शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

मालेगाव तालुक्यात शिक्षक गुंतले विद्यार्थ्यांच्या शोधात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 3:22 PM

पटसंख्या कायम राखून नोकरी टिकवण्यासाठी व अतिरिक्त न ठरण्यासाठी मालेगाव तालुक्यातील शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या शोधात गुंतले असल्याचे दिसून येते. 

ठळक मुद्देग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी खासगी शाळांमध्ये जात आहेत. विद्यार्थी मिळत नसल्यामुळे शाळा बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.सध्या विद्यार्थी मिळवण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांच्या शोधात फिरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मालेगाव : बदलत्या शिक्षण प्रवाहामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शहराकडे ओघ वाढत असल्यामुळे ग्रामीण भागातील शाळांतील विद्यार्थी पटसंख्या कमी होत आहे. दरम्यान, पटसंख्या कायम राखून नोकरी टिकवण्यासाठी व अतिरिक्त न ठरण्यासाठी मालेगाव तालुक्यातील शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या शोधात गुंतले असल्याचे दिसून येते. 

बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्रातही आमुलाग्र बदल होत आहे. पूर्वीच्या तुलनेत आता शहरी भागातील शाळांना विद्यार्थी व पालक प्राधान्य देत असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागातील पालकांनाही आपली मुले इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये शिकावी असे वाटू लागले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी खासगी शाळांमध्ये जात आहेत. याचा परिणाम गावातील मराठी शाळांवर होत आहे. विद्यार्थी मिळत नसल्यामुळे शाळा बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.  त्यामुळे शाळेची मान्यता, नोकºया टिकवण्यासाठी शिक्षकांना पटसंख्या कायम राखणे गरजेचे झाले आहे. निकालानंतर काही दिवसातच शहरातील शाळांमधील प्रवेश हाउसफुल्ल झाल्याने शहरात मर्यादेपेक्षा जास्त विद्यार्थी घेण्यास शाळांचा नकार मिळत आहे. तर दुसरीकडे काही जिल्हा परिषद शाळांमधील तुकड्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे सध्या विद्यार्थी मिळवण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांच्या शोधात फिरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. विद्यार्थी मिळविण्यासाठी विविध आमिषेही पालकांना दाखविली जात आहे. पटसंख्या टिकवून ठेवण्यासाठी शिक्षकांसमोर पाचवी व आठवीचे विद्यार्थी मिळविणे हे उद्दिष्ट आहे. एकदा विद्यार्थ्यांने पाचवीत प्रवेश घेतला की दहावीपर्यंत अडचण येत नाही. म्हणूनच विद्यार्थी मिळविण्यासाठी शिक्षकांमध्ये चांगलीच स्पर्धा दिसून येत आहे. 

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांवTeacherशिक्षक