शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

२९६ जणांनी पगारवाढ स्वीकारली; २१५० कडून नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2021 05:00 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या  शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी तीन आठवड्यापासून एसटी कर्मचारी संपवार आहेत. सरकारसोबत वारंवार चर्चाही झाली. यामध्ये परिवहन मंत्र्यांनी  एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढीची घोषणा केली. तसा शासनाने निर्णयही जारी केला. मात्र, जिल्ह्यातील २४४१ एसटी कर्मचाऱ्यांपैकी केवळ २९६ कर्मचाऱ्यांनी पगारवाढ स्वीकारून कामावर रुजू झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य परिवहन महामंडळाचे  कर्मचारी तीन आठवड्यांपासून संपवार आहेत. शासनाने भरघोस पगारवाढ दिल्यानंतर अमरावती विभागातील २ हजार ४४१ कर्मचाऱ्यांपैकी २९६ कर्मचारी कामावर परतले. २१५० कर्मचाऱ्यांनी पगारवाढीवर नाखुशी दर्शविली. त्यामुळे अजूनही हे कर्मचारी कामावर परतले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील आठ एसटी आगारातील ६६७ बसेसची चाके थांबलेलीच आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या  शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी तीन आठवड्यापासून एसटी कर्मचारी संपवार आहेत. सरकारसोबत वारंवार चर्चाही झाली. यामध्ये परिवहन मंत्र्यांनी  एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढीची घोषणा केली. तसा शासनाने निर्णयही जारी केला. मात्र, जिल्ह्यातील २४४१ एसटी कर्मचाऱ्यांपैकी केवळ २९६ कर्मचाऱ्यांनी पगारवाढ स्वीकारून कामावर रुजू झाले. परिणामी ३६७ बस आगारात असताना केवळ अमरावती आगारातून गुरुवारी अमरावती-वरूड आणि वरूड-अमरावती या दोन एसटी बसच्या फेऱ्या सोडण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी दिली. खासगी प्रवासी वाहतुकीला कंटाळलेल्या प्रवाशांनाही एसटीची चाके गतिमान हवी आहेत. 

२९६ जणांनी स्वीकारली पगार वाढअमरावती विभागातील २४४१ एसटी कर्मचाऱ्यांपैकी २१५० कर्मचारी एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी संपवार आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी शासनाची पगारवाढ नाकारली आहे. कामावर परतलेल्या  २९६ कर्मचाऱ्यांपैकी १५ कर्मचारी रीतसर रजेवर आहेत. प्रत्यक्षात २८१ कर्मचारी कामावर आले आहेत. यामध्ये यांत्रिकी, नऊ कार्यालयीन चालक, प्रशासकीय, पर्यक्षकीय आणि अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे एसटी महामंडळाचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

खासगी गाड्यांची सवय झाली 

एसटी बसेस जवळपास महिना होत आहे. बंद आहेत. त्यामुळे गावखेड्यातून शहरात जायचे झाल्यास नाइलाजास्तव खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. त्यामुळे सरकारने यावर तोडगा काढून हा प्रश्न सोडवावा.- विलास रेहपांडे, प्रवासी

एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटीचे कर्मचारी संपावर आहेत. बस बंद असल्याने खासगी वाहने जादा भाडे आकारून प्रवाशाची आर्थिक पिळवणूक करीत आहेत. त्यामुळे बसेस सुरू होणे आवश्यक आहे.- मोहन बैलके,प्रवासी

 

टॅग्स :state transportएसटीStrikeसंप