शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

पाणी चिंता मिटली; पश्चिम विदर्भातील ५०२ प्रकल्पांत ६८.२० टक्के पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 8:27 PM

दोन मोठे प्रकल्प १०० टक्के : पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न सुटला

संदीप मानकर/अमरावती : गेल्या दोन आठवड्यात झालेल्या सार्वत्रिक तथा दमदार पावसामुळे पश्चिम विदर्भातील मोठ्या प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ  झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा प्रकल्प शंभर टक्के भरला असून, १२ सेंमीने ११ दारे उघडण्यात आली आहेत. 

यवतमाळ जिल्ह्यतील बेंबळा प्रकल्पातसुद्धा शंभर टक्के पाणीसाठा साचला असून, २५ सेंमीने दोन दारे उघडण्यात आली असून, नदीपात्रात पाण्याचा विसर्ग होत आहे. दोन दिवसांपासून पावसाने उसंत दिली आहे. २२ सप्टेंबरला सकाळी ७ वाजेपर्यंत जलसंपदा विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार ५०२ प्रकल्पांमध्ये सरासरी ६८.२० टक्के पाणीसाठा असल्याने सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असला तरी काही प्रकल्पांत अद्यापही अपेक्षित पाणीसाठा जमा झालेला नाही. परतीच्या पावसात प्रकल्पातील पाणीसाठा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नऊ मोठ्या प्रकल्पांत सरासरी ७५.९१ टक्के पाणीसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात ४९.७२ टक्के पाणीसाठा आहे. अरुणावती प्रकल्पात  सर्वात कमी १३.९१ टक्के, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात ३४.३३ टक्के, वान ९६.६२ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात ४६.४४ टक्के, पेनटाकळी ९७.१० टक्के, खडकपूर्णा ४९.७८ टक्के पाणीसाठा साचला आहे. वान प्रकल्पाचे १५ सेंमीने दोन दारे उघडण्यात आली आहेत. ४६९ लघु प्रकल्पांचाही पाणीसाठा वाढत असून ५४.७० टक्के पाणीसाठा साचला आहे. ५०२ प्रकल्पांची प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा ३१७४.११ दलघमी एवढा असून आजचा  उपयुक्त पाणीसाठा हा २१६४.७५ दलघमी आहे. 

२४ मध्यम प्रकल्पांत सरासरी ७४.१४ टक्के पाणीसाठाअमरावती जिल्ह्यातील शहानूर मध्यम प्रकल्पात ९५ टक्के पाणीसाठा साचला आहे. चंद्रभागा प्रकल्पात ९५.४७ टक्के,  पूर्णा प्रकल्पात ९२.७९ टक्के, सपन ९६.२७ टक्के  पाणीसाठा साचला असून, जिल्ह्यातील चारही प्रकल्पांचे दरवाजे उघडण्यात आले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस प्रकल्पात ९९.१६ टक्के  पाणीसाठा आहे. सायखेडा १०० टक्के, गोकी ५३.०६ टक्के, वाघाडी ८४.४२  टक्के, बोरगांव १०० टक्के, नवरगाव १०० टक्के, अकोला जिल्ह्यातील निर्गुणा ६१.८७ टक्के, मोेर्णा ५१.०६ टक्के, घुंगशी बॅरेज २.०८ टक्के, वाशिम जिल्ह्यातील अडाण प्रकल्पात ३१ टक्के, सोनल ५२.६० टक्के, एकबुर्जी ५४.८७ टक्के, बुलडाणा जिल्ह्यतील ज्ञानगंगा १०० टक्के, पलढग १०० टक्के, मस १०० टक्के, कोराडी शून्य टक्के, मन ७३.१४  टक्के, तोरणा १०० टक्के, उतावळी ९८.१३  टक्के पाणीसाठा साचला आहे.

टॅग्स :Vidarbhaविदर्भwater shortageपाणीकपात