शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
3
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
4
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
5
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
6
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
7
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
8
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
9
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
10
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
11
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
12
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
13
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
14
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
15
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
16
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
17
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
18
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
19
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
20
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी

पंचायत समितीस्तरावरील लोकशाही दिनाचा लागेना पत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:15 IST

अमरावती : ग्रामपंचायत स्तरावरील तक्रारीचा निपटारा हा गाव किंवा पंचायत समितीस्तरावर होणे अपेक्षित आहे. परंतु असे होत नसल्याचे या ...

अमरावती : ग्रामपंचायत स्तरावरील तक्रारीचा निपटारा हा गाव किंवा पंचायत समितीस्तरावर होणे अपेक्षित आहे. परंतु असे होत नसल्याचे या तक्रारीचा ओघ जिल्हा, विभागीय लोकशाही दिनात वाढत आहे. सदर प्राप्त तक्रारी जिल्हा परिषदेकडे वर्ग केल्या जातात.त्यामुळे नागरीकांच्या तक्रारीचा गाव किंवा पंचायत समितीस्तरावर निकाली काढण्यासाठी २६ ऑक्टोंबर २०१८ पासृून जिल्हा परिषदेने मोठा गाजावाजा करून पंचायत समितीस्तरावर दर महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी लोकशाही दिन घेण्याचे जाहीर केले होते.परंतु तीन वर्षही पूर्ण होत नाही तोच हा लोकशाही दिन होते तरी कुठे हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे झेडपी प्रशासनाने केवळ सर्वसामान्यांना नावापुरताच दिलासा देण्यासाठी केवळ गाजावाजा करून धन्यता मानली की काय असा सुरू सर्व सामान्या नागरिकांन मधून व्यक्त होत आहे.

ग्रामीण भागातील जनतेच्या तक्रारी संबंधात ग्राम तथा पंचायत समितीवर वेळीच कार्यवाही होत नसल्याने या तक्रारी जिल्हा, विभागीय आणि शासनस्तरावर न्याय मिळविण्यासाठी नागरीक करतात. सदरच्या तक्रारी संबंधित विभागाकडून जिल्हा परिषदेस कार्यवाहीसाठी सादर केल्या जातात. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरीकांच्या तक्रारीचा निपटारा हा त्वरीत करता यावा यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य्यकार्यकाऱ्यांनी प्रत्येक पंचायत समितीस्तरावर दर महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी सकाळी ११ ते दूपारी २ वाजेपर्यत लोकशाही दिन घेण्याचा निर्णय घेवून त्याच्या अंमलबजावणीचे आदेश झेडपीच्या सामान्य प्रशासन विभागाच्या प्रमुखांनी काढले होते. लोकशाही दिनाची अंमलबजावणी २६ ऑक्टोंबर पासून केली. मात्र सुरूवातीला काही महिने हा उपक्रम राबविला गेला.आता मात्र या लोकशाही दिनाचा पंचायत समितीसह जिल्हा परिषदेलाही विसर पडला आहे.आता हा लोकशाही दिनच घेतला जात नसल्याने नागरिकांच्या तक्रारीचा ओघ वाढला आहे.याकडे मोठा गाजावाजा करून प्रत्येक पंचायत समितीनिहाय नेमलेले जिल्हा परिषदेतील संपर्क अधिकारीही लोकशाही दिन केव्हाचेच विसलेत असे चित्र दिसून येत आहे.अन प्रशासनाचे प्रमुखही याबाबत अनभिज्ञ आहेत.परिणामी पंचायत समितीस्तरावरील लोकशाही दिन हा केवळ नावापुरताच ठरल्याचे वास्तव आहे.

बॉक्स

पुन्हा सुरू होणार का लोकशाही दिन ?

जिल्हा परिषद प्रशासनाने गावपातळीवरील जनसामान्यांच्या समस्या तालुकास्तरावरच निकाली काढण्यासाठीगत काही वर्षापूर्वी सुरू केलेला पंचायत समितीचा लोकशाही दिन हा अल्पावधीतच बंद पडल्याने पुन्हा सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेचे प्रशासन यावर लक्ष घालून लोकशाही दिन सुरू करणार का याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.