शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

राज्यात टँकरची संख्या घटली; पाच वर्षांतील नीचांक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 9:35 AM

Akola News : टँकरची संख्या घटली असली, तरी नागरिकांनी पाण्याचे योग्य नियोजन करून त्याचा वापर कमी करण्याची गरज आहे.

ठळक मुद्दे२०२ टँकरद्वारे पाणीपुरवठा मागील वर्षीच्या दमदार पावसाचा परिणाम

अकोला : सलग दोन वर्षे झालेल्या दमदार पावसामुळे राज्यात प्रकल्पांमध्ये मुबलक पाणी आहे. परिणामी, टँकर संख्येत मोठी घट झाली आहे. यावर्षी राज्यात केवळ २०२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, पाच वर्षांत प्रथमच टँकरची संख्या कमी नोंदविली गेली आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे पाणीटंचाईमध्ये चांगलीच वाढ झाली होती. ती कमी करण्यासाठी शासनाने लोकसहभाग आणि कृषी विभागांतर्गत विविध जलसंधारणाची कामे हाती घेऊन पूर्ण केली. राज्यात गेल्यावर्षी पावसाळ्यात चार ते पाच महिने चांगला पाऊस झाला. त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत झाली. विहिरीत आणि बोअरवेलमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. परिणामी, चालूवर्षी पाणीटंचाईच्या झळा कमी प्रमाणात जाणवू लागल्या आहेत. सद्य:स्थितीत राज्यात केवळ २०२ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत काही प्रमाणात टँकरची संख्या घटली असली, तरी नागरिकांनी पाण्याचे योग्य नियोजन करून त्याचा वापर कमी करण्याची गरज आहे.

 

२२ जिल्ह्यांत शून्य टँकर

राज्यात टँकरची संख्या कमी झाली आहे. यामध्ये २२ जिल्ह्यांमध्ये एकही टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची गरज अद्याप भासली नाही, तर नागपूर विभागातील सर्वच जिल्ह्यांत टँकरची संख्या शून्य आहे.

--बॉक्स--

मराठवाड्यात केवळ नऊ टँकर

गेल्या वर्षी सर्वाधिक पाणीटंचाई भासलेल्या औरंगाबाद विभागात केवळ नऊ टँकर सुरू झाले आहेत. यामध्ये हिंगोली जिल्ह्यात दोन, तर नांदेड जिल्ह्यात सात टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.

 

पाच वर्षांतील टँकर संख्या

२०१७ - ७९८

२०१८ - ९३७

२०१९ - ५१७४

२०२० - ३२०

२०२१ - २०२

 

कोकण, पश्चिम विदर्भाला पाणीटंचाईच्या झळा

पाणीटंचाई विदर्भाच्या वाट्याला पाचवीला पुजलेली आहे. राज्यात टँकरची संख्या घटली असली तरी कोकण, पश्चिम विदर्भाला पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. कोकणात ९१, पश्चिम विदर्भात ४३, नाशिक विभागात ३०, तर पुणे विभागात २९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

 

कोरोनाच्या स्थितीत दिलासादायक चित्र

सध्या राज्यात कोरोनाचे गंभीर संकट आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. कोणी व्हेंटिलेटरसाठी, तर कोणी बेडसाठी भटकत आहे. या परिस्थितीत पाणीटंचाईच्या झळा कमी प्रमाणात आहेत. त्यामुळे नागरिकांना थोडाफार दिलासा मिळत आहे.

टॅग्स :Akolaअकोलाwater scarcityपाणी टंचाई