शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

पंचायत समितीस्तरावरील लोकशाही दिनाचा लागेना पत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:15 IST

अमरावती : ग्रामपंचायत स्तरावरील तक्रारीचा निपटारा हा गाव किंवा पंचायत समितीस्तरावर होणे अपेक्षित आहे. परंतु असे होत नसल्याचे या ...

अमरावती : ग्रामपंचायत स्तरावरील तक्रारीचा निपटारा हा गाव किंवा पंचायत समितीस्तरावर होणे अपेक्षित आहे. परंतु असे होत नसल्याचे या तक्रारीचा ओघ जिल्हा, विभागीय लोकशाही दिनात वाढत आहे. सदर प्राप्त तक्रारी जिल्हा परिषदेकडे वर्ग केल्या जातात.त्यामुळे नागरीकांच्या तक्रारीचा गाव किंवा पंचायत समितीस्तरावर निकाली काढण्यासाठी २६ ऑक्टोंबर २०१८ पासृून जिल्हा परिषदेने मोठा गाजावाजा करून पंचायत समितीस्तरावर दर महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी लोकशाही दिन घेण्याचे जाहीर केले होते.परंतु तीन वर्षही पूर्ण होत नाही तोच हा लोकशाही दिन होते तरी कुठे हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे झेडपी प्रशासनाने केवळ सर्वसामान्यांना नावापुरताच दिलासा देण्यासाठी केवळ गाजावाजा करून धन्यता मानली की काय असा सुरू सर्व सामान्या नागरिकांन मधून व्यक्त होत आहे.

ग्रामीण भागातील जनतेच्या तक्रारी संबंधात ग्राम तथा पंचायत समितीवर वेळीच कार्यवाही होत नसल्याने या तक्रारी जिल्हा, विभागीय आणि शासनस्तरावर न्याय मिळविण्यासाठी नागरीक करतात. सदरच्या तक्रारी संबंधित विभागाकडून जिल्हा परिषदेस कार्यवाहीसाठी सादर केल्या जातात. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरीकांच्या तक्रारीचा निपटारा हा त्वरीत करता यावा यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य्यकार्यकाऱ्यांनी प्रत्येक पंचायत समितीस्तरावर दर महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी सकाळी ११ ते दूपारी २ वाजेपर्यत लोकशाही दिन घेण्याचा निर्णय घेवून त्याच्या अंमलबजावणीचे आदेश झेडपीच्या सामान्य प्रशासन विभागाच्या प्रमुखांनी काढले होते. लोकशाही दिनाची अंमलबजावणी २६ ऑक्टोंबर पासून केली. मात्र सुरूवातीला काही महिने हा उपक्रम राबविला गेला.आता मात्र या लोकशाही दिनाचा पंचायत समितीसह जिल्हा परिषदेलाही विसर पडला आहे.आता हा लोकशाही दिनच घेतला जात नसल्याने नागरिकांच्या तक्रारीचा ओघ वाढला आहे.याकडे मोठा गाजावाजा करून प्रत्येक पंचायत समितीनिहाय नेमलेले जिल्हा परिषदेतील संपर्क अधिकारीही लोकशाही दिन केव्हाचेच विसलेत असे चित्र दिसून येत आहे.अन प्रशासनाचे प्रमुखही याबाबत अनभिज्ञ आहेत.परिणामी पंचायत समितीस्तरावरील लोकशाही दिन हा केवळ नावापुरताच ठरल्याचे वास्तव आहे.

बॉक्स

पुन्हा सुरू होणार का लोकशाही दिन ?

जिल्हा परिषद प्रशासनाने गावपातळीवरील जनसामान्यांच्या समस्या तालुकास्तरावरच निकाली काढण्यासाठीगत काही वर्षापूर्वी सुरू केलेला पंचायत समितीचा लोकशाही दिन हा अल्पावधीतच बंद पडल्याने पुन्हा सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेचे प्रशासन यावर लक्ष घालून लोकशाही दिन सुरू करणार का याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.