना जमले तो यशस्वी झालाच म्हणून समजा. अशातच विविध पक्षांनी रचलेल्या चक्रव्युहात एका अपक्ष उमेदवाराने तिसऱ्यांदा विधानसभेत धडक दिली. अचलपूर विधानसभा मतदारसंघाने रचलेला हा विक्रमच म्हणावा लागेल.बच्चू कडू हे एक अजब रसायन आहे, हे राज्याचे तत्कालीन गृहमंत्र्यांनी उच्चारलेले वाक्य त्यांच्या या विजयामुळे तंतोतंत खरे ठरले. अचलपूरची रचना तशी आगळी वेगळी आहे. या मतदारसंघात बहुजन जातींचे प्राबल्य असले तरी कोणत्याही एका जातीच्या भरवशावर कोणताही उमेदवार निवडून येऊ शकत नाही, हे यापूर्वीच्या अनेक निवडणुकीतून दिसून आले आहे. एका जातीचे पाठबळ असले तरी विविध जातींच्या ‘टेक्या’शिवाय उमेदवार यशस्वी होऊ शकत नाही, हे यापूर्वीच्या अनेक निवडणुकीत स्पष्ट झाले आहे.अचलपूर मतदारसंघात एकूण १९ उमेदवार रिंगणात होते. यात काँग्रेस, भाजप, बसपा सारख्या राष्ट्रीय पक्षाचे तर शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, रिपाइं सारख्या राज्यस्तरावरील पक्षाचेही उमेदवार होते. याशिवाय अपक्षांचा भरणासुद्धा बऱ्यापैकी होता. या दिग्गजांच्या चक्रव्यूहाला भेदणे कोणत्याही अपक्ष आणि राजकीय पक्षाचे पाठबळ नसलेल्या बच्चू कडू यांना शक्य होणार नाही, असाच समज काही राजकीय समीक्षकांनीही व्यक्त केला होता. त्यातही मोदी लाटेत आता बच्चू कडू पार वाहून जाणार, असे चित्र होते. परंतु कडूंच्या पारड्यात वाढलेली मुस्लीम मतदारांची टक्केवारी जमेची बाजू ठरली. मतदारसंघातील इतर उमेदवारांप्रमाणे त्यांच्याही सभा, रॅली झाल्या. यात त्यांचे बळ दिसत होते. दोनदा आमदार असूनही ते शेवटपर्यंत जमिनीवरच राहिले. गेल्या दोन निवडणुकीत बच्चू कडूंना ज्या-ज्या नेत्यांनी मदत केली ते यावेळी स्वत:च रिंगणात असल्यामुळे बच्चुंच्या विजयाची कोणीही शाश्वती देत नव्हते. स्वत: बच्चू कडू, त्यांचे कार्यकर्ते व त्यांच्या चाहत्यांशिवाय सगळेच त्यांच्या ‘हॅटट्रिक’विषयी शंका-कुशंका व्यक्त करीत होते. २१ फेरींच्या मतमोजणीतही उत्कंठा वाढतच होती. १५ व्या फेरीच्या अखेरीस भाजपचा उमेदवार १८६४ मतांनी आघाडीवर होता तर काँग्रेसचा उमेदवार बसपाच्या उमेदवारापेक्षाही दोन हजारांनी माघारला होता. १६ व्या फेरीअखेर कडू केवळ २४५ मतांनी पुढे होते. ही आघाडी २१ व्या फेरीअखेर १० हजार १७० वर पोहोचली आणि ‘कलंदर’ बच्चू कडूंचा ‘चमत्कार’ लोकांना अनुभवता आला. अचलपूर आणि परतवाड्यात बसपाने घेतलेली मते अनुक्रमे १२०१२ व ४९५९ तर काँग्रेसच्या उमेदवाराने घेतलेली मतांमधील तफावत पाहता हे मतदान बच्चू कडूंच्या पथ्यावर पडले. हाकेला ‘ओ’ देणारा, सतत संपर्कात राहणारा उमेदवार असल्याने बच्चूंना म्हणूनच लोकांनी तिसऱ्यांदा उचलून धरले आणि तो ठरला निवडणुकीचे चक्रव्यूह भेदणारा ‘अभिमन्यू’. अचलपूर येथील ही निवडणूक ऐतिहासिक ठरली ती याच कारणामुळे.