शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

४६९ पतसंस्था अडचणीत

By admin | Updated: March 28, 2017 00:04 IST

जिल्ह्यातील ४६९ पतसंस्था अडचणीत आल्या आहेत. त्यापैकी २०३४ ठेवीदारांना १७५ कोटी ३० लाखांची रक्कम देय आहे.

सहकार विभागाचा अहवाल : २०३४ ठेवीदारांना १७५ कोेटी रक्कम देय अमरावती : जिल्ह्यातील ४६९ पतसंस्था अडचणीत आल्या आहेत. त्यापैकी २०३४ ठेवीदारांना १७५ कोटी ३० लाखांची रक्कम देय आहे. तर ९६२ कर्जदारांकडून २०२ कोटी ११ लाखांचे कर्ज येणे असल्याचा सहकार विभागाचा अहवाल आहे.अचलपूर अर्बन को-आॅपरेटिव्ह बँक ४ नोव्हेंबर २००८ मध्ये अवसायनात काढण्यात आली. त्यावेळी ८५७ कोटी १३ लाखांच्या ठेवी होत्या. यामध्ये एक लाखाच्या आतील ४४२८ ग्राहकांच्या ५३० कोटी ८२ लाखांच्या ठेवी आहेत. एक लाखांवरील २१५ ग्राहकांच्या ३२६ कोटी ३१ लाखांच्या ठेवी आहेत. तसेच अवसायन तारखेस ८८६ कोटी ६२ लाखांचे कर्ज येणे बाकी असल्याचे अहवालात नमूद आहे. यापैकी सप्टेंबर २०१६ अखेर डीआयसीजीसीद्वारे मंजूर ५३० कोटी ८२ लाखांच्या रकमेपैकी ४८७ कोटी ८६ लाखांची रक्कम वितरित करण्यात आली. अवसायन दिनांकापासून १८१ कोटी ३३ लाखांची वसुली करण्यात आली. अडचणीत आलेल्या एकूण दोन संस्था आदेशित करण्यात येऊन ६१ कोटी ५५ लाखांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. यापैकी तीन पतसंस्थांशी संबंधित ५७ व्यक्तींवर गुन्हे नोंदविले आहेत. ३१ मार्च २०१६ अखेर ३९६ कर्जदारांकडून ३४कोटी ४७ लाखांची वसुली करण्यात आली तर ९६२ कर्जदारांकडून २०२ कोटी ११ लाखांचे कर्ज येणे शिल्लक आहे. यामुळे या संस्था अडचणीत आल्याचे चित्र दिसून येत आहे. तीन संस्थांकडे ६१.५५ लाखांची जबाबदारी निश्चितअडचणीतील पतसंस्थांपैकी कलम ८८ अन्वये दोन संस्थांकडे ६१ कोटी ५५ लाखांची शिल्लक वसुलपात्र रक्कम आहे. यामध्ये शेंदुरजनाघाट येथील लोकसेवा नागरी सहकारी संस्थेची चौकशी पूर्ण झाली. यामध्ये सात व्यक्तींवर १३ कोटी १६ लाखांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. वरुड येथील अर्बन क्रेडीट को आॅपरेटिव्ह संस्थांमधील ३ व्यक्तींवर ४८ कोटी ३९ लाखांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. वरुडच्या समृद्धी पतसंस्थेचा अहवाल निरंक आहे. शासनाच्या अर्थसहाय्यापैकी ८.१७ लाखांची वसुली बाकीशासनाने यातीन संस्थांना २०० कोटी बिनव्याजी अर्थसहाय्य केले होते. यापैकी ४५.२३ लाखांचे अर्थसहाय्य ठेवीदारांना वाटप करण्यात आले. शासनाने संस्थेला दिलेल्या अर्थसहाय्यापैकी ८ कोटी १७ लाखांची वसुली फेब्रुवारी २०१७ अखेर व्हावयाची आहे. वसूल करायची एकूण रक्कम ३७ कोटी ६ लाख रुपये आहे. तीन संस्था अवसायनात, ५७ व्यक्तींवर गुन्हे दाखलजिल्ह्यातील ४६९ पतसंस्था अडचणीत आहेत. त्यापैकी वरुड तालुक्यातील तीन संस्थांचा समावेश आहे. येथे सन २०१६ अखेर या तीन्ही पतसंस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत व ५७ व्यक्तींना अटक करण्यात आली होती. हीप्रकरणे दिवाणी न्यायालयात न्यायप्रविष्ट आहेत. यासंस्थांची नोंदणी रद्द करून त्या अवसायनात काढण्यात आल्या आहेत.