शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धेतून निर्माण झालेले चैतन्य कामातून दाखवा!

By admin | Updated: January 19, 2015 02:47 IST

विभागीय आयुक्तांचे आवाहन; अकोला जिल्हा परिषद कर्मचा-यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धेचा समारोप.

अकोला: क्रीडा स्पर्धेतून निर्माण झालेला जोश व चैतन्य कर्मचार्‍यांनी कामातून दाखवावे आणि कामाचा दर्जा उंचवावा, असे आवाहन विभागीय आयुक्त ज्ञानेश्‍वर राजूरकर यांनी रविवारी येथे केले. अकोला जिल्हा परिषदेच्यावतीने शहरातील वसंत देसाई स्टेडियम येथे आयोजित जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाच्या समारोपप्रसंगी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लीनाथ कलशेट्टी, अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, यवतमाळ जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख, वाशिम जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य गोपाल कोल्हे, देवानंद गणोरकर, रवींद्र गोपकर, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे संचालक सुरेश चिंचोळकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार व्यासपीठावर उपस्थित होते. पुढे राजूरकर म्हणाले की, जिल्हा परिषदेत काम करणार्‍या कर्मचार्‍यांवर तणाव असतो. मात्र विभागीय क्रीडा स्पर्धेतून कर्मचार्‍यांमध्ये जोश आणि चैतन्य निर्माण झाले असेल, असे सांगत स्पर्धेतून निर्माण झालेल्या चैतन्यातून आता कर्मचार्‍यांनी काम करावे. स्वच्छता अभियानात लोकसहभाग वाढविण्याची गरज असून, त्यासाठी कर्मचार्‍यांनी काम करण्याची गरज आहे. कामाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करण्याचेही त्यांनी सांगितले. कर्मचार्‍यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी क्रीडा स्पर्धांंची गरज असून, या क्रीडा स्पर्धेतून निर्माण झालेल्या उज्रेतून कर्मचार्‍यांनी काम करावे आणि कामाच्या दृष्टीने अमरावती विभाग किमान चौथ्या क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करावा, असे मत यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लीनाथ कलशेट्टी यांनी यावेळी मांडले. कर्मचार्‍यांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी अशा स्पर्धांंचे आयोजन झाले पाहिजे, अशी अपेक्षा यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी, तर संचालन प्रकाश मानकर व मोंटू सिंग यांनी केले. आभार डॉ. मनोहर तुपकर यांनी मानले.