शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडात यंदा ३०३ शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:13 IST

अमरावती : पश्चिम विदर्भात कोरोना संसर्गामुळे यंदा जानेवारी ते एप्रिलदरम्यान ३,१५२ संक्रमितांचा मृत्यू झालेला असताना, याच कालावधीत ३०३ शेतकऱ्यांनीही ...

अमरावती : पश्चिम विदर्भात कोरोना संसर्गामुळे यंदा जानेवारी ते एप्रिलदरम्यान ३,१५२ संक्रमितांचा मृत्यू झालेला असताना, याच कालावधीत ३०३ शेतकऱ्यांनीही मृत्यूला कवटाळले. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अहवालावरून ही स्थिती स्पष्ट झाली आहे.

अमरावती विभागातील शेतकरी आत्महत्याप्रवण पाचही जिल्ह्यासह नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांची नोंद सन २००१ पासून येथील विभागीय आयुक्त कार्तयालयात नियमितपणे घेतली जाते. सन २००१ ते एप्रिल २०२१ या कालावधीत या सहा जिल्ह्यांत तब्बल १८,६२५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. यामध्ये ८,४०३ शेतकरी आत्महत्या शासनमदतीसाठी पात्र ठरल्या आहेत. याशिवाय ८,४७३ प्रकरणे शासनस्तरावर नामंजूर करण्यात आली आहेत. अद्याप ३०४ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.

थकीत कर्ज, खासगी सावकारांचा व बँकाचा कर्जासाठी तगादा, नापिकी, आपत्तीमुळे नुकसान, मुला-मुलीचे शिक्षण, लग्न आदींमुळे शेतकऱ्याच्या संघर्षावर नैराश्याने मात केल्याचे दिसून येते. जगावे कसे, या विवंचनेत पश्चिम विभागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. शासनाने विविध योजनांद्वारे शेतकऱ्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला जात असला तरी गरजू शेतकऱ्यांपर्यंत योजनांचा लाभ मिळत नसल्याचे वास्तव आहे

बॉक्स

जिल्हानिहाय शेतकरी आत्महत्यांची स्थिती

यंदाच्या चार महिन्यात अमरावती जिल्ह्यात ५४, अकोला ३७, यवतमाळ ८३, बुलडाणा ७३, वाशिम १६, तर वर्धा जिल्ह्यात ४० शेतकऱ्यांनी मृत्यूचा घोट घेतला आहे. शेतकरी आत्महत्या थांबण्यासाठी असलेल्या ‘शेतकरी मिशन’चे कामही या दोन वर्षांत थंडबस्त्यात पडले आहे, तर जिल्हास्तरावर प्रकरणे निकाली काढण्यासाठी चार-सहा महिने मीटिंगदेखील होत नसल्याने शेकडो प्रकरणे प्रलंबित आहेत.