शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
4
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
5
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
6
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
7
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
8
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
9
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
10
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
11
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
12
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
13
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
14
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
15
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
16
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
17
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
18
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
19
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
20
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
Daily Top 2Weekly Top 5

‘शास्ती अभय याेजनेला मुदतवाढ द्या!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:20 IST

नगराेत्थान याेजनेतून हाेतील विकासकामे अकाेला : सुवर्णजयंती नगराेत्थान याेजनेअंतर्गत शासनाकडून महापालिकेला साडेचार काेटींचा निधी प्राप्त झाला आहे. यामध्ये मनपाने ...

नगराेत्थान याेजनेतून हाेतील विकासकामे

अकाेला : सुवर्णजयंती नगराेत्थान याेजनेअंतर्गत शासनाकडून महापालिकेला साडेचार काेटींचा निधी प्राप्त झाला आहे. यामध्ये मनपाने ३० टक्के आर्थिक हिस्सा जमा केला आहे. दरम्यान, विकासकामांचे प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आले हाेते. लवकरच या याेजनेतून शहरातील विकासकामांना प्रारंभ केला जाणार आहे.

सांडपाण्यामुळे साथराेगांत वाढ

अकाेला : शहरात ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. पाण्याचा निचरा हाेण्यासाठी नाल्यांची व्यवस्था नसल्यामुळे साचलेल्या पाण्यातून दुर्गंधी पसरली आहे. यामुळे लहान मुले व वयाेवृद्ध नागरिकांमध्ये साथराेग पसरल्याचे दिसत आहे. खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी दिसून येत आहे. घाण, अस्वच्छतेमुळे डासांची पैदास वाढली असून साफसफाईकडे मनपाचे दुर्लक्ष हाेत आहे.

मच्छी मार्केटमध्ये अस्वच्छता

अकाेला : माेहम्मद अली चाैक परिसरातील मच्छी मार्केटमध्ये व्यावसायिकांकडून मांसाचे तुकडे उघड्यावर फेकले जातात. या ठिकाणी मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून नियमित साफसफाई हाेत नसल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण झाली असून दुर्गंधी पसरली आहे. यामुळे स्थानिक रहिवासी वैतागले आहेत. यासंदर्भात उत्तर झाेन कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले आहे.

स्वच्छतेला खाे; नाले, गटारे तुंबली

अकाेला : मनपाच्या आस्थापनेवरील सफाई कर्मचाऱ्यांना प्रशासकीय प्रभागातील तसेच पडीक प्रभागातील नाले, सार्वजनिक जागा, रस्त्यांची साफसफाई करण्याची जबाबदारी साेपविण्यात आली आहे. परंतु सफाई कर्मचाऱ्यांवर मनपाच्या आराेग्य निरीक्षकांचे कवडीचेही नियंत्रण नाही. यामुळे कर्मचाऱ्यांनी साफसफाईकडे पाठ फिरवल्याने शहरात सर्वत्र नाले, गटारे तुंबली आहेत.

टायमर बिघडले; पथदिवे बंद

अकाेला : शहरात माेठा गाजावाजा करून एलईडी पथदिवे उभारण्यात आले आहेत. प्रमुख मार्गांवरील पथदिव्यांचे टायमर बिघडल्याने पथदिवे रात्री बंद तर दिवसा सुरू राहत असल्याचा प्रकार पाहावयास मिळत आहे. गांधी राेड, लाेखंडी पूल, हरिहरपेठ ते वाशिम बायपास चाैक आदी भागात नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. मनपाचा विद्युत विभाग व संबंधित कंत्राटदार झाेपेत आहे का, असा सवाल उपस्थित हाेत आहे.

साेशल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष

अकाेला : शहरात मागील काही दिवसांपासून काेराेना विषाणूची लागण झालेल्या रुग्णसंख्येत लक्षणीय घसरण झाल्याचे समाेर आले आहे. परंतु अद्यापही काेराेनाची लाट लक्षात घेता नागरिकांनी स्वत:ची काळजी घेणे अपेक्षित आहे. तसे न करता नागरिक सार्वजनिक ठिकाणी गर्दी करीत असून यादरम्यान साेशल डिस्टन्सिंगचा विसर पडला आहे. ताेंडाला रुमाल किंवा मास्क न लावता नागरिक खुलेआम फिरत आहेत.