शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

पश्चिम विदर्भातील २८ प्रकल्प ओव्हरफ्लो; जुलैपासूनच्या दमदार पावसामुळे सरासरी ९० टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2022 12:11 IST

पश्चिम विदर्भात सप्टेंबर महिन्यात अपेक्षित सरासरीच्या २४८.५ टक्के पाऊस झालेला आहे.

अमरावती : जुलैपासून सुरू असलेली पावसाची रिपरिप, अतिवृष्टी यामुळे पश्चिम विदर्भात सरासरीच्या १२१.४ टक्के पावसाची नोंद झालेली आहे. हा पाऊस तहानलेल्या प्रकल्पाच्या पथ्यावर पडला आहे. सद्यस्थितीत विभागातील नऊ मुख्य, २७ मध्यम व २७५ लघुप्रकल्पांत ९० टक्के जलसाठा आहे. यामध्ये २८ प्रकल्पात पूर्ण जलसंचय झाल्याने नदी-नाल्यांमध्ये विसर्ग सुरू आहे.

पश्चिम विदर्भात सप्टेंबर महिन्यात अपेक्षित सरासरीच्या २४८.५ टक्के पाऊस झालेला आहे. याशिवाय १ जून ते १३ सप्टेंबरपर्यंत ६७६ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ८२१ मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये अकोला जिल्हा वगळता अमरावती, यवतमाळ, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांनी पावसाची सरासरी पार केलेली आहे.

विभागातील मुख्य प्रकल्पांमध्ये ऊर्ध्व वर्धा प्रकल्पांत ९८ टक्के जलसाठा असून सर्वच १३ ही दरवाजे १७० सेंमीने उघडण्यात आलेले आहे. घुस प्रकल्पाचे दरवाजे २३ सेंमी, अरुणावतीचे तीन गेट २० सेंमी, बेंबळा प्रकल्पाचे २० गेट २५ सेंमी, काटेपूर्णा प्रकल्पाचे दोन गेट १५ सेंमी, पेनटाकळी प्रकल्पाचे दोन गेट १० सेंमी तर खडकपूर्णाचे तीन गेट ३० सेंमीने उघडण्यात येऊन विसर्ग सुरू आहे. याशिवाय २१ मध्यम प्रकल्पांमधून ही विसर्ग सुरू आहे.

रबीला फायदा, पाणीटंचाईची शक्यता कमी

अमरावती विभागात मार्च महिन्यापर्यंत साधारणपणे ९०० गावांमध्ये पाणीटंचाई असते. यंदा सततच्या पावसामुळे भूजलाचे पुनर्भरण झाल्याने भूजलस्तरात वाढ झालेली आहे. पाण्याच्या स्त्रोतांमध्ये मुबलक साठा आहे. त्यामुळे मे पश्चातच उंच भागावरील काही गावात पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता आहे. याशिवाय रब्बी पिकांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध राहणार आहे.

भंडाऱ्यातील १४ मार्ग ठप्प, वैनगंगा फुगली

भंडारा जिल्ह्यात मंगळवारी तिसऱ्या दिवशीही सर्वदूर पाऊस कोसळला. या पावसाने नदी-नाल्यांना पूर आला असून, १४ ग्रामीण रस्ते बंद झाले होते. गत २४ तासांत ७२.८ मिमी. पावसाची नोंद झाली असून, १३ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. रविवारी दुपार पासूनच पावसाला सुरुवात झाली. सोमवारी पहाटे ४.३० पासून सर्वदूर जोरदार पाऊस कोसळला. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून, १४ मार्ग बंद पडले आहेत.

वैनगंगेच्या जल पातळीत वाढ झाली. मंगळवारी दुपारी ४ वाजता भंडारालगत कारधा येथे २४३.९४ मीटर पाणीपातळी नोंदविण्यात आली. भंडारा शहरातील सखल भागातील अनेक घरांत पाणी शिरले असून, ग्रामीण भागातील काही घरांची पडझड झाली आहे. सतत पाऊस पडत असल्याने गोसेखुर्द प्रकल्पाच्या जल पातळीत वाढ होत आहे. पाणी नियंत्रणासाठी या प्रकल्पाचे सर्व ३३ दरवाजे सोमवार सायंकाळपासून उघडण्यात आले आहे. या प्रकल्पातून ६ हजार ९९७ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. २३ गेट एक मीटरने, तर १० गेट अर्ध्या मीटरने उघडण्यात आली आहेत.

गोंदिया जिल्ह्यात संततधार...

गोंदिया जिल्ह्यात संततधार मंगळवारीही संततधार पावसाने हजेरी लावली. गोंदिया तालुक्यात १००.२३ मिलीमीटर पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद झाली, तर तिरोडा आणि सालेकसा तालुक्यात सुद्धा दमदार पाऊस झाला. अर्जुनी मोरगाव तालुक्यात सोमवारी अतिवृष्टी झाल्याने या तालुक्यातील काही मार्ग मंगळवारी दुसऱ्या दिवशी बंद होते. केशोरी परिसर जलमय झाल्याचे चित्र होते. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यवतमाळात रिमझिम

दोन दिवसांच्या दमदार पावसानंतर मंगळवारी सायंकाळनंतर यवतमाळ शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत रिमझिम पावसाने हजेरी लावली. दरम्यान, मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात १५.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणीRainपाऊसVidarbhaविदर्भ