शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पूर्व विदर्भाच्या तुलनेत रस्ते, सिंचन विकासात वर्‍हाड ८६ टक्क्यांनी मागे - डॉ. संजय खडक्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 01:44 IST

अकोला : पूर्व विदर्भाच्या तुलनेत रस्ते व सिंचन विकासात आजही वर्‍हाड ८६ टक्क्यांनी मागे आहे. हा विरोधाभास दूर करण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात अमरावती विभागाला विशेष पॅकेजची गरज आहे, अशी अपेक्षा श्री शिवाजी महाविद्यालयाचे सांख्यिकीशास्त्र विभाग प्रमुख व विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य डॉ. संजय खडक्कार यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी अर्थसंकल्पातून अमरावती विभागाच्या विकासाला गती देण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी त्यांनी पत्रातून केली आहे. 

ठळक मुद्देअमरावती विभागाला विशेष पॅकेजची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पूर्व विदर्भाच्या तुलनेत रस्ते व सिंचन विकासात आजही वर्‍हाड ८६ टक्क्यांनी मागे आहे. हा विरोधाभास दूर करण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात अमरावती विभागाला विशेष पॅकेजची गरज आहे, अशी अपेक्षा श्री शिवाजी महाविद्यालयाचे सांख्यिकीशास्त्र विभाग प्रमुख व विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य डॉ. संजय खडक्कार यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी अर्थसंकल्पातून अमरावती विभागाच्या विकासाला गती देण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी त्यांनी पत्रातून केली आहे. राज्याच्या उर्वरित भागाच्या तुलनेत विदर्भ, मराठवाडा विकासात मागासलेले प्रांत आहेत. यावर वेळोवेळी राज्य शासनाने नियुक्त केलेल्या आयोग व समित्यांनी या मागासलेपणावर बोट ठेवले आहे. मात्र, अनुशेष दूर करताना भौगोलिक क्षमतेचा विचार झाला नाही. त्यामुळे विदर्भातच पूर्व आणि पश्‍चिम या दोन विभागातील विकासाची दरी वाढत गेली. आज घडीला वर्‍हाड पूर्व विदर्भाच्या तुलनेत सिंचन, रस्ते विकासात ८६ टक्क्यांनी मागे असल्याचे चित्र आहे. हा विरोधाभास दूर करण्यासाठी येणार्‍या राज्य अर्थसंकल्पात अमरावती विभागाला विशेष पॅकेज देऊन विकासाची गती वाढविली जाऊ शकते, अशी अपेक्षा या पत्रात व्यक्त केली गेली आहे. विकासाच्या अनुशेषाबाबत १९९४ पयर्ंत १४00७ कोटींची तफावत होती. यात सर्वाधिक ६६२४ कोटींची म्हणजे ४७.६0 टक्के तफावत एकट्या विदर्भातच होती. याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आले. त्यानंतर अनुशेषाचे मापदंड बदलण्यात आले. डॉ. विजय केळकर समितीने प्रादेशिक अनुशेषावर भर न देता केवळ विविध क्षेत्रातील विकासाच्या असमतोलावरच भर दिला. त्यामुळे प्रादेशिक अनुशेष दुर्लक्षित होऊन विभागा-विभागातील विकासाची दरी वाढत आहे. राज्यातील इतर विभागांच्या तुलनेत अमरावती विभाग आर्थिक विकासात माघारला, याकडेही डॉ. खडक्कार यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. 

अमरावती विभागाचा बॅकलॉग..- आर्थिक वर्ष २0१५-१६ च्या सर्व्हेनुसार राज्याचे सरासरी दरडोई वार्षिक उत्पन्न १,४९,३९९ रुपये आहे. त्या तुलनेत अमरावती विभागाचे दरडोई वार्षिक उत्पन्न ८४,८७८ रुपये आहे. 

- जून २0१४ पयर्ंत विदर्भाचा सिंचन अनुशेष होता १0, ३३,२२0 हेक्टर. त्यातील एकट्या अमरावती विभागाचा अनुशेष आहे ९,१२,३५0 हेक्टर. विदर्भातील सिंचन अनुशेषाच्या ८८.३0 टक्के अनुशेष हा अमरावीत विभागातील आहे. 

- अमरावती विभागातील सिंचन क्षेत्र आहे २८.८३ टक्के, नागपूर विभागाचे ६५ टक्के, तर संपूर्ण महाराष्ट्राचे सरासरी सिंचन क्षेत्र आहे ५७.९१ टक्के. 

- अमरावती विभागात १९६0 ते २0१४ या काळात ८.९७ टक्के सिंचन क्षमतेत वाढ झाली. उर्वरित महाराष्ट्राची सिंचन क्षमता वृद्धी ५५.३0 टक्के आहे. 

- अमरावती विभागात कृषी पंपांचा अनुशेष मोठा आहे. राज्याच्या सरासरीच्या तुलनेत अमरावती विभागात २,५४,४१२ कृषी पंपांची आवश्यकता आहे. त्यासाठी ३१0३.८२ कोटी रुपयांची गरज भासणार आहे. 

- राष्ट्रीय रस्ता परिषदेने २0 वर्षांसाठी जिल्हानिहाय लक्ष्यांक निर्धारित केले आहे. २00१-२0२५ या काळात हा रस्ता विकास होणार आहे. या योजनेनुसार आतापयर्ंत अमरावती विभागातील निर्धारित लक्ष्यांकाच्या तुलनेत ४२,३४0.५८ पैकी २८,५५३ किलोमीटर रस्त्यांचा विकास झाला. एकूण लक्ष्यांकाच्या तुलनेत ६७ टक्केच लक्ष्य पूर्ण झाले. उर्वरित महाराष्ट्रात ९२ टक्क्यांपयर्ंत लक्ष्यांक पूर्ण झाले आहे.  

टॅग्स :Akola cityअकोला शहर