शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

बाश्रीटाकळी ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा देण्यासाठी सोमवारी सुनावणी

By admin | Updated: May 7, 2015 02:21 IST

जिल्हाधिका-यांचे पत्र; एका जि.प. सदस्याला, दोन पं.स.सदस्यांना बाजू मांडण्यास बोलाविले.

अकोला : बाश्रीटाकळी ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा देण्यात येणार असल्यामुळे तेथील एका जिल्हापरिषद सदस्यांचे व दोन पंचायत समिती सदस्यांचे पद रद्द होणार आहे. त्यामुळे याबाबत त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी या तिन्ही लोकप्रतिनिधींना ११ मे रोजी त्यांच्या कार्यालात हजर राहण्यास एका पत्राद्वारे बजावले आहे. बाश्रीटाकळी ग्रामपंचायतची स्थापना १९५५ मध्ये झाली होती. त्यानुसार तेथील कारभार आजतागायत सुरू आहे. तथापि, राज्य शासनाने राज्यातील तहसील कार्यालय असलेल्या ठिकाणी ग्रामपंचायतींना नगरपरिषद किंवा नगरपंचायतचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बाश्रीटाकळी ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा देण्याच्या दृष्टीने नगरविकास मंत्रालयाने १ मार्च २0१४ मध्येच प्राथमिक उद्घोषणा केली होती. त्यासंदर्भात ग्रामविकास व जलसंधारण विभागाने १८ एप्रिल २0१५ रोजी काढलेला आदेश व संबंधित उपसचिवांनी १८ एप्रिल २0१५ रोजी पाठविलेले पत्र, या अन्वये बाश्रीटाकळी ग्रामपंचायतीला नगरपंचायतचा दर्जा देताना बाश्रीटाकळी जिल्हा परिषद मतदारसंघात समाविष्ट सर्व क्षेत्र बाश्रीटाकळी नगरपंचायतीत समाविष्ट होत आहे. तसेच पंचायत समितीचा बाश्रीटाकळी-१ व बाश्रीटाकळी-२ मतदारसंघात समाविष्ट सर्व क्षेत्र प्रस्तावित बाश्रीटाकळी नगरपंचायतीमध्ये समाविष्ट होत आहे. सदर क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणार्‍या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचे सदस्यत्व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या अनुक्रमे कलम २५५ व २५७ अन्वये रद्द करावे लागणार आहे. त्यामुळे तसे करण्यापूर्वी संबंधित सदस्यांची बाजू समजून घेण्याकरिता शासनाने अकोल्याच्या जिल्हाधिकार्‍यांना प्राधिकृत केले आहे.