शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
3
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
4
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
5
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
6
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
7
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
8
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
9
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
10
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
11
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
12
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
13
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
14
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
15
Jaipur Couple Video: रोमान्समध्ये इतके झाले तल्लीन की..., जयपूरमधील कपलचा हॉटेलमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
16
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
17
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
18
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
19
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
20
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं

सरपंच, ग्रामसेवकांच्या संगनमताने ४ कोटींचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 15:56 IST

सर्वच ग्रामपंचायतींना विविध योजनांच्या प्राप्त निधीतून सरपंच, ग्रामसेवकांनी संगनमताने ४ कोटी ४० लाख रुपयांवर डल्ला मारला आहे.

- सदानंद सिरसाटलोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींना विविध योजनांच्या प्राप्त निधीतून सरपंच, ग्रामसेवकांनी संगनमताने ४ कोटी ४० लाख रुपयांवर डल्ला मारला आहे. लेखा परीक्षण अहवालानुसार अपहार झालेला निधी वसूल करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने गटविकास अधिकाऱ्यांना पत्र दिले तरी त्यातून काहीच निष्पन्न होत नसल्याचा प्रकारही घडत आहे. अपहारित रकमेत ७० टक्के सामान्य फंडातील आहे, हे विशेष.ग्रामपंचायतींना विविध विकास कामे करण्यासाठी शासनाच्या योजनांचा निधी मिळतो. त्याशिवाय, वित्त आयोगाचा निधी, मुद्रांक शुल्क, गौणखनिज स्वामित्वधनाची रक्कमही मिळते. सोबतच विविध कराच्या रूपात वसुली केली जाते. अनेक ग्रामपंचायतींमध्ये त्या रकमांच्या खर्चाचा हिशेब अद्ययावत नाही. लेखा परीक्षणाच्या काळात दस्तऐवजही उपलब्ध करून दिले जात नाहीत. त्यातच अनेक सरपंच, ग्रामसेवकांनी मनमानीपणे रक्कम काढून खर्च केल्याचे प्रकारही घडतात. गेल्या काही वर्षात घडलेल्या या सर्व बाबी नियमित लेखा परीक्षण अहवालात उघड झाल्या आहेत. त्यामध्ये वसूलपात्र रक्कम आणि जबाबदारीही निश्चित झाली आहे.सर्वच गावांतील सरपंच, ग्रामसेवकांकडून ती रक्कम वसूल करावी, याबाबतच्या नोटिसा पंचायत विभागाकडून सातत्याने दिल्या जात आहेत; मात्र पंचायत समित्यांमध्ये गटविकास अधिकारी स्तरावरून कारवाईच होत नसल्याची माहिती आहे. याप्रकरणी आता गटविकास अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची वेळ जिल्हा परिषद प्रशासनावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अपहारातील ७० टक्के रक्कम सामान्य फंडाचीलेखा परीक्षण अहवालात जिल्ह्यातील ५३७ ग्रामपंचायतींमध्ये अपहाराची ६४९ प्रकरणे उघड झाली आहेत. त्यामध्ये सामान्य फंड, जवाहर रोजगार योजना, जवाहर ग्राम रोजगार योजना, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनांचा समावेश आहे. त्या प्रकरणात एकूण ४ कोटी ३९ लाख ८६ हजार २९८ रुपयांचा अपहार झाला आहे.सामान्य फंडातून अपहार झाल्याचे ३७४ प्रकरणे असून, त्यामध्ये ३ कोटी ११ लाख ५,७४३ रुपयांवर डल्ला मारल्याचे उघड झाले आहे. अपहारातील सर्वच रक्कम ग्रामसेवक, सरपंचांकडून वसुलीची धडक मोहीम सुरू होणार आहे.अपहाराची सर्वाधिक प्रकरणे मूर्तिजापूरमध्ये

अपहार झाल्याची सर्वाधिक म्हणजे १५७ प्रकरणे मूर्तिजापूर पंचायत समितीमध्ये आहेत. त्यातील रक्कमही १ कोटी ७२ लाख रुपये आहे.तर सर्वात कमी म्हणजे, ५२ प्रकरणे पातूर पंचायत समितीमध्ये आहेत. त्यामध्ये २६ लाख ८ हजार रुपये वसूलपात्र आहेत. काही गटविकास अधिकाºयांनी ही रक्कम वसूल करण्याकडे कमालीचे दुर्लक्ष केले आहे.

टॅग्स :Akolaअकोलाgram panchayatग्राम पंचायत