शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

नवजातांच्या मृत्यूनंतरही डॉक्टरांचा किळसवाणा बचाव?

By admin | Updated: November 15, 2014 01:07 IST

नवजातांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणारा डफरीन रूग्णालयातील कारभार 'लोकमत'ने पुराव्यासह लोकदरबारात मांडल्यानंतर पायाखालची वाळू ...

अमरावती : नवजातांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणारा डफरीन रूग्णालयातील कारभार 'लोकमत'ने पुराव्यासह लोकदरबारात मांडल्यानंतर पायाखालची वाळू सरकलेल्या अधीक्षक डॉ.अरूण यादव यांनी चूक लपविण्यासाठी मानवतेचाच मुडदा पाडला. 'नवजाताचा पलंगावरून पडून मृत्यू' हे वृत्त लोकमतने शुक्रवारच्या अंकात प्रकाशित केले. या वृत्ताची संवेदनशीलपणे दखल घेऊन डॉक्टर असलेले अमरावतीचे आमदार सुनील देशमुख यांनी जिल्हा स्त्रि रुग्णालयात शुक्रवारी दुपारी तातडीची बैठक बोलविली. डफरिनचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरुण यादव त्यांच्या चमूसह उपस्थित होते. नवजातांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचे वास्तव लपविण्यासाठी डॉ.यादव यांनी सुनील देशमुख यांना 'थंड डोक्या'ने दिशाभूल करणारी माहिती दिली. क्षणभर सुनील देशमुखांचाही डॉ.यादवांनी दिलेल्या माहितीवर विश्वास बसला, इतक्या सुनियोजितपणे खोटी माहिती सादर करण्यात आली. खोटे काय? अचलपूरच्या कासमपुरा परिसरातील राणी राऊत यांची प्रसुती नव्हे, तर गर्भपात करण्यात आला. त्यामुळे त्यांचे नवजात अर्भक पलंगावरून पडून दगावण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, अशी माहिती डॉ. यादव यांनी आमदारांना दिली. खरे काय? प्रत्यक्षात राणी राऊत यांना सातव्या महिन्यांत असह्य प्रसव वेदना सुरू झाल्या होत्या. वारंवार याचना करूनही डॉक्टर, परिचारिकांनी जराही लक्ष दिले नाही. राणी प्रसूत होण्याची चिन्हे दिसू लागल्यावर राणी यांच्या सासूबार्इंनी प्रसुतीसाठीचे परंपरागत बाह््य उपचार केलेत. डॉक्टर्स, नर्सेसविनाच राणी प्रसूत झाल्यात. सात महिन्यांचे जिवंत बाळ सुखरूप बाहेर आले. नंतर डॉक्टरांच्या देखरेखीत असताना राणी यांचे बाळ पलंगावरून पडले नि दगावले. राणी यांचे पहिले मूलही सातव्या महिन्यातीलच आहे. ते उत्तम आहे. दुसऱ्या खेपेसही राणी यांना सातव्या महिन्यातच प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या. प्रकरण दुसरे: यादवांचा खोटारडेपणारिझवाना बी जावेद शहा (२४, रा. रहेमतनगर) यांना प्रसुती कळा आल्याच नाहीत. त्यांना इतर आजार असल्याने मृत्यू बाळ जन्माला आले, अशी माहिती दिली. असे आहे वास्तव!रिझवाना यांना घटनेच्या एक दिवस आधीच डफरीनमध्ये दाखल करण्यात आले होते. असह्य वेदनांनी त्या तडफडत होत्या. सिझेरियन करून टाका, अशी गयावया वारंवार करीत होत्या. डॉक्टरांनी लक्ष दिले नाही. कॉम्प्लिकेशन्स निर्माण झालेत. बाळ दगावले. आदल्या दिवशी, योग्य वेळेत प्रसुती करविली असती तर बाळ सुखरूप असते, असे रिझवानाच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. ( प्रतिनिधी)