शहरं
Join us  
Trending Stories
1
उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
2
इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी ४५ दिवसांसाठी वाढवली; गाझामध्ये हमासचा लष्करप्रमुख ठार
3
आजचे राशीभविष्य - १६ मे २०२६, मोठा आर्थिक लाभ होणार; नवीन कामे पूर्ण होणार
4
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
5
अग्रलेख: महागाईच्या आगीत तेल! सर्वसामान्यांच्या खिशावरच टाच 
6
मुलाखत: ‘कार्व्हर’, अजूनही लोकांना काही ना काही देतोच!
7
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
8
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
9
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
10
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
11
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
12
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
13
भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  
14
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
15
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
16
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
17
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
18
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
19
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
20
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
Daily Top 2Weekly Top 5

२० अनुकंपाधारक भरतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला

By admin | Updated: December 9, 2014 22:42 IST

महापालिकेत मनुष्यबळाची कमतरता जाणवू लागल्याने प्रशासकीय कामकाज हाताळणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनुकंपा तत्त्वावरील रिक्त जागा भरण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी नव्याने शासनाकडे पाठविला आहे.

अमरावती : महापालिकेत मनुष्यबळाची कमतरता जाणवू लागल्याने प्रशासकीय कामकाज हाताळणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनुकंपा तत्त्वावरील रिक्त जागा भरण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी नव्याने शासनाकडे पाठविला आहे. अनुकंपा तत्त्वावरील जागाभरतीला मंजुरी मिळताच पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती आहे.
सध्या महापालिका आस्थापनेवर सुमारे १७०० कर्मचारी कार्यरत आहेत. तर २६०० कर्मचारी सेवानिवृत्त आहेत. मात्र, आस्थापना खर्च हा ५५ टक्क्यांच्या वर असल्याने शासनाकडून नियमित कर्मचारी भरतीला मंजुरी मिळत नाही. परंतु कारभार चालविताना कर्मचाऱ्यांच्या तुटवड्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. सुमारे ८०४ पदे रिक्त आहेत. शासनाच्या मंजुरीशिवाय त्या जागा भरणे शक्य नसल्याचे वास्तव आहे. परिणामी काही कर्मचाऱ्यांचे प्रशासकीय कामकाजात सहकार्य मिळावे, याकरिता अनुकंपा तत्त्वावरील २० कर्मचाऱ्यांची भरती करण्याला शासनाने मंजुरी द्यावी, याबाबतचा प्रस्ताव पाठविला आहे.
हल्ली कर्मचाऱ्यांची वानवा असल्याने एका अधिकाऱ्याकडे चार ते पाच विभागाचे कामकाज सोपवून कारभार हाकावा लागत आहे.
या महिन्याच्या अखेरीस आठ ते दहा कर्मचारी सेवानिवृत्त होत असून या कर्मचाऱ्यांकडे असलेली जबाबदारी कुणाकडे सोपवावी? या विवंचनेत प्रशासन आले आहे. नवीन कर्मचारी भरती प्रक्रियेला बंदी तर दर महिन्याला दोन ते तीन कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्यामुळे नागरी सेवा पुरविताना प्रशासनाची दमछाक होत आहे. त्यामुळे आयुक्तांच्या आदेशानुसार सामान्य प्रशासन विभागाने २० अनुकंपाधारकांना सेवेत समाविष्ट करुन घेण्यासाठी शासनाकडे मंजुरीचा प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळताच अनुकंपाधारकांना न्याय मिळण्याची दाट शक्यता आहे. गेल्या काही वर्षांपासून अनुकंपाधारक उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षेत असून ते महापालिकेच्या पायऱ्या झिजवित आहेत. आयुक्तांनी घेतलेल्या या निर्णयामुळे अनुकंपाधारकांना नोकरीत सामावून घेण्याची आशा पल्लवीत झाली आहे. त्याकरिता केवळ शासनाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. याबाबत काय निर्णय घेण्यात येतो, याकडे आता अनुकंपाधारकांचे लक्ष लागले आहे. लवकरच निर्णय पारित होऊ शकतो. (प्रतिनिधी)