शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
2
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदौरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
3
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
4
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
5
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
6
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
7
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
8
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
9
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
10
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
11
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
12
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
13
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
14
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
15
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
16
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
17
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
18
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
19
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
20
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ

अकोला जिल्ह्यातील ६४ खेड्यांत पाणीबाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 16:02 IST

१५ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे.

- संतोष येलकर

अकोला: पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र महान येथील काटेपूर्णा धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याने, खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ खेड्यांना पावसाच्या पाण्याने भरलेल्या उन्नई बंधाऱ्यातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे; परंतु १५ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे पावसाळ्यातच जिल्ह्यातील खारपानपट्ट्यातील ६४ खेड्यांत पाणीबाणी निर्माण झाली आहे.महान येथील काटेपूर्णा धरणातून अकोला शहरासह खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ खेड्यांना पाणीपुरवठा करण्यात येतो. यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र काटेपूर्णा धरणात १९ आॅगस्ट रोजी सायंकाळपर्यंत केवळ ८.८५ टक्के जलसाठा उपलब्ध असल्याने, या धरणातून खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ खेड्यांना पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. पावसाच्या पाण्याने खांबोराजवळील उन्नई बंधारा भरला असल्याने, गत पंधरा दिवसांपासून या बंधाºयातून ६४ खेड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे; मात्र नळ योजनेंतर्गत १५ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पावसाळ्यातही पायपीट करावी लागत आहे. काही गावांत बोअरचे क्षारयुक्त पाणी तर काही गावांत टँकरचे पाणी विकत घेऊन ग्रामस्थांना तहान भागवावी लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यात खारपाणपट्ट्यातील ६४ खेड्यांमध्ये पावसाळ्यातच ‘पाणीबाणी’ची परिस्थिती निर्माण झाली आहे....तर भीषण जलसंकटाचा सामना करावा लागणार!पावसाच्या पाण्याने खांबोराजवळील उन्नई बंधारा भरला असून, या बंधाºयातून खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ खेड्यांना १५ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणीपुरवठा करण्यासाठी महिनाभर पुरेल एवढे पाणी सध्या या बंधाºयात उपलब्ध आहे. महान येथील काटेपूर्णा धरणात पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला नाही तर महिनाभरानंतर ६४ खेड्यातील ग्रामस्थांना भीषण जलसंकटाचा सामना करावा लागणार असल्याची स्थिती आहे.खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावात १५ ते २० दिवसाआड पिण्याचे पाणी मिळत आहे. त्यामुळे गावाजवळील बोअरच्या क्षारयुक्त पाण्यावर ग्रामस्थांना तहान भागवावी लागत आहे.- शिवाजीराव भरणेरामगाव, ता. अकोला.खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांत १५ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे टँकरद्वारे पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे.- गजानन शेंडेअध्यक्ष, तंटामुक्त गाव समिती, गोपालखेड.

पावसाच्या पाण्याने खांबोराजवळील उन्नई बंधारा भरला असून, या बंधाºयातून खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांना सध्या दहा दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. योजनेंतर्गत गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी एक महिनाभर पुरेल एवढा पाणीसाठा सध्या बंधाºयात उपलब्ध आहे.- अनिल चव्हाणशाखा अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, अकोला उपविभाग.

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईAkolaअकोला