शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
2
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
3
होर्मुझजवळ चीनच्या तेल टँकरवर मोठा हल्ला; अमेरिका-इराण युद्धात पहिल्यांदा असं घडलं, तणाव वाढला!
4
Nashik TCS Case: निदा खान कुठं अन् कुणासोबत होती? पोलिसांनी तिला कसं शोधलं? जाणून घ्या A टू Z माहिती
5
Robot World Record : माणसालाही हरवलं! रोबोटनं धावण्याच्या शर्यतीत मोडला जागतिक विक्रम; पाहा थरारक वेग
6
महाराष्ट्रातले साडेतीन पक्ष भाजपपुढे टिकाव धरतील?
7
आजचे राशीभविष्य, ०८ मे २०२६: मेष राशीला व्यवसायात लाभ, 'या' लोकांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहावे!
8
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
9
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
10
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
11
JNPA Port : ‘जेएनपीए’ पुन्हा ‘हाऊसफुल्ल’; पाचही टर्मिनल्समध्ये लगबग; पश्चिम आशियातील युद्धाचे ढग सरले; २२ हजार कंटेनरची हाताळणी
12
रक्ताची ‘बंगाली’ चटक; हिंसाचाराच्या आगीत होरपळणारा बंगाल
13
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
14
लोणावळ्यात धक्कादायक घटना! जन्मदात्या पित्याकडून लेकीवर अत्याचार, दीड वर्षानंतर गुन्हा दाखल
15
कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल
16
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
17
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
18
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
19
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
20
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
Daily Top 2Weekly Top 5

रेशन दुकानांमधून निकृष्ट धान्याचा पुरवठा; सडक्या मक्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:19 IST

संजय उमक मूर्तिजापूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या महाराष्ट्रात पंधरा दिवसांचा लॉकडाऊन शासनाने पुन्हा जाहीर केला आहे. याच पार्श्वभूमीवर ...

संजय उमक

मूर्तिजापूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या महाराष्ट्रात पंधरा दिवसांचा लॉकडाऊन शासनाने पुन्हा जाहीर केला आहे. याच पार्श्वभूमीवर शासनाने सामान्य लोकांना मदत म्हणून रेशनवर धान्य पुरवठा करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला शासनाकडून अतिशय निकृष्ट दर्जाचा धान्य पुरवठा होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

ग्रामीण जनतेला सध्या रेशनवर गहू, तांदूळ व मका दिला जात आहे, त्यात मका अतिशय निकृष्ट असून, कुजलेला, सडलेला व किडलेला असल्याचे दिसून आले.

यासंदर्भात तक्रार करूनही त्याची प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यात सातत्याने निकृष्ट दर्जाचे धान्य वितरित केले जात आहे. गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे सामान्य नागरिक आधीच मेटाकुटीला आला आहे, त्यामुळे त्यांना हे निकृष्ट धान्य घेतल्याशिवाय पर्याय नाही. शासनाकडूनच निकृष्ट दर्जाचे धान्य पुरविले जात असल्यामुळे नागरिकांवर सडके धान्य खाण्याची वेळ आली आहे.

कोरोनामुळे आधीच जीवनावश्यक वस्तूचे भाव गगनाला भिडले आहेत. महागाईमुळे सामान्य माणसाला जीवन जगणे कठीण झाले आहे. मागील काही महिन्यांपासून रेशन दुकानात विक्रीसाठी आलेल्या गव्हात व मक्यात मोठ्या प्रमाणात खडे, माती व भेसळयुक्त व निकृष्ट दर्जा असल्याचे आढळून आले आहे. किमान रेशनवर मिळणारे धान्यतरी चांगल्या दर्जाचे मिळावे हीच ग्रामीण जनतेची अपेक्षा असून ग्रामीण भागातील रेशन दुकानांमध्ये निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप होत असल्याचे लक्षात आले आहे; परंतु आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने व त्यात प्रचंड महागाई असल्याने ग्रामीण जनता हतबल झाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील कित्येक कुटुंबे रेशनच्या धान्यावरच उदरनिर्वाह करीत आहेत. गोरगरीब जनतेसाठी संजीवनी ठरत असलेल्या धान्यातच भेसळ होत असल्याने नागरिकांनी काय खावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महाराष्ट्र शासनाने यासंबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सामान्य जनतेची होत असलेली थट्टा थांबवावी, अशी मागणी होत आहे.

फोटो:

नागरिकांना अनेक दिवसांपासून भेसळयुक्त धान्याचे वाटप होत आहे. त्यातही मका व गहू अत्यंत निकृष्ट दर्जाचा मिळत असल्याने सामान्य नागरिकांनी सडके व कुजके धान्य खावे का, दर्जेदार धान्याचे वाटप नागरिकांना करण्यात यावे.

-शरद गवई, नागरिक खापरवाडा