शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

१६ वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी रूजू होण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:13 IST

अमरावती : राज्यात वनविभागात १६ वन परिक्षेत्राधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश यापूर्वी निर्गमित झाले. मात्र, हे आरएफओे पदस्थापनेच्या जागी रुजू झाले ...

अमरावती : राज्यात वनविभागात १६ वन परिक्षेत्राधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश यापूर्वी निर्गमित झाले. मात्र, हे आरएफओे पदस्थापनेच्या जागी रुजू झाले नाहीत. त्यामुळे तत्काळ बदलीच्या जागी रुजू व्हावेेत, असे आदेश प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी १५ मार्च रोजी जारी केले आहेत. रुजू न होणाऱ्या आरएफओ गट - ब (राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू न होणे ही बाब महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम २३ चे उल्लंघन करणारी असल्यामुळे ती गैरवर्तणूक समजली जाईल, असे आदेशात नमूद आहे. १० ऑगस्ट २०२० रोजी आदेशानुसार बदलीच्या ठिकाणी रुजू होणे आवश्यक होते. मात्र, आता आरएफओंनी पदस्थापनेच्या जागी रुजू न झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विकास गुप्ता यांनी सांगितले.

यात बंडू चिडे (गोंदिया), भाविक चिवंडे (नवेगाव नागिझरा), रत्नाकर निखाडे (नवेगाव नागझिरा), सिद्धेश्र्वर परिहार (प्रमुख मुख्य वनसंरक्षक कार्यालय), राजीव वैद्य (सामाजिक वनीकरण, वर्धा), रवींद्र चौधरी (ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प), उल्हास चव्हाण (भामरागड), मंगेश सातभाई (वडसा, गडचिरोली), विलास पवळे (सामाजिक वनीकरण, ईंदापूर), राघू आटोळे (सामाजिक वनीकरण, पंढरपूर) कल्याण साबळे (सामाजिक वनीकरण सातारा), भगवंत मेश्राम (वन्यजीव पांढरकवडा), पांडुरंग पाटील (पिंपळनेर, धुळे), कैलास सोनवणे (देवझिरी, यावल), ज्ञानेश्वर बेंडकुळे (जालना, धुळे), योगेश सातपुते (सिंधुदूर्ग, कोल्हापूर) यांचा समावेश आहे.