शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण
2
₹6700000 चं टॉयलेट, ₹76000 चा ब्रश अन्... किती श्रीमंत आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन? रहस्यमय आहे संपत्ती!
3
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
4
सायको काकी! सुंदर मुलांचा काटा काढायची अन् पार्टी करायची, स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही
5
India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!
6
एलॉन मस्कची धडकी भरवणारी भविष्यवाणी, म्हणाला- येत्या काळात महायुद्ध अटळ! २०३० पर्यंत...
7
हाहाकार! जमिनीतून अचानक विषारी गॅस बाहेर पडू लागला; धनबादमध्ये मुलाचा मृत्यू, शेकडो पक्षी दगावले
8
फोनचा पासवर्ड विसरलात? सर्व्हिस सेंटरला जायची गरज नाही; 'अशा' प्रकारे ५ मिनिटांत घरबसल्या करू शकता अनलॉक!
9
गुरुनिष्ठेचा आदर्श, रामदास स्वामींचे दर्शन; संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे श्रीधर स्वामी!
10
चमत्कार! कडाक्याच्या थंडीत निर्दयी आईने रस्त्यावर फेकलं, भटक्या कुत्र्यांनी नवजात बाळाला वाचवलं
11
"भारताचे तुकडे झाले, तरच...!"; बांगलादेशच्या माजी लष्करी अधिकाऱ्याचे विषारी फुत्कार, कोण आहेत अब्दुल्लाहिल अमान आजमी?
12
Virat Kohli Century : किंग कोहलीचा 'शतकी रोमान्स'! रायपूरच्या मैदानातही विक्रमांची 'बरसात'
13
मोठी उलथापालथ! ओला इलेक्ट्रीक रसातळाला पोहोचली; नोव्हेंबरच्या रेसमध्ये बाहेर फेकली गेली 
14
कोहली-ऋतुराजचा शतकी धमाका; KL राहुलचं अर्धशतक! टीम इंडियानं द. आफ्रिकेसमोर ठेवलं ३५९ धावांचे लक्ष्य
15
मोठी बातमी! 26/11 हल्ल्यावेळी दहशतवाद्यांशी लढलेले IPS अधिकारी सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक
16
मायेचं नातं! १२ वर्षांनंतर मुलीने पहिल्यांदाच ऐकला आईचा आवाज; डोळे पाणावणारा Video
17
तुमचे पैसे SBI, HDFC किंवा ICICI बँकेत असेल तर खुशखबर! RBI ने 'या' ३ बँकांसाठी केली मोठी घोषणा
18
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ‘असे’ करा पूजन; पाहा, शुभ मुहूर्त, सोपा विधी अन् काही मान्यता!
19
५ मुलांची आई भंगारवाल्याच्या प्रेमात पडली! वयाचाही विचार केला नाही; पतीसमोर बांधली दुसरी लग्नगाठ
20
Ruturaj Gaikwad Maiden Century : पुणेकरानं संधीचं सोनं करुन दाखवलं! या कारणामुळं ऋतुराजची पहिली सेंच्युरी ठरते खास
Daily Top 2Weekly Top 5

अकोलेकरांवर जलसंकटाचे सावट; महान धरणात 6.06 टक्के जलसाठा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 13:50 IST

शहरावर जलसंकट ओढवल्यास सद्यस्थितीत महापालिका प्रशासनाकडे कोणताही ठोस आराखडा तयार नाही.

- आशिष गावंडेअकोला: निम्मा पावसाळा उलटून गेल्यानंतरही शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महान (काटेपूर्णा प्रकल्प) धरणात अवघा 6.06 टक्के जलसाठा उपलब्ध असल्याची विदारक परिस्थिती आहे. त्यामुळे आगामी दीड महिन्यांत वाशिम जिल्ह्यात नेमका किती पाऊस बरसतो, यावरच महान धरण आणि अकोलेकरांना होणाºया पाणी पुरवठ्याचे भवितव्य अवलंबून आहे. या सर्व ‘जर-तर’ अशा शक्यता असल्या तरीही भविष्यात शहरावर जलसंकट ओढवल्यास सद्यस्थितीत महापालिका प्रशासनाकडे कोणताही ठोस आराखडा तयार नाही. प्रशासन तर सोडाच, खुद्द सत्ताधारी भाजपचेही या गंभीर विषयाकडे होणारे दुर्लक्ष शहरवासीयांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.अकोला शहराला काटेपूर्णा प्रकल्पातून (महान धरण) पाणी पुरवठा केला जातो. शहरवासीयांसाठी या धरणातून वर्षाकाठी २४ दलघमी जलसाठ्याची उचल करता येते. उर्वरित जलसाठा सिंचन व औद्योगिक वसाहतीमधील उद्योगांसाठी आरक्षित आहे. पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला असला तरी अद्याप काटेपूर्णा प्रकल्पाच्या जलसाठ्यात उण्यापुºया दीड टक्के जलसाठ्याची भर पडल्याचे समोर आले आहे. वाशिम आणि मालेगाव परिसरात दमदार पाऊस पडल्यास काटेपूर्णा प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ होते; परंतु यंदा वाशिम जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस न झाल्यामुळे या प्रकल्पात पुरेसा जलसाठा जमा झाला नसल्याची परिस्थिती आहे. आज रोजी या प्रकल्पात केवळ ५.५५ टक्के एवढा अत्यल्प जलसाठा उपलब्ध असून, यामधून अकोलेकरांना दोन ते अडीच महिन्यांपर्यंत पाणी पुरवठा करणे मनपाला शक्य होईल. अकोला व वाशिम जिल्ह्यात पावसाची एकूणच चिन्हे लक्षात घेता पावसाळ्यातील आगामी दीड महिन्यांच्या कालावधीत महान धरणाच्या जलसाठ्यात कितपत वाढ होईल, यावर शंका निर्माण झाली आहे. निश्चितच शहरावरील संभाव्य जलसंकटाचा सामना करण्यासाठी मनपा प्रशासनाकडून ठोस नियोजनाची गरज असताना त्यामध्ये अभाव असल्याचे समोर आले आहे.२००४ मधील ‘हायड्रंट’ निरुपयोगी२००४-०५ मध्ये शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मनपाने महान ते अकोलापर्यंत असलेल्या मुख्य जलवाहिनीच्या बाजूला सुमारे १०४ ‘हायड्रंट’ निर्माण केले होते. आज रोजी सदर हायड्रंट निरुपयोगी झाले आहेत. शिवाय, त्यामधून पाण्याचा उपसा करून मुख्य जलवाहिनीद्वारे शहरापर्यंत आणणे शक्य नसल्याचा तांत्रिक मुद्दा जलप्रदाय विभागाने उपस्थित केला आहे.

...तर जलसंकटाचे सावटवाशिम जिल्ह्यातील रिसोड, मालेगाव आदी भागात ‘धो धो’ पाऊस झाल्यानंतरच महान धरणात जलसंचय होतो. गतवर्षी पावसाळ्यात ऐन अखेरच्या टप्प्यात वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली होती. यंदा वाशिम जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यास अकोलेकरांना जलसंकटाचा सामना करावा लागेल.सत्ताधारी बघ्याच्या भूमिकेत!आज रोजी अकोलेकरांना दर सातव्या दिवशी पाणी पुरवठा केला जात आहे. धरणातील उपलब्ध जलसाठा व पावसाचा लहरीपणा ध्यानात घेता भविष्यातील संभाव्य जलसंकटावर मात करण्यासाठी सत्ताधारी भाजपने तातडीने जलप्रदाय विभागासोबत बैठकीचे आयोजन करणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात सत्ताधारी बघ्याच्या भूमिकेत दिसून येत आहेत.महान धरणातील जलसाठ्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. सप्टेंबर महिन्यात पावसाची अपेक्षा करायला हरकत नाही. तत्पूर्वी संभाव्य उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाला निर्देश दिल्या जातील.-विजय अग्रवाल, महापौर.

 

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरणAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका