शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

सांगा कसं जगायचं... खारपाणपट्ट्यात भीषण परिस्थिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 14:45 IST

आता पाऊस येऊनही फायद्याचा नाही. त्यामुळे सांगा कसं जगायचं...,असा सवाल शेतकºयांनी शासनाला केला आहे.

- नितीन गव्हाळेअकोला: दोन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती, कर्जाचा डोंगर काही केल्या कमी होईना. यंदाचे साल तरी सुखाचे जाईल, अशी अपेक्षा असताना निसर्गाने शेतकºयांचा घात केला. हजारो रुपयांची बी-बियाणे, खते घेतली; परंतु पाऊस आलाच नाही. खरेदी केलेले बी-बियाणे, खते घरातच पडून आहेत. जमीन पेरण्याचेही काम पडले नाही. ज्या शेतकºयांनी शेतात पेरणी केली, त्यांचेही पीक हातून निसटून गेले. आता पाऊस येऊनही फायद्याचा नाही. त्यामुळे सांगा कसं जगायचं...,असा सवाल शेतकºयांनी शासनाला केला आहे.‘लोकमत’ चमूने मंगळवारी खारपाणपट्ट्यातील गावांमधील पीक परिस्थितीचा आढावा घेतला असता, वेदनादायी वास्तव पुढे आले. खारपाणपट्ट्यातील गावांमध्ये पावसाचा एक टिपूसदेखील नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. या भागातील गावांमध्ये स्मशान शांतता पसरली असून, शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पेरणीच नसल्यामुळे शेतकरी, शेतमजुराच्या हाताला कामच उरले नाही. पाऊस नाही. पेरणी नाही तर जगायचं कसं, मुलांचे शिक्षण कसे करायचे, दैनंदिन व्यवहारासाठी लागणारा पैसा कुठून आणायचा, घरखर्च कसा चालवायचा, आदी प्रश्न शेतकºयांच्या डोक्यात थैमान घालत आहेत. दोन वर्षांपासून खारपाणपट्ट्यातील शेतकºयांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यंदासुद्धा शेतकºयांवर दुष्काळसदृश स्थिती ओढवली आहे. आपातापा, एकलारा, बंधुगोटा, कपिलेश्वर, वडद, काटी-पाटी, दोनवाडा, एकलारा, अंबिकापूर, गोणापूर, दापुरा, मजलापूर, कट्यार, म्हैसांग आदी गावांमध्ये पावसाचा एकही थेंब पडला नसल्यामुळे शेतकºयांनी जमीनच पेरली नसल्याचे चित्र दिसून येते. काही भागात पेरणी आटोपली असून, पावसाअभावी मूग, सोयाबीन, तूर, कपाशीच्या पिकांवर नांगर फिरविण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. पाऊस नसल्यामुळे शेतातील पिकांची वाढ खुंटली असून, तीव्र उन्हामुळे पिके सुकत आहेत. यंदा तर शेतकºयांवर अस्मानी संकट कोसळले असून, या संकटातून शेतकºयांना बाहेर काढण्यासाठी शासनाने सर्वेक्षण करून शेतकºयांना आर्थिक मदत देण्याची मागणी जोर धरत आहे.

मूग, सोयाबीन गेले, तूर, कपाशीचे पीकही जाणार!आपातापा, अंबिकापूर, दापूर, गोणापूर, मजलापूर, कट्यार, म्हैसांग आदी भागात पाऊसच न पडल्याने शेतकऱ्यांनी शेतात पेरणीच केली नाही. काही शेतकऱ्यांनी पेरणी केली; परंतु पावसाअभावी मूग, सोयाबीनचे पीक गेले. आता तूर, कपाशीचे पीकही जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पीक जगविण्यासाठी ‘स्प्रिंकलर’ने पाणी!ज्या शेतकºयांनी मूग, सोयाबीन, तूर, कपाशीची लागवड केली, ते शेतकरी पीक जगविण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. पावसाची चिन्हे दिसत नसल्याने, पीक जगविण्यासाठी शेतकरी पूर्णा नदीतून, बोअरचे स्प्रिंकलर पाइपने पाणी देत आहेत. आज, उद्या पाऊस येईलच, अशी आशा असल्याने, अनेक शेतकºयांनी स्प्रिंकलरने शेतात पाणी देणे सुरू केले आहे.

खारपाणपट्ट्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीखारपाणपट्ट्यातील अनेक गावांमध्ये पाऊस झाला नसल्यामुळे शेतांमध्ये पेरणीच केली नसल्याचे विदारक चित्र आहे. काळेभोर शेत दृष्टीत पडत असून, शेतकºयांचे बी-बियाणे, खतेसुद्धा वाया गेले आहेत. ज्यांनी पेरणी केली, त्या शेतकºयांच्या पेरण्या उलटल्या आहेत. त्यामुळे शासनाने या गावांमधील सर्व्हे करून दुष्काळ जाहीर करावा आणि दुष्काळ निवारण करण्यासाठी उपाययोजना करून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी