शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

मेळघाटात ७२ वर्षांनंतरही काळोख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 5:00 AM

चिखलदरा तालुक्यातील हतरू हा अतिदुर्गम परिसर आहे. या परिसरातील अनेक गावे आजही विद्युत पुरवठा पोहोचला नसल्याने अंधारात चाचपडत आहेत. अनेक गावांना ये-जा करण्यासाठी रस्ता नाहीत. वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण या सुविधांपासून येथील आदिवासी वंचित आहेत. या परिसरात नेमले जाणारे शासकीय कर्मचारी काळ्या पाण्याची शिक्षा म्हणून आपल्या सेवेकडे पाहतात. परिणामी त्यांच्यात सेवाभाव नसल्याने सतत मुख्यालयी बेपत्ता राहत असल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांपुढे मांडली व्यथा : वीज, पाणी, रस्ता देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : स्वातंत्र्याला ७२ वर्षे झाली तरीदेखील मेळघाटातील आदिवासींच्या नशिबी आलेला अंधार पुसला गेलेला नाही. आजही अतिदुर्गम हतरू परिसरातील अनेक गावांत वीजपुरवठा नाही. पायाभूत सुविधादेखील पोहोचलेल्या नाहीत तसेच कार्यान्वित केलेल्या नाहीत. आम्हाला सुविधा पुरवून समस्या सोडविण्याचे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच पंचायत समितीचे उपसभापती नानकराम ठाकरे यांनी घातले.चिखलदरा तालुक्यातील हतरू हा अतिदुर्गम परिसर आहे. या परिसरातील अनेक गावे आजही विद्युत पुरवठा पोहोचला नसल्याने अंधारात चाचपडत आहेत. अनेक गावांना ये-जा करण्यासाठी रस्ता नाहीत. वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण या सुविधांपासून येथील आदिवासी वंचित आहेत. या परिसरात नेमले जाणारे शासकीय कर्मचारी काळ्या पाण्याची शिक्षा म्हणून आपल्या सेवेकडे पाहतात. परिणामी त्यांच्यात सेवाभाव नसल्याने सतत मुख्यालयी बेपत्ता राहत असल्याचे वास्तव आहे. तालुका किंवा जिल्हास्तरावरूनच त्यांचे कामकाज चालते. परिणामी आदिवासींना सुविधांची माहिती होत नाही. त्यांच्यापर्यंत कुठलीही योजना पोहोचत नाही. मेळघाटवर विशेष लक्ष असलेले राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथील या अतिगंभीर विषयावर लक्ष घालण्याची मागणी चिखलदरा पंचायत समितीचे उपसभापती नानकराम ठाकरे यांनी निवेदनातून केली आहे.शिक्षक करतात ये-जा; आरोग्याची ऐशीतैशीगावात रस्तेच नसल्याने दळणवळणाची साधने अत्यल्प आहेत. महामंडळाची बस आजही मेळघाटातील दोनशेपेक्षा अधिक गावांत पोहोचतच नसल्याचे सत्य आहे. परिणाम शाळेतील शिक्षक मुख्यालयी राहत नाहीत. त्यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करण्यात यावी, तसेच हतरू प्राथमिक आरोग्य केंद्राला ‘१०८’ रुग्णवाहिका देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. सोबतच जिल्हा परिषदेच्या शाळा आणि जारिदा, रायपूर, हतरू, डोमा येथील आश्रमशाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आदिवासी मुलांना खेळण्यासाठी साहित्य नसल्याची व्यथा मांडण्यात आली आहे.विद्युत पुरवठ्याअभावी अंधाराचे जीवनस्वातंत्र्यापासून आतापर्यंत मेळघाटातील अनेक आदिवासी पाड्यांपर्यंत विकासकामे पोहोचल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात एसटी बस, रस्ता, वीज, आरोग्य, शिक्षण या अत्यावश्यक असलेल्या सुविधा पोहोचल्या नाहीत. तालुक्यातील सरोवरखेडा, मारिता, बिच्छुखेडा, चुनखडी, नवलगाव, माखला, रायपूर, बोराट्याखेडा, लाखेवाडा, टेम्ब्रू, पिपल्या, बोदू अशा अनेक गावांत विद्युत पुरवठा पोहोचलाच नसल्याचे वास्तव आहे.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकास