शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

 रब्बी हंगामातील हरभऱ्याची वाढ खुंटली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 12:09 PM

पिकाची वाढ होण्यासाठी शेतकºयांनी विविध टॉनिक फवारणीचा प्रयत्न सुरू केल्याने त्यांचा खर्चही वाढला आहे.

अकोला : शेतकºयांनी यावर्षी उशिरा पेरणी केलेल्या रब्बी हंगामातील हरभºयांची वाढ खुंटल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. या पिकाची वाढ होण्यासाठी शेतकºयांनी विविध टॉनिक फवारणीचा प्रयत्न सुरू केल्याने त्यांचा खर्चही वाढला आहे.गतवर्षी पाऊस नोव्हेंबर महिन्यापर्यंत सुरू होता. शेतकºयांना शेतीची कोणतीच कामे करता न आल्याने शेतात प्रचंड तण वाढले होते. पाऊस गेल्यानंतर वापसा येण्यासाठी शेतकºयांना प्रतीक्षा करावी लागली. हरभरा पेरणी ही आॅक्टोबर व नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात करणे अपेक्षित असते. तथापि, यावर्षी डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत शेतकºयांनी पेरणी केली. म्हणजेच रब्बी पेरणीचा हंगाम एक महिना पुढे गेला. गहू पेरणी तर आणखी सुरू आहे; परंतु उशिरा केलेल्या पेरणीमुळे अनेक भागातील हरभरा पिकाची वाढ झाली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पीक वाढीसाठी शेतकरी या पिकावर विविध प्रकारची औषध (टॉनिक) फवारणी करीत आहे. काही भागात हरभरा पीक पिवळे पडत असल्याने बुरशीनाशक फवारणी करण्यात येत आहे. हरभºयाचे झाड वाढावीत, यासाठीचे विविध प्रयत्न करीत असताना घाटेअळीने तोंड वर काढले आहे. या अळीच्या व्यवस्थापनासाठी कीटकनाशकांची फवारणीही शेतकºयांना करावी लागत आहे.विदर्भात खरीप हंगामातील सोयाबीन, ज्वारी, मूग व उडीद ही नगदी पिके काढल्यानंतर शेतकरी गहू, हरभरा पिकांची पेरणी करतात. ज्यांच्याकडे संरक्षित सिंचनाची व्यवस्था आहे. त्या ठिकाणी शेतकरी गहू पेरणी करतात. हरभरा सहसा कोरडवाहूच घेतला जात; परंतु यावर्षी पेरण्यांना उशीर झाल्याने हरभºयाच्या झाडांची अपेक्षित वाढ झाली नसल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी तर अगदी लहान झाडांना फुलोरा आला आहे. याचा परिणाम पीक उत्पादनावर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी