शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

चारमोळीच्या शेतकऱ्यांचे असेही दातृत्व!

By admin | Updated: May 15, 2017 00:55 IST

जलसंधारणाच्या कामांसाठी दहापैकी पाच एकर जमीन केली दान

संदीप वानखडे । लोकमत न्यूज नेटवर्कगावातील पाणी गावातच मुरावे, शेतीला पाणी उपलब्ध व्हावे, जलसंकट दूर व्हावे, या उदात्त हेतूने जलसंधारणाच्या उपचारासाठी दुर्गम आदिवासी गावातील चुलत्या-पुतण्या शेतकऱ्यांनी आपली दहापैकी पाच एकर शेती दान दिली. त्यांच्या दातृत्वाचा इतरांनी आदर्श घेण्याची गरज आहे. शेतकऱ्यांसाठी शेतीच सर्वकाही असते. त्यांचा उदरनिर्वाह शेतीवरच असतो. पातूर तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या चारमोळी गावात जंगल असल्याने तशी शेती फारच कमी. सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने निसर्गाच्या पाण्यावर येथील शेतकऱ्यांना पिके काढावी लागतात. अशातच गावाने अभिनेता आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला. गावातील सात लोकांनी या स्पर्धेचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणामुळे जलसंधारणासाठी काम करण्यासाठी ते पे्ररित झाले. त्यांनी हीच प्रेरणा इतर लोकांमध्ये जागृत केली. या जागृतीचा परिणाम एवढा झाला, की ग्रामस्थांनी पाषाण फोडून श्रमदान केले. जलसंधारणाचे उपचार करण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती. ही अडचण दूर करण्यासाठी गावातील सीताराम दगडू खुळे यांनी पाच एकरांपैकी तीन एकर, तर आकाश रामचंद्र खुळे यांनीही पाच एकरांतील दोन एकर जलसंधारणाच्या कामासाठी दान दिली. जलसंधारणाच्या कामासाठी सलग समतल चर, दगडी बांधसह इतर कामांचा समावेश होता. ही कामे झाल्यानंतर शेतीमध्ये पाणी साचणार आहे. त्यामुळे त्या जमिनीवर पीक घेता येता नाही, हे माहिती असूनही दोन्ही शेतकऱ्यांनी आपली शेती दान दिली. त्यांचे दातृत्व खरोखरच मोठे आहे. दुसऱ्यांच्या जमिनीतील एक तास आपल्याकडे खेचण्याचा हव्यास सगळीकडे असल्याचे दिसते; मात्र इतरांच्या शेतीला पाणी उपलब्ध व्हावे, त्यांना बारमाही पिके घेता यावे, या उदात्त हेतूसाठी आकाश खुळे आणि सीताराम खुळे यांनी आपली जमीन दिली. त्यांनी जमीन दिल्याने इतर शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. या शेतकऱ्यांचा आदर्श घेत गावातील महादेव किसन खुळे यांनीही आपल्या पाच एकरांपैकी एक एकर शेती सलग समतल चर निर्माण करण्यासाठी दिली आहे.पाणीटंचाई दूर होण्यासाठी दिली जमीन गावातील पाणी प्रश्न सुटावा, शेतकऱ्यांना पिकांसाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी आम्ही जमीन दान दिली आहे. जलसंधारणाची कामे झाल्यामुळे गुरांनाही पाणी उपलब्ध होईल. शेतकऱ्यांच्या विहिरींची पाणी पातळी वाढेल. तूर पिकासाठी जी पाणीटंचाई भासत होती, ती आता दूर होणार आहे. माती नाला बांधातील पाणी शेतकरी आपल्या तुरीच्या पिकासाठी वापरतील, असे सीताराम दगडू खुळे यांनी सांगितले.बांधाची निर्मिती दान मिळालेल्या जमिनीवर ग्रामस्थांनी अखंड परिश्रम करून दोन एकरांवर दगडी बांधांची निर्मिती करण्यात आली आहे, तसेच तीन एकरांवर सलग समतल चरही निर्माण करण्यात आले आहेत. महादेव खुळे यांच्या शेतातही सलग समतल चरांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे लाखो लीटर पाणी साठविल्या जाणार आहे.