शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

अमरावती विमानतळाला मिळाला एअरोड्रम परवाना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतून केले जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 11:48 IST

Amravati : मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत बेलोरा विमानतळावरून पहिले प्रवासी विमान उड्डाण करेल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नागरी विमानसेवा महासंचालनालयाने (डीजीसीए) गुरूवारी अमरावतीविमानतळाला एअरोड्रोम परवाना दिला असून आता बेलोरा विमानतळ अधिकृतपणे प्रादेशिक कनेक्टिव्हिटी स्किम (आरसीएस) मधील परवानाधारक विमानतळ म्हणून घोषित झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतून जाहीर केले.

या घोषणेने अमरावतीकरांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. आधी वचन दिल्याप्रमाणे या मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत बेलोरा विमानतळावरून पहिले प्रवासी विमान उड्डाण करील, याचाही मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला आहे. अमरावती-मुंबई-अमरावती या मार्गावर अलायन्स एअरलाईन्सचे विमान आठवड्यातून तीन दिवस प्रवाशांना सेवा देईल, असे फडणवीस म्हणाले. 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या घोषणेची सुरूवात 'गुड न्युज ऑन होली, मेजर माईलस्टोन फॉर महाराष्ट्र' अशी केली असून ही नवीन युगाची सुरूवात आहे. बेलोरा विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवेतील महत्वाचा टप्पा पूर्ण झाला झाला आहे. यामुळे अमरावती व लगतच्या जिल्ह्यांमधील विकासाला चालना मिळेल. पर्यटन विकासाच्या नव्या संधी निर्माण होतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

बेलोरा विमानतळाचे काम पूर्ण झाले असून येत्या ३१ मार्चपासून प्रवासी विमानसेवा सुरू होईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी अर्थसंकल्पीय भाषणात केली होती. अमरावती विमानतळावर नवीन धावपट्टी तयार करण्यात आली आहे. तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. १८ बाय ५० मीटरची ही धावपट्टी आहे. त्यामुळे येथून एटीआर हे ७२ आसनी विमान उडू शकणार आहे.

आठवड्यातून तीनदा सेवायेत्या ३१ मार्चपासून प्रवासी विमानसेवा सुरू होण्याचे संकेत मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी दिल्याने आता अमरावतीकरांचे विमानसेवेचे स्वप्न पूर्ण होणार आहे. या घोषणेचे स्वागत करण्यात येत आहे. अलायन्स एअरची मुंबई-अमरावती-मुंबई ही विमानसेवा सुरुवातीला आठवड्यातून तीन दिवस ही सेवा देईल.

एटीआर ७२ आसनी विमान सेवापॅसेंजर टर्मिनल बिल्डिंग, एटीसी टॉवर्स आणि इतर नागरी कामे पूर्ण झाली असून, अमरावतीहून लवकरच पूर्ण व्यावसायिक उड्डाणे सुरू होण्यापूर्वी अनेक सुरक्षाविषयक तपासण्या करण्यात आल्या आहेत. प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेअंतर्गत मुंबई-अमरावती-मुंबई मार्गावर अलायन्स एअर या कंपनीच्या माध्यमातून एटीआर ७२ आसनी विमान सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. विमानतळ आता प्रवासी वाहतुकीसाठी सज्ज झाले आहे. 

कॅलिब्रेशन यशस्वीरित्या पूर्णअमरावती विमानतळावर नुकतीच 'एअर कॅलिबरेशन ऑफ प्रिसिजन अप्रोच पाथ इंडिकेटर' अर्थात 'पीएपीआय' चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. त्यामुळे अमरावतीकरांना मुंबईपर्यंत विमानाने ये-जा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हवाई वाहतूक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली बंगळुरूहून अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर उड्डाण केलेल्या बीच एअर ३६० ईआर टर्बोप्रॉप विमानावर भारतीय विमानतळ प्राधिकरण, फ्लाइट इन्स्पेक्शन युनिटने कॅलिब्रेशन केले. या विमानाने २६/०८ धावपट्टीवरून अमरावती विमानतळावरून उड्डाण केले आणि त्याचे कॅलिब्रेशन यशस्वीरित्या पूर्ण केले होते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmravatiअमरावतीAirportविमानतळ