शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

  पोषण संकल्पातील उपक्रमांनाही कोरोनाचा खोडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 11:23 IST

ठरलेल्या कालावधीत लक्ष गाठणे अशक्य दिसत आहे.

अकोला : राज्यातील बालकांचे कुपोषण रोखणे तसेच त्यांची शारीरिक, बौद्धिक वाढ होण्यासाठी पोषण २०१८ पासून सुरू असलेल्या पोषण अभियानांतर्गत येत्या २०२२ पर्यंत प्रत्येक राज्यात बुटकेपणाचे प्रमाण १० टक्के कमी करण्यासाठी राज्य शासनाने आखणी केलेल्या महाराष्ट्राचा पोषण संकल्पालाही कोरोनाचा खोडा निर्माण झाला आहे. अंमलबजावणी करणारी यंत्रणा कोरोना प्रतिबंधाच्या कामाला लागली असल्याने आता ठरलेल्या कालावधीत लक्ष गाठणे अशक्य दिसत आहे.बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, त्यामुळे होणाऱ्या बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, यासाठी महाराष्ट्र शासनाने राजमाता जिजाऊ माता, बाल आरोग्य पोषण या नावाने स्वतंत्र मिशनची स्थापना केली. मिशन सुरू करण्यासाठी गोळा केलेल्या माहितीनुसार राज्यातील ३४ टक्के बालकांची उंची त्यांच्या वयाच्या मानाने कमी असल्याचा अहवाल आहे. वयाच्या मानाने कमी उंची असलेल्यांना ‘बुटकी बालके’ असे संबोधले जाते, तसेच अपुºया पोषणामुळे त्या बुटक्या बालकांची त्यांच्या नैसर्गिक क्षमतेप्रमाणे शारीरिक व बौद्धिक वाढ होत नाही. त्याचा परिणाम आरोग्य व शिक्षणावरही होतो. त्यातून या बालकांचे शाळा गळतीचे प्रमाणही वाढते. शासनाने २०१८ सुरू केलेल्या पोषण अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे प्रत्येक राज्याला २०२२ पर्यंत दरवर्षी बुटकेपणाचे प्रमाण १० टक्के कमी करावयाचे आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने डिसेंबर २०१९ पासूनच महाराष्ट्राचा पोषण संकल्प निश्चित करून त्यातील उपाययोजना करण्याचे धोरण आखले. त्याची अंमलबजावणी सुरू होतानाच देशासह राज्यात कोरोनाचा प्रकोप वाढला. त्याचा प्रतिबंध करण्यासाठी ग्रामीण भागातील अंगणवाडीसेविका, आशा वर्कर यांनाही जुंपण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा पोषण संकल्प राबवणारी यंत्रणाच गुंतलेली असल्याने पोषण आहार संकल्पाचा उपक्रमही आता कागदावरच सुरू राहण्याची शक्यता आहे.

- पोषण आहारातील महत्त्वाचे उपक्रमशिशू पोषणासाठी पूरक आहाराचे अन्नघटक व ते भरवण्याचे धोरण ठरवणे, अंगणवाडी केंद्रात महिन्यातून एकदा समुदाय आधारित कार्यक्रमासमवेत पूर्ण पोषण आहाराचे आयोजन करणे, त्यामध्ये ६ ते १२ महिने वयोगटातील मुलांसाठी आहार तयार करणे व खाऊ घालण्याची प्रात्यक्षिके करून दाखवणे, त्या मुलांच्या घरी महिन्यातून किमान एक भेट अंगणवाडीसेविका किंवा आशा वर्कर यांच्याकडून दिली जाईल, तसेच २०२२ पर्यंत ६ ते २४ महिने वयातील किमान ५० टक्क्यांपेक्षा जास्त मुलांना वैविध्यपूर्ण आहार देण्यासाठी प्रयत्न करणे. या सर्व उपक्रमांना सध्या खीळ बसली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस