शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

वऱ्हाडातील अनुशेष यादीतील सिंचन प्रकल्प रखडलेलेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 13:51 IST

अकोला : वऱ्हाडातील अनुशेष यादीतील सिंचन प्रकल्प निधी व सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी रखडले आहेत. यात खारपाणपट्ट्यातील सिंचन प्रकल्पाचा समावेश आहे.

- राजरत्न सिरसाटअकोला : वऱ्हाडातील अनुशेष यादीतील सिंचन प्रकल्प निधी व सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी रखडले आहेत. यात खारपाणपट्ट्यातील सिंचन प्रकल्पाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १४०० कोटी रुपये तत्काळ देण्याबाबत घोषणा करू नही निधी उपलब्ध करू न देण्यात आला नाही.विभागातील १०२ प्रकल्पांची कामे व्हावी, यासाठी तत्कालीन राज्यपालांनी या प्रकल्पाचा समावेश अनुशेष यादीत केलेला आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील १० प्रकल्पांपैकी नेर-धामणा, बाळापूर तालुक्यातील कवठा बॅरेज, नया अंदुरा, शहापूर बु. आदी प्रकल्पांचा समावेश आहे. यातील नेर-धामणाचे काम सुरू झाले; पण निधी नसल्याने हे कामही कधी बंद तर कधी चालू अशी स्थिती आहे. या कामाला गती देण्याची गरज आहे. हा प्रकल्प झाल्यास खारपाणपट्ट्यातील शेती व शेतकऱ्यांना लाभ होईल; पण अनेक प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. आता तर रेतीच उपलब्ध नाही.अकोला जिल्ह्यातील अनुशेष दूर करण्याकरिता खारपाणपट्ट्यामध्ये पूर्णा (नेर-धामणा), उमा, घुंगशी बॅरेज ही मध्यम प्रकल्प व कवठा, शहापूर, नया अंदुरा व वाई (संग्राहक) हे लघू प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर २४,०४९ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होईल. म्हणूनच खारपाणपट्ट्यात सर्वप्रथम नेर-धामणा पूर्णा बॅरेजचे बांधकाम सुरू करण्यात आले. बॅरेजचे काम ९० टक्के झाले; पण अद्याप वक्रद्वाराचे काम पूर्ण व्हायचे आहे. पंप हाउस, भूमिगत पाइपलाइनचे कामही थंड बस्त्यात आहे. या सर्व पृष्ठभूमीवर केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बळीराजा जलसंजीवनी योजनेंतर्गत १४०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे खारपाणपट्ट्यातील शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. या घोषणेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. अद्याप या योजनेतील एकही पैसा मिळाला नाही. खारपाणपट्ट्यातील पाणी समुद्रासारखे खारे असल्याने शेतकºयांना गोड पाण्याची गरज आहे; पण या भागावरच अन्याय होत असल्याची शेतकरी व नागरिकांची भावना आहे.

 

कामे पूर्ण होतील त्यादृष्टीनेच काम सुरू आहे. नाबार्डकडून काही तसेच २५ टक्के केंद्रीय अर्थसाहाय्य आपणास मिळणार आहे. त्यामुळे कामे तातडीने मार्गी लागतील.- अविनाश सुर्वे, कार्यकारी संचालक,विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर.

 

टॅग्स :AkolaअकोलाVidarbhaविदर्भIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पNer-Dhamna Barrageनेरधामणा बॅरेज