शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

सात दिवसांत खड्डे बुजवा, जलवाहिन्यांची दुरुस्ती करा!

By admin | Updated: February 23, 2015 01:58 IST

पालकमंत्र्यांचे मनपा प्रशासनाला निर्देश; शहरातील रस्ते-गटारांची केली पाहणी.

अकोला: शहरातील रस्त्यांची झालेली वाईट स्थिती आणि जलवाहिन्यांना लागलेली गळती, याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अखेर रविवारी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनाच रस्त्यावर उतरावे लागले. त्यांनी शहरातील रस्त्यांची पाहणी करून खड्डे बुजविण्याचे काम सात दिवसांत पूर्ण करण्याचे आणि जलवाहिन्यांना लागणारी गळती थांबविण्यासाठी दुरुस्तीची कामे तातडीने करण्याचे निर्देश महानगरपालिका प्रशासनाला दिले. अकोला शहरातील रस्ते खड्डेमय झाले असून, या समस्येने अकोलेकर त्रस्त झालेत. गत बुधवारी अशोक वाटिका चौकात झालेल्या अपघातात अडीच वर्षीय अथर्व नितीन उजाडे या बालकाचा मृत्यू झाला. तसेच शहरातील विविध भागात जलवाहिन्यांना गळती लागल्याने रस्त्यांवरुन पाणी वाहत आहे आणि अनेक भागात गटारे तुंबले असून, त्यामुळे गटारांचे पाणी रस्त्यांवरून वाहत आहे. या पृष्ठभूमीवर पालकमंत्री डॉ. पाटील यांनी शहरातील रस्त्यांवरील खड्डे आणि गटारांमधून रस्त्यांवर वाहणार्‍या पाण्याची पाहणी केली. त्यामध्ये जवाहरनगर चौक आणि रतनलाल प्लॉट चौक भागातील रस्ते व गटारांची पाहणी पालकमंत्र्यांनी केली. येत्या सात दिवसांत शहरातील रस्त्यांवरील खडे बुजवून, जलवाहिन्यांना लागणार्‍या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे निर्देश डॉ.पाटील यांनी मनपा प्रशासनाला यावेळी दिले. गटारांमधून रस्त्यांवर पाणी येणार नाही, यासंदर्भात तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी महापौर उज्ज्वला देशमुख, मनपा आयुक्त सोमनाथ शेटे, उपायुक्त माधुरी मडावी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

*अधिकार्‍यांना धरले धारेवर!

शहरातील जवाहरनगर चौकात गटाराचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याचे पाहून, पालकमंत्री डॉ. पाटील यांनी मनपाच्या अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. शहरातील रस्त्यांवरून गटाराचे वाहणारे पाणी आणि खड्डे ही बाब यापुढे खपवून घेतली जाणार नाही, त्यासाठी निधी कमी पडत असेल तर, तसे सांगावे, शासनाकडून निधी मिळवून देणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

*पालकमंत्र्यांसह अधिकारी रस्त्यावर!

शहरातील खड्डेमय रस्त्यांच्या समस्येने नागरिक त्रस्त झाले असून, या समस्येच्या मुद्यावर अनेकदा नागरिकांकडून तक्रारी आणि रस्त्यांवर उतरून आंदोलन केले जाते. त्यानुषंगाने शहरातील रस्ते, सांडपाणी समस्येच्या मुद्यावर पालकमंत्री डॉ.पाटील रस्त्यावर उतरून त्यांनी शहरातील रस्त्यांची पाहणी केले. पालकमंत्री रस्त्यावर उतरल्याने मनपा अधिकार्‍यांनाही रस्त्यावर उतरावे लागले.