शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

२९६ जणांनी पगारवाढ स्वीकारली; २१५० कडून नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2021 05:00 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या  शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी तीन आठवड्यापासून एसटी कर्मचारी संपवार आहेत. सरकारसोबत वारंवार चर्चाही झाली. यामध्ये परिवहन मंत्र्यांनी  एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढीची घोषणा केली. तसा शासनाने निर्णयही जारी केला. मात्र, जिल्ह्यातील २४४१ एसटी कर्मचाऱ्यांपैकी केवळ २९६ कर्मचाऱ्यांनी पगारवाढ स्वीकारून कामावर रुजू झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य परिवहन महामंडळाचे  कर्मचारी तीन आठवड्यांपासून संपवार आहेत. शासनाने भरघोस पगारवाढ दिल्यानंतर अमरावती विभागातील २ हजार ४४१ कर्मचाऱ्यांपैकी २९६ कर्मचारी कामावर परतले. २१५० कर्मचाऱ्यांनी पगारवाढीवर नाखुशी दर्शविली. त्यामुळे अजूनही हे कर्मचारी कामावर परतले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील आठ एसटी आगारातील ६६७ बसेसची चाके थांबलेलीच आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या  शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी तीन आठवड्यापासून एसटी कर्मचारी संपवार आहेत. सरकारसोबत वारंवार चर्चाही झाली. यामध्ये परिवहन मंत्र्यांनी  एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढीची घोषणा केली. तसा शासनाने निर्णयही जारी केला. मात्र, जिल्ह्यातील २४४१ एसटी कर्मचाऱ्यांपैकी केवळ २९६ कर्मचाऱ्यांनी पगारवाढ स्वीकारून कामावर रुजू झाले. परिणामी ३६७ बस आगारात असताना केवळ अमरावती आगारातून गुरुवारी अमरावती-वरूड आणि वरूड-अमरावती या दोन एसटी बसच्या फेऱ्या सोडण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी दिली. खासगी प्रवासी वाहतुकीला कंटाळलेल्या प्रवाशांनाही एसटीची चाके गतिमान हवी आहेत. 

२९६ जणांनी स्वीकारली पगार वाढअमरावती विभागातील २४४१ एसटी कर्मचाऱ्यांपैकी २१५० कर्मचारी एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी संपवार आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी शासनाची पगारवाढ नाकारली आहे. कामावर परतलेल्या  २९६ कर्मचाऱ्यांपैकी १५ कर्मचारी रीतसर रजेवर आहेत. प्रत्यक्षात २८१ कर्मचारी कामावर आले आहेत. यामध्ये यांत्रिकी, नऊ कार्यालयीन चालक, प्रशासकीय, पर्यक्षकीय आणि अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे एसटी महामंडळाचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

खासगी गाड्यांची सवय झाली 

एसटी बसेस जवळपास महिना होत आहे. बंद आहेत. त्यामुळे गावखेड्यातून शहरात जायचे झाल्यास नाइलाजास्तव खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. त्यामुळे सरकारने यावर तोडगा काढून हा प्रश्न सोडवावा.- विलास रेहपांडे, प्रवासी

एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटीचे कर्मचारी संपावर आहेत. बस बंद असल्याने खासगी वाहने जादा भाडे आकारून प्रवाशाची आर्थिक पिळवणूक करीत आहेत. त्यामुळे बसेस सुरू होणे आवश्यक आहे.- मोहन बैलके,प्रवासी

 

टॅग्स :state transportएसटीStrikeसंप