शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
2
"हे लोक अणुबॉम्बला एवढे घाबरत नाहीत, जेवढे...!" जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अरशद मदनी यांचं विधान
3
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
4
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
5
इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण
6
'मी खोटे काम केलं नाही!' छत्रपती संभाजीनगरची बोगस 'IAS' कल्पना भागवत अखेर 'बोलली'...
7
₹६७००००० चं टॉयलेट, ₹७६००० चा ब्रश अन्... किती श्रीमंत आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन? रहस्यमय आहे संपत्ती!
8
MS धोनीचा लाडका, वर्ल्डकपही खेळला; पण नंतर १० वर्ष संघाबाहेर बसला... अखेर क्रिकेटला रामराम
9
पुतिन यांच्या भारत दौऱ्यामुळे शेअर बाजारात खळबळ, 'हे' शेअर्स फोकसमध्ये राहणार...
10
Team India's New Jersey For T20 World Cup 2026: रोहितनं दाखवली टीम इंडियाची नवी जर्सी; कॉलरवरील तिरंगा चर्चेत!
11
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
12
सायको काकी! सुंदर मुलांचा काटा काढायची अन् पार्टी करायची, स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही
13
India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!
14
एलॉन मस्कची धडकी भरवणारी भविष्यवाणी, म्हणाला- येत्या काळात महायुद्ध अटळ! २०३० पर्यंत...
15
हाहाकार! जमिनीतून अचानक विषारी गॅस बाहेर पडू लागला; धनबादमध्ये मुलाचा मृत्यू, शेकडो पक्षी दगावले
16
फोनचा पासवर्ड विसरलात? सर्व्हिस सेंटरला जायची गरज नाही; 'अशा' प्रकारे ५ मिनिटांत घरबसल्या करू शकता अनलॉक!
17
गुरुनिष्ठेचा आदर्श, रामदास स्वामींचे दर्शन; संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे श्रीधर स्वामी!
18
चमत्कार! कडाक्याच्या थंडीत निर्दयी आईने रस्त्यावर फेकलं, भटक्या कुत्र्यांनी नवजात बाळाला वाचवलं
19
"भारताचे तुकडे झाले, तरच...!"; बांगलादेशच्या माजी लष्करी अधिकाऱ्याचे विषारी फुत्कार, कोण आहेत अब्दुल्लाहिल अमान आजमी?
20
Virat Kohli Century : किंग कोहलीचा 'शतकी रोमान्स'! रायपूरच्या मैदानातही विक्रमांची 'बरसात'
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील ६४ खेड्यांत पाणीबाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 16:02 IST

१५ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे.

- संतोष येलकर

अकोला: पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र महान येथील काटेपूर्णा धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याने, खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ खेड्यांना पावसाच्या पाण्याने भरलेल्या उन्नई बंधाऱ्यातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे; परंतु १५ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे पावसाळ्यातच जिल्ह्यातील खारपानपट्ट्यातील ६४ खेड्यांत पाणीबाणी निर्माण झाली आहे.महान येथील काटेपूर्णा धरणातून अकोला शहरासह खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ खेड्यांना पाणीपुरवठा करण्यात येतो. यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र काटेपूर्णा धरणात १९ आॅगस्ट रोजी सायंकाळपर्यंत केवळ ८.८५ टक्के जलसाठा उपलब्ध असल्याने, या धरणातून खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ खेड्यांना पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. पावसाच्या पाण्याने खांबोराजवळील उन्नई बंधारा भरला असल्याने, गत पंधरा दिवसांपासून या बंधाºयातून ६४ खेड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे; मात्र नळ योजनेंतर्गत १५ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पावसाळ्यातही पायपीट करावी लागत आहे. काही गावांत बोअरचे क्षारयुक्त पाणी तर काही गावांत टँकरचे पाणी विकत घेऊन ग्रामस्थांना तहान भागवावी लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यात खारपाणपट्ट्यातील ६४ खेड्यांमध्ये पावसाळ्यातच ‘पाणीबाणी’ची परिस्थिती निर्माण झाली आहे....तर भीषण जलसंकटाचा सामना करावा लागणार!पावसाच्या पाण्याने खांबोराजवळील उन्नई बंधारा भरला असून, या बंधाºयातून खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ खेड्यांना १५ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणीपुरवठा करण्यासाठी महिनाभर पुरेल एवढे पाणी सध्या या बंधाºयात उपलब्ध आहे. महान येथील काटेपूर्णा धरणात पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला नाही तर महिनाभरानंतर ६४ खेड्यातील ग्रामस्थांना भीषण जलसंकटाचा सामना करावा लागणार असल्याची स्थिती आहे.खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावात १५ ते २० दिवसाआड पिण्याचे पाणी मिळत आहे. त्यामुळे गावाजवळील बोअरच्या क्षारयुक्त पाण्यावर ग्रामस्थांना तहान भागवावी लागत आहे.- शिवाजीराव भरणेरामगाव, ता. अकोला.खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांत १५ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे टँकरद्वारे पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे.- गजानन शेंडेअध्यक्ष, तंटामुक्त गाव समिती, गोपालखेड.

पावसाच्या पाण्याने खांबोराजवळील उन्नई बंधारा भरला असून, या बंधाºयातून खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांना सध्या दहा दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. योजनेंतर्गत गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी एक महिनाभर पुरेल एवढा पाणीसाठा सध्या बंधाºयात उपलब्ध आहे.- अनिल चव्हाणशाखा अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, अकोला उपविभाग.

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईAkolaअकोला