शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत मोबाईल चोरी गेल्यास टीसी दाखल करून घेणार गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 05:00 IST

धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशी लांबचा प्रवास करतात. किंबहुना, प्रवाशांकडील वस्तू अथवा मोबाइल चोरीला गेल्यास रेल्वेखाली उतरून पोलिसात तक्रार देणे शक्य होत नाही. त्यामुळे चोरीच्या घटनेची नोंद रेल्वे पोलिसात करण्यात येत नाही. तक्रार नाही तर तपास नाही, असा रेल्वे पोलिसांचा कारभार आहे. मात्र, आता रेल्वेत वस्तू, मोबाइल चोरीला गेल्यास प्रवाशांना पोलिसात जाऊन तक्रार न करता टीसींकडे याबाबत तक्रार करावी लागेल.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बरेचदा रेल्वे गाड्यांमध्ये चोरीच्या घटना झाल्यानंतरही याबाबत तक्रार दाखल होत नाही. विशेषत: मोबाईल चाेरीच्या घटना सातत्याने घडत असतानाही गुन्हे दाखल होत नाहीत. मात्र, आता नव्या नियमानुसार रेल्वेत मोबाइल चोरी गेला, तर टीसी गुन्हा दाखल करून घेणार आहे. प्रवाशांची तक्रार लिहून घेण्याची जबाबदारी टीसींकडे आली आहे.धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशी लांबचा प्रवास करतात. किंबहुना, प्रवाशांकडील वस्तू अथवा मोबाइल चोरीला गेल्यास रेल्वेखाली उतरून पोलिसात तक्रार देणे शक्य होत नाही. त्यामुळे चोरीच्या घटनेची नोंद रेल्वे पोलिसात करण्यात येत नाही. तक्रार नाही तर तपास नाही, असा रेल्वे पोलिसांचा कारभार आहे. मात्र, आता रेल्वेत वस्तू, मोबाइल चोरीला गेल्यास प्रवाशांना पोलिसात जाऊन तक्रार न करता टीसींकडे याबाबत तक्रार करावी लागेल. त्यानंतर चोरीच्या घटनेची तक्रार टीसी करणार आहे. या नव्या व्यवस्थेमुळे प्रवाशांच्या वेळ वाचणार आहे. तपासही जलद गतीने होणार आहे.

कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये दाखल करता येतो गुन्हारेल्वेत चोरी झाल्यास टीसीकडे असलेल्या अर्जाच्या आधारे प्रवाशांची माहिती घेण्यात येते. किंबहुना, चोरीची घटना घडल्यास टीसी रेल्वे पोलिसांशी संपर्क करतात. त्यानुसार, संबंधित डब्यात पोलीस पोहोचून स्वत: गुन्हा नोंदवून घेतात. त्यानंतर, प्रवाशांच्या व्हॉट्सॲप, ई-मेलवर एफआयआरची प्रत पाठविली जाते. आरपीएफ, जीआरपीही गुन्हा दाखल करू शकतात. प्रवासी ठरवेल त्या रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवू शकतो.- अजितसिंह राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक, बडनेरा रेल्वे.

- आता प्रवासी मर्जीनुसार कोणत्याही रेल्वे पोलिसात गुन्हा नोंदवू शकतात. तेथे झीरो गुन्हा दाखल करून, त्यानंतर ज्या भागात चोरी झाली, त्या रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्ह्याची फाईल तपासासाठी पाठविली जाते.- चोरी झाल्यास धावत्या गाडीतच प्रवासी टीसीकडे तक्रार करू शकतात. त्यानंतर टीसी स्वत: प्रवाशांची तक्रार रेल्वे पोलिसात दाखल करू शकतात. त्यानंतर गुन्हा नोंदविल्याची प्रत प्रवाशांकडे पाठविण्याची व्यवस्था आहे. 

कोरोनाकाळात घटल्या चोरीच्या घटना कोरोनाकाळात रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण तिकिटांशिवाय प्रवास नाही, अशी नियमावली होती. त्यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी ओसरली होती. कठोर नियमावलीमुळे ये-जा कमी झाल्याने चोरीच्या घटनाही घटल्या. बडनेरा रेल्वे स्थानकावरील पोलीस ठाण्यात सन २०१७ मध्ये २९८, सन २०१८ मध्ये ५८५, सन २०२० मध्ये १०४, तर सन २०२१ मध्ये आतापर्यंत ९० गुन्ह्यांची नोंद झाली आहे. हल्ली रेल्वेत जीआरपी, आरपीएफ जवानांची गस्त वाढल्याने चोरीच्या घटना मंदावल्या आहेत.

प्रवाशांचा वेळ वाचणार, तपासही जलद आता रेल्वे गाड्यात प्रवाशांचे वस्तू, मोबाईल चोरीला गेल्यास प्रवाशांना थेट पोलिसांत जाऊन गुन्हा नोंदविण्याची गरज नाही. चोरी झाल्याचे प्रवाशांनी टीसीला कळविल्यास तेच गुन्हा दाखल करून घेतील, अशी व्यवस्था आहे. रेल्वेत जीआरपी, आरपीएफही घटनास्थळी पोहोचून गुन्हा नोंदवतील, अशी नवीन व्यवस्था आहे. 

 

टॅग्स :railwayरेल्वेThiefचोर