शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
8
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
9
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
10
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
11
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
12
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
13
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
14
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
15
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
17
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
18
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
19
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
20
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
Daily Top 2Weekly Top 5

३०० गावे एसटीविना!

By admin | Updated: January 4, 2015 23:04 IST

महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येऊन ५५ वर्षे झालीत. परंतु गाव तेथे एसटी हे ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसची अद्यापही अनेक गावांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

ग्रामस्थांच्या नशिबी पायपीटच : विद्यार्थ्यांसह वृध्द प्रवाशांचे प्रचंड हाल
अमरावती : महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येऊन ५५ वर्षे झालीत. परंतु गाव तेथे एसटी हे ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसची अद्यापही अनेक गावांना प्रतीक्षा करावी लागत आहे.
बॉम्बे परिवहन महामंडळाचे १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात रूपांतर झाले. तेव्हापासून गाव पातळीपर्यंत एसटी बस पोहोचवण्याचा प्रयत्न महामंडळाने केला. ज्या ठिकाणी रेल्वे सेवा पोहोचू शकत नाही. त्या गावातील नागरिकांना प्रवासासाठी एसटीशिवाय पर्याय नाही. एसटीचा प्रवास सुरक्षित समजला जातो. त्यामुळे ग्रामीण भागातील लोक मोठ्या आशेने गाव फाट्यावर एसटीच्या प्रतीक्षेत असतात. ५० वर्षांच्या खडतर प्रवासात गाव तेथे एसटी या ब्रिदवाक्याचे तीनतेरा वाजले. तालुक्यांमध्ये १९८१ गावे आहेत. यातील जवळपास २०० गावे अद्याप सार्वजनिक दळणवळणा पासून दूर आहेत. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांची कसरत
थेट गावात एसटी पोहोचत नसल्याने आबालवृद्धांना दोन ते तीन किलोमिटरची पायपीट करत फाटा गाठावा लागतो. याचा फटका भावी पिढीला बसत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना काही किमी अंतर पायी जाऊन शाळा गाठावी लागते. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे या भागात एसटीची सेवा सुरू होणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांनी अनेकदा निवेदने दिली आहेत.
जीव धोक्यात घालून प्रवास
गावात एसटीची सेवा उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना प्रवासासाठी खासगी वाहनांचा उपयोग करावा लागतो. खासगी प्रवासी वाहतूकदारांमध्ये स्पर्धा होते. त्यामुळे क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविले जातात. परिणामी ग्रामस्थांना धोक्याचा सामना करावा लागतो.
बस न पाठविण्याची कारणे
जिल्ह्यातील अनेक गावे अशी आहेत जेथे फाट्यापासून गावाचे अंतर जवळ आहे. नदी किंवा नाले आडवे येतात. तसेच त्या गावांतील रस्त्यांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. काही गावांमधून एसटीला जास्त उत्पन्न मिळत नसल्यामुळे अशा ठिकाणची सेवा बंद करण्यात आलेली आहे.