शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

मानवी हक्क आयोगाचे घरोघरी न्यायदान अभियान

By admin | Updated: July 11, 2015 01:38 IST

मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष बन्नुरमठ यांच्याशी संवाद.

सिध्दार्थ आराख/बुलडाणा : आयोगाकडे आलेल्या तक्रारीचा निपटारा करण्यासाठी आणि मानवी हक्काबद्दल प्रत्येकानं संवेदनशील असलं पाहीजे, याचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी मानवी हक्क आयोगाने ह्यघरोघरी न्यायदानह्ण हे अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत विभागवार दौरे करून तक्रारींचा निपटारा त्याच ठिकाणी केला जात असल्याची माहीती मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष बन्नुरमठ यांनी दिली.

प्रश्न : मानवी हक्क आयोगाची रचना कशी असते?

महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग ही कायद्याने निर्माण केलेली स्वायत्त वैधानिक संस्था आहे. या आयोगात तीन सदस्य असतात. आयोगाचे अध्यक्ष पद हे नवृत्त मुख्य न्यायमूर्तीकडे असते. एक सदस्य जिल्हा न्यायधिश पदावर किमान सात वर्ष काम केलेला असावा, तर दुसरा सदस्य ज्याला मानवी हक्काबद्दल ज्ञान आहे किंवा त्या क्षेत्रात प्रत्यक्ष काम केल्याचा अनुभव त्याला असावा.

प्रश्न : मानवी हक्क आयोगाचे काम कसे चालते?

लोकसेवकांकडून होणार्‍या मानवी हक्कांच्या उल्लंघनावर नजर ठेवणे, त्यासंदर्भात आलेल्या तक्रारींची चौकशी करून निर्णय देणे. एखाद्या प्रकरणात स्वतंत्र चौकशी करण्यासाठी आयोगाकडे पोलिस महासंचालक, पोलिस अधिक्षक दर्जाचे अधिकारी आणि आवश्यक ती पोलीस यंत्रणा आहे. त्यामुळे चौकशी निष्पक्षपणे केली जाते. राज्य सरकारला पूर्वसुचना देवून आयोगाचे अध्यक्ष, सदस्य हे सरकारच्या अख्त्यारीत असलेल्या कारागृह, पोलिस स्टेशन, रुग्णालय येथे भेट देवून तेथील व्यवस्थेची पाहणी करू शकतात.

प्रश्न : आयोग काम करताना कोणत्या बाबीकडे विशेष लक्ष देतो?

सामाजिक दृष्टीकोण, बेकायदेशीर स्थानबध्दता आणि वेठबिगार, स्त्रीया आणि मुलांचे होणारे शोषण, शारिरीक व मानसिकदृष्ट्या अपंग व्यक्तींचे हक्क अबाधित ठेवणे, स्वास्थ्य आणि पर्यावरण, ज्येष्ठ नागरीकांचे संरक्षण आणि जनमाणसात मानवी हक्काची जागृती करणे.

प्रश्न : प्रश्न:आयोगाकडे तक्रार कशी करावी?

आयोगाकडे साध्या कागदावर मराठी, हींदी, इंग्रजी भाषेत तक्रार करता येते. त्यासाठी कोणतीही शुल्क आकारण्यात येत नाही किंवा वकिल ठेवण्याचीही गरज नाही, तक्रारदार स्वत: आयोगासमोर युक्तीवाद करू शकतो आणि गैरहजर असल्यास आयोग स्वत: तक्रारदार आहे असे समजून त्या प्रश्नाचा विचार करते.

प्रश्न : दोषी व्यक्तीला शिक्षा ठोठावण्याचे अधिकार आयोगाला आहेत काय?

मानवी हक्काच्या उलंघनास कारणीभूत ठरलेल्या व चौकशीत तसे सिध्द झालेल्या सार्वजनिक सेवेतील व्यक्तीवर कारवाई करण्याची अथवा न्यायालयीन खटला दाखल करण्याची शिफारस आयोग करू शकतो. त्यानंतरही आरोपीला संबंधीत यंत्रणेने शिक्षा न दिल्यास त्यांच्याविरुध्द न्यायालयात खटला दाखल करण्याचे अधिकार आयोगाला आहेत.