शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
2
भारत नक्षलमुक्त देश कधी होणार? गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितली टाईमलाईन
3
“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
4
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
5
विराट कोहली RCB च्या पराभवामुळे स्ट्रेसमध्ये? BCCI ला केली खास विनंती अन् म्हणूनच तो...  
6
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
7
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
8
शरद पवार गटातील हुकूमशाही, अहंभावाला कंटाळले, ६ जूननंतर महायुतीत इन्कमिंग; शिंदे गटाचा दावा
9
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
10
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
11
विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहचले संपुर्ण देशमुख कुटुंब, वडिलांसाठी रितेशनं शेअर केली भावुक पोस्ट
12
Sachin Tendulkar : "बाबा, तुमची खूप आठवण येते, आजही तू जुनी खुर्ची...", 'क्रिकेटचा देव' भावूक!
13
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
14
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?
15
नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर
16
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
17
IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम
18
"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 
19
"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप
20
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान

टरबूज, टोमॅटोचे कोट्यवधींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 5:00 AM

दोन्ही गावांतील शेतकऱ्यांनी ५० ते ६० एकर शेतात टरबूज, खरबूज, आणि टमाटरची लागवड केली होती. यामधून सुमारे २५ ते ३० टन उत्पादनाची अपेक्षा होती. एकरी दोन लाख रुपये या उत्पादनातून मिळणार होते. परंतु, संपूर्ण बाजारपेठ सध्या बंद आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था असलेला शेतकरी १० रुपये किलोपेक्षा कमी दराने आपला शेतमाल जेवढा शक्य होईल तेवढा विकत आहे.

ठळक मुद्देएक ट्रक टोमॅटो रस्त्यावर फेकले : टरबुजाची मातीमोल भावाने विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कवाढोणा रामनाथ : येथून जवळच असलेल्या खेड आणि पिंप्री गावांमध्ये परिसरात गेल्या तीन महिन्यांपूर्वी टमाटर, टरबूज, खरबूज याची लागवड शेतकऱ्यांनी केली. पीक आता तोडणीला आले असताना, कोरोनाच्या उद्रेकाने बाजारपेठ बंद झाली. त्यामुळे या दोन्ही गावांत ओलिताची शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांचे या पिकापोटी सुमारे एक कोटी रू पयाचे नुकसान झाले आहे.दोन्ही गावांतील शेतकऱ्यांनी ५० ते ६० एकर शेतात टरबूज, खरबूज, आणि टमाटरची लागवड केली होती. यामधून सुमारे २५ ते ३० टन उत्पादनाची अपेक्षा होती. एकरी दोन लाख रुपये या उत्पादनातून मिळणार होते. परंतु, संपूर्ण बाजारपेठ सध्या बंद आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था असलेला शेतकरी १० रुपये किलोपेक्षा कमी दराने आपला शेतमाल जेवढा शक्य होईल तेवढा विकत आहे.शेतकरी गजानन बोखडे यांनी टरबुजाकरिता एकरी ५० हजार रुपये खर्च केले. परंतु, दोन रुपये किलो दराने फळ जात असल्याने लागवडीचा खर्चसुद्धा निघाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. दिल्ली, मुंबई, कोलकाता, भोपाल, नागपूर, पुणे आदी बाजारपेठेत त्यांचा माल दरवर्षी जातो. परंतु, तेथील संपूर्ण बाजारपेठ बंद असल्याने शेतमालाला उठाव नाही. मागणी असली तरी संपूर्ण ग्राहकांपर्यंत शेतकरी पोहोचू शकत नाहीत. लॉकडाऊनने त्यांना हवालदिल केले आहे. संपूर्ण वर्षभराचे आर्थिक बजट कोसळले आहे. शेतावर काम करणारे शेकडो मजूर आज बेरोजगार झाले आहेत. शासन धान्य देते; पण किराणा कोण देणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.खेड येथील सधन शेतकरी नितीन ठाकरे यांनी तीन एकरात टमाटरची लागवड केली. पिकाची काळजी घेतल्याने सुमारे चार हजार कॅरेट टमाटरचे उत्पादनाचा हिशेब त्यांनी लावला. प्रतिकॅरेट ९०० रुपये दराने चार लाखांचे उत्पन्न त्यांना अपेक्षित होते. परंतु, लॉकडाऊनचा फटका बहारलेल्या टमाटरला बसला. बाजारपेठ बंद असल्याने झाडालाच टमाटर सुकले. दोन ट्रक टमाटर रस्त्यावर फेकून दिल्याचे त्यांनी सांगितले. तीन एकरात शिमला मिरची आहे. व्यापारी येतात, पाहतात आणि निघून जातात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. नीलेश बोदडे, आशिष बोदडे, सुनील साठे या शेतकऱ्यांचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी