शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

७७ पीडितांना शासनाचे ‘मनोधैर्य’

By admin | Updated: January 5, 2015 22:54 IST

पीडीत मुली व बालकांना प्रतिष्ठा, आत्मविश्वास परत मिळवून देणे, त्यांना अर्थसहाय्य देऊन पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने आखण्यात आलेल्या मनोधैर्य योजनेंतर्गत जिल्ह्यात ७७ प्रकरणे निकाली

पुनर्वसन : अत्याचारग्रस्त मुली, बालके व महिलांना १ कोटी १८लाखांची मदत
गजानन मोहोड - अमरावती
पीडीत मुली व बालकांना प्रतिष्ठा, आत्मविश्वास परत मिळवून देणे, त्यांना अर्थसहाय्य देऊन पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने आखण्यात आलेल्या मनोधैर्य योजनेंतर्गत जिल्ह्यात ७७ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.
यामध्ये १ कोटी १८ लाख रूपयांची आर्थिक मदत ४६ मुली, ४ बालके व २७ महिलांना मदत देण्यात आली. जिल्हा क्षती सहाय्य व पुनर्वसन योजनेंतर्गत आजवर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सहा बैठकींमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि अ‍ॅसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला आणि बालकांना अर्थसहाय्य देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाने २१ आॅक्टोबर २०१३ पासून ‘मनोधैर्य’ योजना सुरू केली आहे. या अंतर्गत क्षती सहाय्य व पुनर्वसन मंडळ जिल्ह्यात कार्यरत आहे. ही संपूर्ण योजना महिला व बालविकास विभागाच्या अखत्यारित आहे. जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष आहेत.
योजनेला सुरुवात झाल्यापासून जिल्हा क्षती सहाय्य व पुनर्वसन समितीच्या आजवर सहा बैठकी झाल्या आहेत. किमान ४ ते ५ प्रकरणे जमा झाल्यावर ही बैठक होत असल्याची माहिती जिल्हा महिला व बालकल्याण विभागाचे परिविक्षा अधिकारी सुभाष अवचार यांनी दिली. पीडितांचे समुपदेशन देखील तत्काळ करण्यात येते. प्रकरण मंजूर झाल्यावर तत्काळ निधी पीडितांच्या खात्यात जमा केला जातो.
असा आहे अर्थसहाय्याचा विनियोग
जिल्हा मंडळाकडून आदेश प्राप्त झाल्यावर जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी मंजूर रक्कम संबंधिताच्या बँक खात्यात जमा करतात. यापैकी ७५ टक्के रक्कम ‘फिक्स डिपॉझिट’मध्ये ३ वर्षांसाठी ठेवण्यात येते. उर्वरित २५ टक्के रक्कम पीडित किंवा पालकांना खर्च करता येते. पीडित व्यक्ती अज्ञानी असेल तर त्यांच्या खात्यातील ७५ टक्के ‘फिक्स डिपॉझिट’बालक १८ वर्षांचा झाल्यावर मिळू शकेल व उर्वरित रक्कम बालकाच्या हितासाठी खर्च करता येईल.
अशी आहे कार्यपद्धती
जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांना माहिती मिळताच संबंधित पोलीस तपास अधिकाऱ्याकडून या माहितीच्या आधारे जिल्हा मंडळ निर्णय घेईल व संबंधित पोलीस तपास अधिकाऱ्यांनी ‘एफआयआर’ दाखल झाल्यावर त्याची माहिती एसएमएस किंवा ई-मेलद्वारे जिल्हाधिकारी आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांना कळवावी लागते. यानंतर हा विभाग पीडितांचे समुपदेशन करुन त्यांना धैर्य देते.