शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

अचलपूर उपविभागात ७२ रोहित्र निकामी

By admin | Updated: October 29, 2014 22:41 IST

वेळेत विजेची देयके आली नाहीत तर वीज खंडित करणारी वीज वितरण कंपनी घरगुती ग्राहक व शेतकऱ्यांना नियमित वीजपुरवठा करण्यात मात्र अपयशी ठरली आहे. एकट्या अचलपूर उपविभागीय कार्यालयांतर्गत

सुरेश सवळे - चांदूरबाजारवेळेत विजेची देयके आली नाहीत तर वीज खंडित करणारी वीज वितरण कंपनी घरगुती ग्राहक व शेतकऱ्यांना नियमित वीजपुरवठा करण्यात मात्र अपयशी ठरली आहे. एकट्या अचलपूर उपविभागीय कार्यालयांतर्गत तब्बल ७२ रोहित्र निकामी झाले आहेत. तर संपूर्ण जिल्ह्यात हा आकडा १४० वर गेला आहे. कंत्राटदाराची मनमानी आणि अधिकाऱ्यांची उदासीनता यामुळे शिरजगाव कसबा परिसरातीील शेतकरी त्रस्त झाले आहेत. यात त्यांचे लाखोंचे नुकसान ङोत आहे. या त्रासाला कंटाळून शिरजगाव कसबा येथील नंदू पेठे या शेतकऱ्याने तर अचलपूर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आत्महत्या करण्याची नोटीस वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना १३ आॅक्टोबर रोजी दिल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी सभापती मनोहर सुने यांनी ‘लोकमत’ला दिली. आ. बच्चू कडून यांनी वीज वितरण कंपनीविरूध्द एल्गार पुकारला असून १ नोव्हेंबरनंतर केव्हाही अचलपूर उपविभागातील कोणतेही विद्युत कार्यालय ताब्यात घेण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांचे रोहित्र निकामी झाल्यानंतर त्याची तक्रार संबंधित कार्यालयात केल्यानंतर एक-एक महिना रोहित्र बदलून देण्यात येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे लाखोंचे नुकसान होत आहे. तीच अवस्था घरगुती मीटरची आहे. ‘फॉल्टी मीटर’बदलून देण्यासही साहित्याची अडचण दाखवून ही तक्रार प्रलंबित ठेवली जाते. शिरजगाव कसबा विद्युत कार्यालयात तर अनेक महिन्यांपासून कनिष्ठ अभियंत्यांची ५६ पदे रिक्त असल्यामुळे विद्युत ग्राहकांना सेवा मिळत नाही. नादुरूस्त अवस्थेतील रोहित्र बदलून दिल्यानंतरही त्याचा टिकाऊपणा संशयास्पद असल्याचे बोलले जाते. थूगाव मार्गावरील रोहित्र जून २०१४ मध्ये चोरीला गेल्यानंतर त्या ठिकाणी दुसरे रोहित्र बसविण्यात आले खरे. मात्र ते दोन महिन्यातच पुन्हा निकामी झाले.हीच अवस्था शिरजगाव कसबा पॉवर स्टेशनवरून अंगदपूर फिडरमध्ये होणाऱ्या अनियमित विद्युत पुरवठ्याबाबत आहे. याबााबत शिरजगाव कसबा येथील शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंता व सहायक अभियंत्यांना अनेक निवेदने दिली. मात्र, याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप मनोहर सुने यांनी केला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.