शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

शहापूर प्रकल्पासाठी खैरात; शेतकर्‍यांना मोबदल्यासाठी आखडता हात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 01:48 IST

अकोट : शहापूर धरण प्रकल्पाची किंमत १६.६१ कोटी रुपयांवरून ४६.0७ कोटींवर पोहोचली; मात्र प्रकल्पासाठी जमीन देणार्‍या शेतकर्‍यांना अल्प मोबादला देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. धरण बांधकामाचा आदेश हा ५ डिसेंबर २00५ रोजी कंत्राटदाराला देण्यात आला. या धरणाकरिता लागणार्‍या बुडीत क्षेत्रातील जमिनीची भूसंपादन प्रक्रिया डिसेंबर-२00५ सुरू करून मोबदल्याचा निवाडा हा सन २00८ मध्ये करण्यात आला आहे. धरणाची रक्कम तिप्पट वाढूनही अजून पूर्ण झालेला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना अल्प मोबदला मिळाल्याची चौकशी करण्याची गरज आहे. 

विजय शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : शहापूर धरण प्रकल्पाची किंमत १६.६१ कोटी रुपयांवरून ४६.0७ कोटींवर पोहोचली; मात्र प्रकल्पासाठी जमीन देणार्‍या शेतकर्‍यांना अल्प मोबादला देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. धरण बांधकामाचा आदेश हा ५ डिसेंबर २00५ रोजी कंत्राटदाराला देण्यात आला. या धरणाकरिता लागणार्‍या बुडीत क्षेत्रातील जमिनीची भूसंपादन प्रक्रिया डिसेंबर-२00५ सुरू करून मोबदल्याचा निवाडा हा सन २00८ मध्ये करण्यात आला आहे. धरणाची रक्कम तिप्पट वाढूनही अजून पूर्ण झालेला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना अल्प मोबदला मिळाल्याची चौकशी करण्याची गरज आहे. शिवपूर कासोद या भागात धुरर्डी नदीवर धरण बांधण्यात येत आहे. लघुपाटबंधारे बांधकाम विभागांतर्गत १५.६१ कोटी रुपयांच्या सिंचन प्रकल्पाला २७ फेब्रुवारी २00४ रोजी प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली. या कामाचा कार्यारंभ आदेश ५ डिसेंबर २00५ रोजी बियाणी नामक कंत्राटदारास देण्यात आला. सदर प्रकल्प हा सन २00८ पर्यंत पूर्ण करण्याचा कालावधी होता; परंतु १३ वर्षे उलटूनही अद्यापही  हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला नाही. धरण प्रकल्पाची किंमत वाढत गेली; मात्र भूसंपादन प्रक्रियेमध्ये शेतकर्‍यांना २00५ पासून अडकवून ठेवण्यात आले. जमिनी ताब्यात घेण्यापूर्वी कामाचे आदेश दिल्या गेले. शेतकर्‍यांना मात्र २0 ऑगस्ट २00८ मध्ये निवाडा देत मोबदला देण्यात आला. त्यामुळे धरणाची किंमत वाढली असताना २00५ पासून जमिनीची किंमत का वाढवली नाही, अल्प मोबदला का देण्यात आला, निवाडा होण्यापूर्वी धरण कामाचा आदेश कसा काय देण्यात आला, असा प्रश्न उपस्थित करीत भूसंपादन प्रक्रिया-निवाडा तसेच धरण प्रकल्पाची वाढलेली किंमत पाहता संपूर्ण भूसंपादन प्रक्रियेमध्ये गौडबंगाल झाल्याची शक्यता शेतमालकाचे शेतमजूर झालेल्या रामदास राऊत यांच्यासह प्रकल्पगस्त शेतकर्‍यांनी उपस्थित केला आहे.

जमिनी देणारे शेतकरी झाले शेतमजूर! धरण मातीचे असलेल्या या धरणाची लांबी २२८७ मीटर, तर उंची १८.६१ मीटर आहे. या धरणात ३.४४ दलघमी जलसाठा होणार असून, ३८0 हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे. या धरणाकरिता परिसरातील १२८.९५ हेक्टर भूसंपादन करण्यात आले आहे. त्यामुळे केवळ २५१ हेक्टरकरिता प्रकल्प उभारून शेतकर्‍यांना शेतमालकाचे शेतमजूर करण्यात आले आहे. शिवपूरचे रामदास राऊत यांच्या कुटुंबाची साडेदहा एकर शेती संपादित करण्यात आली. त्या मोबदल्यात त्यांना ५ लाख ३0 हजार रुपये देण्यात आले होते. शेतकर्‍याचा शेतमूजर झालेल्या राऊत कुटुंबीयांना सरकारी नोकरी देऊन वाढीव मोबदला मिळणार, ई-क्लासची जमीन मिळणार, अशी विविध आश्‍वासने त्यावेळी देण्यात आली; परंतु त्याची पूर्तता अद्यापही झाली नाही. अशातच भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळाला नसल्याने मृत्यूला कवटाळणार्‍या धर्मा पाटील यांच्यासारखी व्यथा शिवपूरच्या रामदास राऊत यांच्यासह इतर शेतकर्‍यांची झाली आहे.

प्रकल्प रखडल्याने कंत्राटदार बदलला! या धरणाचे काम बियाणी नामक कंत्राटदाराला देण्यात आले होते; परंतु २२ टक्के बिलात काम घेतले. कंत्राटदाराने मातीचे कारण पुढे करीत प्रकल्पाचे काम बंद ठेवल्याने कंत्राटदाराला ८३ लाख रुपये दंड ठोठावला होता. अखेर कंत्राटदाराचे काम बंद करून पाटबंधारे विभागाने नोव्हेंबर २0१५  पासून स्वत: अर्धवट स्थितीत असलेल्या या प्रकल्पाचे काम हाती घेतले असल्याची माहिती लघुपाटबंधारे विभागाने दिली.ं

टॅग्स :DamधरणAkola Ruralअकोला ग्रामीण