शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वऱ्हाडातील जलसाठ्यात १५ दिवसांत पाच टक्के घट; आता ३५ टक्केच जलसाठा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 14:48 IST

अकोला : पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड ) पाच जिल्ह्यातील ४८४ धरणात गत १५ दिवसांत पाच टक्के घट झाली असून, आजमितीस केवळ ३५ टक्केच जलसाठा शिल्लक आहे.

ठळक मुद्देअकोलेकरांची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात तर १४.३६ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा धरणात २९.८३ टक्के जलसाठा असून, खडकपूर्णा धरणाची पातळी ३.६७ टक्के आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाण धरणात २२.२२ टक्के, सोनल मध्यम प्रकल्पात ०.८९ टक्के, तर एकबुर्जी धरणात २४.९८ टक्केच जलसाठा शिल्लक आहे.

अकोला : पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड ) पाच जिल्ह्यातील ४८४ धरणात गत १५ दिवसांत पाच टक्के घट झाली असून, आजमितीस केवळ ३५ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. अकोलेकरांची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात तर १४.३६ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणात ३.६७ टक्के, वाशिम जिल्ह्यातील सोनल प्रकल्पात ०.८९ टक्के, यवतमाळ जिल्ह्यातील पूसमध्ये १९.८२ तर अरुणावती धरणात १३.५२ टक्केच जलसाठा शिल्लक असल्याने वऱ्हाडडावरील जलसंकट गडद झाले आहे.वºहाडात मोठे, मध्यम व लघू मिळून एकूण ४८४ प्रकल्प असून, या सर्व प्रकल्पात आजमितीस ३५.३१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मागील वर्षीच्या १६ डिसेंबर रोजी हा जलसाठा ३९.७८ टक्के होता, तर नोव्हेंबरमध्ये ४९.९७ टक्के होता. यावर्षी ४ जानेवारीपर्यंत जलसाठ्यात मोठी घसरण झाली असून, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा या मोठ्या धरणात १४.३६ टक्केच जलसाठा शिल्लक होता. याच जिल्ह्यातील मोर्णा मध्यम प्रकल्पात १५.०३ टक्के, निर्गुणा ५८.४१, उमा धरणात केवळ ३.७७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. दगडपारवा धरण शून्य टक्के आहे. अकोला, बुलडाणा आणि अमरावती या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या वान धरणात सध्या ९०.१९ टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा धरणात २९.८३ टक्के जलसाठा असून, खडकपूर्णा धरणाची पातळी ३.६७ टक्के आहे. पेनटाक ळी धरणात २८.४३ टक्के जलसाठा आहे. ज्ञानगंगामध्ये ५०.०७, मसमध्ये १५.६३ टक्के, कोराडी १५.६१, पलढग ७८.०३, मन १६.४८ तोरणा २३.७० टक्के, तर उतावळी धरणात ३१.१८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाण धरणात २२.२२ टक्के, सोनल मध्यम प्रकल्पात ०.८९ टक्के, तर एकबुर्जी धरणात २४.९८ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस धरणात १९.८२ टक्के, अरुणावतीमध्ये १३.५२, तर बेंबळा धरणात १६.५९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा या मोठ्या धरणात ७०.४८ टक्के एवढा बºयापैकी जलसाठा शिल्लक आहे.

बाष्पीभवनाचा दर ३.६ मिलिमीटर!सध्या हिवाळा ऋतू असल्याने बाष्पीभवनाचा दर ३.६ मिलिमीटर एवढाच आहे. तरी जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. तापमान वाढले तर बाष्पीभवन वेग या भागात १८ मिलिमीटरपर्यंत जातो, त्यामुळे आतापासून विशेषत: पश्चिम वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यातील पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे.

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणWaterपाणीDamधरण