शहरं
Join us  
Trending Stories
1
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
2
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
3
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
5
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
6
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
7
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
8
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
9
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
10
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
11
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
12
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
13
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
14
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
15
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
16
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
17
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
18
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
19
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
20
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...

अकोला जिल्ह्यातील ६४ खेड्यांत पाणीबाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 16:02 IST

१५ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे.

- संतोष येलकर

अकोला: पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र महान येथील काटेपूर्णा धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याने, खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ खेड्यांना पावसाच्या पाण्याने भरलेल्या उन्नई बंधाऱ्यातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे; परंतु १५ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे पावसाळ्यातच जिल्ह्यातील खारपानपट्ट्यातील ६४ खेड्यांत पाणीबाणी निर्माण झाली आहे.महान येथील काटेपूर्णा धरणातून अकोला शहरासह खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ खेड्यांना पाणीपुरवठा करण्यात येतो. यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र काटेपूर्णा धरणात १९ आॅगस्ट रोजी सायंकाळपर्यंत केवळ ८.८५ टक्के जलसाठा उपलब्ध असल्याने, या धरणातून खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ खेड्यांना पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. पावसाच्या पाण्याने खांबोराजवळील उन्नई बंधारा भरला असल्याने, गत पंधरा दिवसांपासून या बंधाºयातून ६४ खेड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे; मात्र नळ योजनेंतर्गत १५ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पावसाळ्यातही पायपीट करावी लागत आहे. काही गावांत बोअरचे क्षारयुक्त पाणी तर काही गावांत टँकरचे पाणी विकत घेऊन ग्रामस्थांना तहान भागवावी लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यात खारपाणपट्ट्यातील ६४ खेड्यांमध्ये पावसाळ्यातच ‘पाणीबाणी’ची परिस्थिती निर्माण झाली आहे....तर भीषण जलसंकटाचा सामना करावा लागणार!पावसाच्या पाण्याने खांबोराजवळील उन्नई बंधारा भरला असून, या बंधाºयातून खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ खेड्यांना १५ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणीपुरवठा करण्यासाठी महिनाभर पुरेल एवढे पाणी सध्या या बंधाºयात उपलब्ध आहे. महान येथील काटेपूर्णा धरणात पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला नाही तर महिनाभरानंतर ६४ खेड्यातील ग्रामस्थांना भीषण जलसंकटाचा सामना करावा लागणार असल्याची स्थिती आहे.खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावात १५ ते २० दिवसाआड पिण्याचे पाणी मिळत आहे. त्यामुळे गावाजवळील बोअरच्या क्षारयुक्त पाण्यावर ग्रामस्थांना तहान भागवावी लागत आहे.- शिवाजीराव भरणेरामगाव, ता. अकोला.खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांत १५ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे टँकरद्वारे पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे.- गजानन शेंडेअध्यक्ष, तंटामुक्त गाव समिती, गोपालखेड.

पावसाच्या पाण्याने खांबोराजवळील उन्नई बंधारा भरला असून, या बंधाºयातून खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांना सध्या दहा दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. योजनेंतर्गत गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी एक महिनाभर पुरेल एवढा पाणीसाठा सध्या बंधाºयात उपलब्ध आहे.- अनिल चव्हाणशाखा अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, अकोला उपविभाग.

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईAkolaअकोला