शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

राष्ट्रवादीचे कॅप्टन शरद पवार बारावा गडी :   मुख्यमंत्र्यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 12:09 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवित सैन्याच्या कारवाईचा उदो-उदो केला

चिखली/ तेल्हारा : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पराभूत मानसिकतेच्या नेत्यांचा पक्ष असून, या पक्षाच्या कॅप्टनने खेळण्यापूर्वीच मी बॅटींग करणार नाही आणि बारावा गडी असल्याचे जाहीर केले, अशा शब्दात शरद पवारांना टीकेचे लक्ष्य करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्याच परिवाराची गरिबी हटली, असा घणाघाती आरोप केला.अकोल्यातील भाजपा उमेदवार संजय धोत्रे यांच्या प्रचारार्थ तेल्हारा व बुलडाण्यातील शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी चिखली येथे आयोजित सभेत त्यांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवित सैन्याच्या कारवाईचा उदो-उदो केला. मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश व देशाची सुरक्षा मजबूत झाली आहे. पाकिस्तानला समजेल अशा भाषेत उत्तर देण्यासाठी मोदींनी एअर स्ट्राइक केले व देशाचा आत्मसन्मान वाढविला, त्यामुळे मोदी हेच सक्षम पर्याय आहेत. मोदींच्या नेतृत्वामुळे देश कमजोर नाही, हे लोक आता मानायला लागल्याचे सांगत काँग्रेसचे नेते एअर स्ट्राइकचा पुरावा द्या, पुरावा द्या करत गोंधळ घालत आहेत. हे जर आधी माहीत असते तर आम्ही त्यावेळी एखाद्या मिसाईला तुम्हालाच बांधून पाठवले असते, अशी टीकादेखील त्यांनी यावेळी केली. राहुल गांधी यांनी आणलेली ‘गरिबी हटाव’ या योजनेची खिल्ली उडविली. त्यांच्या पाच पिढ्यांकडून गरिबी हटली नाही, याउलट ‘गरिबी हटाओ’च्या घोषणा देऊन त्यांनी स्वत:चीच घरे भरली, असा घणाघाती आरोप केला. यावेळी भाजपा सरकारच्या काळातील विविध योजनांचे दाखले देत विकासाच्या मुद्यावरही विरोधकांना टीका करण्याची संधी नसल्याचे स्पष्ट केले. -तर शेतकऱ्यांना पेन्शन देणारा भारत हा पहिला देशपुन्हा सत्ता मिळाल्यास वयाची ६० वर्षे पूर्ण करणाºया शेतकऱ्यांना पेन्शन लागू करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. शेतकºयांना पेन्शन सुरू करणारा भारत हा पहिला देश राहील, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसakola-pcअकोलाSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण