वैनगंगा ते नळगंगा प्रकल्प ठरणार विदर्भासाठी उपलब्धी, हैदराबादच्या राष्ट्रीय जलविकास प्राधिकरणाचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2017 04:10 PM2017-11-14T16:10:19+5:302017-11-14T16:11:10+5:30

अमरावती- पूर्व विदर्भात गोदावरीच्या (वैनगंगा) खो-यातील अतिरिक्त पाणी पश्चिम विदर्भात अतितुटीच्या तापी (नळगंगा) नदीच्या खो-यात वळविण्याचे नियोजन असलेला प्रकल्प विदर्भासाठी संजीवनी ठरणार आहे.

Wainganga to Nalganga project, achievement for Vidarbha, report of the National Water Development Authority of Hyderabad | वैनगंगा ते नळगंगा प्रकल्प ठरणार विदर्भासाठी उपलब्धी, हैदराबादच्या राष्ट्रीय जलविकास प्राधिकरणाचा अहवाल

वैनगंगा ते नळगंगा प्रकल्प ठरणार विदर्भासाठी उपलब्धी, हैदराबादच्या राष्ट्रीय जलविकास प्राधिकरणाचा अहवाल

Next

गजानन मोहोड
अमरावती- पूर्व विदर्भात गोदावरीच्या (वैनगंगा) खो-यातील अतिरिक्त पाणी पश्चिम विदर्भात अतितुटीच्या तापी (नळगंगा) नदीच्या खो-यात वळविण्याचे नियोजन असलेला प्रकल्प विदर्भासाठी संजीवनी ठरणार आहे. ना. नितीन गडकरी यांच्या अखत्यारीतील मंत्रालयांतर्गत ४४० किमी लांबीचा हा प्रकल्प विदर्भातील सहा जिल्ह्यांत मार्गक्रमित होऊन बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात सोडण्याचे प्रस्तावित आहे.

२५ राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्या निर्देशानुसार १९१२ दलघमी पाणी विचारात घेऊन वैनगंगा ते नळगंगा नदी जोड कालव्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल हैदराबाद येथील राष्ट्रीय जलविकास प्राधिकरण (एनडब्लूडीए)द्वारा तयार करण्यात येत आहे. एकूण ४४० किमी लांबीचा हा जोड कालवा गोसीखुर्द प्रकल्पाच्या उजव्या तिरावरून सुरू होऊन त्याची संरेखा भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम व अकोला या जिल्ह्यांतून मार्गक्रमित होऊन शेवटी बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पस्थळी सोडण्याचे नियोजन आहे. यापूर्वीच झालेल्या एनडब्लूडीएचे मुख्य अभियंत्यांच्या उपस्थितीत विदर्भातील जलसंपदा विभागाच्या बैठकीत या जोड कालवा प्रकल्पाला अंशत: मान्यता देण्यात आली आहे.

गोसीखुर्द ते काटेपूर्णा प्रकल्पापर्यंतच्या ३०८ किमीच्या जोड कालव्याचे सर्वेक्षण एनडब्लुडीएद्वारा पूर्ण झालेले आहे. या जोड कालव्याची अमरावती जिल्ह्यात लांबी ९० किमीची आहे. यामध्ये निम्न वर्धा प्रकल्पाजवळ ५० किमीची लिफ्ट प्रस्तावित आहे, तर २३८ ते ४४० किमी दरम्यानची लांबी अकोला व बुलडाणा जिल्ह्यात आहे. यामध्ये काटेपूर्णा प्रकल्पाजवळ २७ मीटर उंचीची लिफ्ट राहणार आहे. या प्रकल्पात अमरावतीच्या जिल्ह्यात ९० किमी लांबीच्या दरम्यान आठ साठवण तलाव प्रस्तावित आहेत. या साठवण तलावामध्ये ४६२. ७८ दलघमी साठ्याच्या माध्यमातून अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील ७० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. अकोला व बुलडाणा जिल्ह्यातील २०२ किमी लांबीच्या अंतरात सहा साठवण तलावांतील ३९६.३७ दलघमी साठ्याच्या माध्यमातून ३४ हजार हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे.

३०८ किमी लांबीचे संरेखा सर्वेक्षण पूर्ण
राष्ट्रीय जलविकास प्राधिकरण, हैदराबादद्वारा साखळी क्रमांक ३०८ किमी पर्यंतच्या जोड कालव्याच्या साखळी क्र. ३०८ पर्यंतचे संरेखा सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. ४४० किमीपर्यंत म्हणजेच नळगंगापर्यंतच्या संरेखाला ७ जानेवारीला झालेल्या मुख्य अभियंत्याच्या बैठकीत तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. जोड कालव्याच्या बाजूला असलेल्या कालव्यातून उपलब्ध होणा-या पाण्यामधून रबीच्या सिंचनासाठी पाणीसाठा निर्माण करण्यासाठी मंडळांतर्गत सर्वेक्षण अन्वेषण विभागास मानचित्र तयार करून स्थळे निश्चितीसाठी सांगण्यात आले आहे.

केंद्राच्या अखत्यारीतील हा नदीजोड प्रकल्प पश्चिम विदर्भासाठी नवसंजीवनी देणारा असल्याची चर्चा रविवारी ना.नितीन गडकरी यांच्याशी झाली. प्रकल्पाची किंमतवाढ झाल्याने यावर तोडगा काढला जाईल, गडकरी यांनी सांगितले.
- निवेदिता चौधरी,
प्रदेश सचिव, भाजपा

Web Title: Wainganga to Nalganga project, achievement for Vidarbha, report of the National Water Development Authority of Hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.