शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

वऱ्हाडातील जलसाठ्यात १५ दिवसांत पाच टक्के घट; आता ३५ टक्केच जलसाठा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 14:48 IST

अकोला : पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड ) पाच जिल्ह्यातील ४८४ धरणात गत १५ दिवसांत पाच टक्के घट झाली असून, आजमितीस केवळ ३५ टक्केच जलसाठा शिल्लक आहे.

ठळक मुद्देअकोलेकरांची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात तर १४.३६ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा धरणात २९.८३ टक्के जलसाठा असून, खडकपूर्णा धरणाची पातळी ३.६७ टक्के आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाण धरणात २२.२२ टक्के, सोनल मध्यम प्रकल्पात ०.८९ टक्के, तर एकबुर्जी धरणात २४.९८ टक्केच जलसाठा शिल्लक आहे.

अकोला : पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड ) पाच जिल्ह्यातील ४८४ धरणात गत १५ दिवसांत पाच टक्के घट झाली असून, आजमितीस केवळ ३५ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. अकोलेकरांची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात तर १४.३६ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणात ३.६७ टक्के, वाशिम जिल्ह्यातील सोनल प्रकल्पात ०.८९ टक्के, यवतमाळ जिल्ह्यातील पूसमध्ये १९.८२ तर अरुणावती धरणात १३.५२ टक्केच जलसाठा शिल्लक असल्याने वऱ्हाडडावरील जलसंकट गडद झाले आहे.वºहाडात मोठे, मध्यम व लघू मिळून एकूण ४८४ प्रकल्प असून, या सर्व प्रकल्पात आजमितीस ३५.३१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मागील वर्षीच्या १६ डिसेंबर रोजी हा जलसाठा ३९.७८ टक्के होता, तर नोव्हेंबरमध्ये ४९.९७ टक्के होता. यावर्षी ४ जानेवारीपर्यंत जलसाठ्यात मोठी घसरण झाली असून, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा या मोठ्या धरणात १४.३६ टक्केच जलसाठा शिल्लक होता. याच जिल्ह्यातील मोर्णा मध्यम प्रकल्पात १५.०३ टक्के, निर्गुणा ५८.४१, उमा धरणात केवळ ३.७७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. दगडपारवा धरण शून्य टक्के आहे. अकोला, बुलडाणा आणि अमरावती या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या वान धरणात सध्या ९०.१९ टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा धरणात २९.८३ टक्के जलसाठा असून, खडकपूर्णा धरणाची पातळी ३.६७ टक्के आहे. पेनटाक ळी धरणात २८.४३ टक्के जलसाठा आहे. ज्ञानगंगामध्ये ५०.०७, मसमध्ये १५.६३ टक्के, कोराडी १५.६१, पलढग ७८.०३, मन १६.४८ तोरणा २३.७० टक्के, तर उतावळी धरणात ३१.१८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाण धरणात २२.२२ टक्के, सोनल मध्यम प्रकल्पात ०.८९ टक्के, तर एकबुर्जी धरणात २४.९८ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस धरणात १९.८२ टक्के, अरुणावतीमध्ये १३.५२, तर बेंबळा धरणात १६.५९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा या मोठ्या धरणात ७०.४८ टक्के एवढा बºयापैकी जलसाठा शिल्लक आहे.

बाष्पीभवनाचा दर ३.६ मिलिमीटर!सध्या हिवाळा ऋतू असल्याने बाष्पीभवनाचा दर ३.६ मिलिमीटर एवढाच आहे. तरी जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. तापमान वाढले तर बाष्पीभवन वेग या भागात १८ मिलिमीटरपर्यंत जातो, त्यामुळे आतापासून विशेषत: पश्चिम वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यातील पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे.

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणWaterपाणीDamधरण