शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थ्यांची गैरसोय केल्यास शाळांचे अनुदान होणार बंद

By admin | Updated: August 3, 2014 23:05 IST

आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील अपहार व नियमबाह्य कारभाराची चौकशी केली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यासह राज्यातील आश्रमशाळांची

तपासणी : स्वतंत्र पथकामार्फत पडताळणी मोहीमअमरावती : आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील अपहार व नियमबाह्य कारभाराची चौकशी केली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यासह राज्यातील आश्रमशाळांची १ आॅगस्टपासून स्वतंत्र पथकामार्फत तपासणी सुरू झाली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे व आरोग्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या शाळांचे अनुदान बंद करण्यात येणार आहे. आदिवासी आश्रमशाळांमधील मुलांना मूलभूत सोई-सुविधा दिल्या जात नाहीत. त्यामुळे अनेक आश्रमशाळांमधील मुलांना नाहक प्राण गमवावे लागले. २००१ ते २०१२ या १२ वर्षांच्या कालावधीत आश्रमशाळांमधील मुलांच्या मृत्यूच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. आश्रमशाळा चालविणाऱ्या संस्थांना मुलांच्या शिक्षणापेक्षा सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानातच अधिक रस असतो, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. त्यामुळे सर्व आश्रमशाळांची तपासणी करावी आणि ज्या शाळांमध्ये मुलांना पिण्याचे पाणी पुरेसे व शुद्ध पाणी, पौष्टिक अन्न, आरोग्य सुविधा, स्वच्छतागृहे इत्यादी मूलभूत सुविधा देण्यात येत नसल्याबाबतचे प्रकार उघडकीस येतील, अशा संस्थांचे अनुदान बंद करावे, असा आदेश न्यायालयाने दिला. न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व आश्रमशाळांची तपासणी करण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे. बालविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरावर समित्या किंवा पथके स्थापन करण्यात येणार आहेत. ही पथके आश्रमशाळांना भेट देऊन मुलांना पिण्याचे पाणी, पौष्टिक अन्न मिळते की नाही, गणवेश, अंथरूण-पांघरुण, टॉवेल, ताट-वाटी, पुस्तके, वह्या लेखन साहित्य मिळते की नाही याबरोबरच मुलांची तसेच शिक्षक व कर्मचाऱ्यांची हजेरी तपासली जाणार आहे. ठराविक कालावधीत सर्व आश्रमशाळांची तपासणी करून शासनाला अहवाल सादर केला जाणार आहे. तपासणीत दोषी आढळणाऱ्या शाळा व्यवस्थापनावर कडक कारवाई केली जाणार आहे. (प्रतिनिधी)