शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

रबीसाठी साडेपाच कोटींचा पीक विमा मंजूर

By admin | Updated: March 4, 2017 00:10 IST

रबी २०१५-१६ हंगामात राष्ट्रीय कृषी पीक विमा काढलेल्या १५ हजार ८८९ शेतकऱ्यांपैकी १० हजार १९ शेतकऱ्यांना ५ कोटी ५० लाख ६४ हजार रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला.

मार्चअखेर होणार बँक खात्यात जमा : गव्हाला ९, हरभऱ्याला १० तालुक्यात ठेंगा अमरावती : रबी २०१५-१६ हंगामात राष्ट्रीय कृषी पीक विमा काढलेल्या १५ हजार ८८९ शेतकऱ्यांपैकी १० हजार १९ शेतकऱ्यांना ५ कोटी ५० लाख ६४ हजार रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला. मार्च अखेरपावेतो बँकांद्वारा विमा भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होईल. गतवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे सार्वत्रिक नुकसान झाले. मात्र भातकुली, चांदूरबाजार, चिखलदरा व दर्यापूर तालुक्यात हरभऱ्यासाठी विमा मिळणार आहे. उर्वरित १० तालुक्यांना ठेंगा दाखविला आहे. गव्हासाठी अंजनगाव सुर्जी, भातकुली, चांदूरबाजार, चिखलदरा व वरूड तालुक्यातच विमा भरपाई मिळणार आहे. उर्वरित ९ तालुक्यांना डावलले गेल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. रबीत पूर, चक्रीवादळ, भूस्खलन व गारपीट या नैसर्गिक आपत्तीपासून पिकांना नुकसान भरपाई मिळावी, यासासाठी राष्ट्रीय कृषी विमा योजना जिल्ह्यात राबविण्यात आली. यामध्ये बागायती गव्हाकरिता ७५ महसूल मंडळ व हरभरासाठी ६४ महसूल मंडळात ही योजना होती. यात हरभरा पिकासाठी अचलपूर तालुक्यात १६०, अंजनगाव ७०२, भातकुली २१०५, चांदूरबाजार ३३८, चिखलदरा १०९, दर्यापूर ७९४९, धामणगाव २४०, धारणी १, मोर्शी ३९ व वरूड तालुक्यात १५९ शेतकऱ्यांनी विमा काढला होता. गव्हासाठी अचलपूर तालुक्यात २८, अमरावती ३३९, अंजनगाव सुर्जी ४५, भातकुली ७०, चांदूरबाजार ५०, चांदूररेल्वे ३७०, चिखलदरा १३७, धामणगाव ३२६, मोर्शी ४०, नांदगाव खंडेश्वर १६१७, तिवसा ३५५ व वरूड तालुक्यात १९३ शेतकऱ्यांनी विमा काढला होता. गव्हाला १० लाखांची विमा भरपाई भातकुली तालुक्यात ७० शेतकऱ्यांना ५८ हेक्टरसाठी एक लाख ४५ हजार १५७, अंजनगाव सुर्जी तालुक्यात ३३ शेतकऱ्यांना ३९ हेक्टर क्षेत्रासाठी २८ हजार ४५४, चांदूरबाजार तालुक्यात ५० शेतकऱ्यांना ४० हेक्टरसाठी एक लाख २२ हजार ३०७, चिखलदरा तालुक्यात १३७ शेतकऱ्यांना १२० हेक्टरसाठी ६ लाख ६१ हजार ९२१ व वरुड तालुक्यात १३० शेतकऱ्यांना २२० हेक्टरसाठी एक लाख १६ हजार १५५ रुपये असा एकूण १० लाख ७३ हजार ९९४ रुपयांची विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे. कांदा, उन्हाळी भूईमूग निरंकउन्हाळी भूईमुगासाठी अंजनगाव सुर्जी व तिवसा तसेच कांद्यासाठी अंजनगाव सुर्जी, चांदूरबाजार, चांदूररेल्वे, धामणगाव, मोर्शी व तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी रबी पीक विमा काढला होता. मात्र या तालुक्यातील एकाही शेतकऱ्याला विमा मंजूर झालेला नाही. विम्यात कंपनीद्वारा फसवणूक केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.