शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

जलपुनर्भरण, वृक्षसंवर्धन राखेल पर्यावरण संतुलन

By admin | Updated: June 5, 2014 21:04 IST

पर्यावरण दिनापासून जल, माती, वृक्ष लागवड व संवर्धनावर प्रत्येकाने भर देण्याची गरज व्यक्त होत आहे.

अकोला : पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब मूलस्थानी जिरवावा लागणार असून, वृक्ष लागवड व संवर्धन करावे लागणार आहे. यामुळे प्रचंड प्रमाणात होणारा पर्यावरणाचा र्‍हास थांबवण्यास मदत होणार आहे. त्यासाठी या पर्यावरण दिनापासून जल, माती, वृक्ष लागवड व संवर्धनावर प्रत्येकाने भर देण्याची गरज आहे. पर्यावरणाचे म्हणजेच पंचमहाभूताचे संरक्षण होय, यामुळे झाडा-झुडपाचे खर्‍या अर्थाने संरक्षण होते. यासाठी पावसाचे पाणी व वाहून जाणार्‍या मातीच्या व्यवस्थापनासंबंधी प्रत्येकाला काळजी घ्यावी लागणार आहे. आताच्या घडीला भूपृष्ठावर मातीचा भाग आहे. त्यावर एक लाख घन किलोमीटर पाऊस पडतो. यातील ४२ हजार घन किलोमीटर पाणी सरळ समुद्रात वाहून जाते. हे पाणी उताराच्या दिशेने वाहतांना जमीन, शेतीतील माती मोठ्या प्रमाणात वाहून नेते, मोठ्या प्रमाणात मातीची धूप होते. यामुळे तलावात गाळ साचतो. नदी, नाले उथळ होतात. पर्यावरण परिस्थितीमध्ये तसेच जमिनीच्या भरावामध्ये मोेठे बदल होतात. परिणामी जंगल, वने, वनस्पती नष्ट होऊ लागतात. मोठ्या प्रमाणात जमीन बोडखी होते. यामुळे पर्यावरणाचा र्‍हास होतो. यासाठी पडणारा पाऊस शिवारातल्या शिवारात जिरवावा लागतो. त्यामुळे अनेक प्रश्न सोपे होतात. पावसाच्या पाण्याचे यथोचित संवर्धन होते. आजमितीस भुपृष्ठावरील पाणी बघितल्यास हे पाणी नद्यापेक्षा १० पटीने जास्त सरोवर व तलावात आहे. म्हणूनच यापुढे तलाव व सरोवरांचे संवर्धनदेखील करावे लागणार आहे. यासाठी पावसासोबत वाहून येणारा गाळ या तलाव, सरोवरात जाता कामा नये याची काळजी घ्यावी लागणार आहे. पर्यावरण संतुलनासाठी पाणी हे मूळ आहे. म्हणजेच पाण्याचेच महत्त्व अधिक आहे.

**साधे उपाय

नदी खोर्‍यात पाणी तर अडवावेच शिवाय प्रत्येकाने यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतींनी गावातील पाणी गावातच अडवून जिरवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रत्येक घराचं पाणी अडवून जिरवावे लागेल. शेतीत उपाययोजना करू न जलसंवर्धन करणे आता काळाची गरज आहे. त्यासाठी शक्य तेवढे उपाय एकत्रितपणे करण्याचा कार्यक्रम आखावा लागणार आहे.

**कारखान्यामुळे प्रदूषण

कारखान्यातून निघणारे वेगवेगळे वायू, धुरामुळे प्रदूषण वाढले आहे. या प्रदूषणामुळे वातावरणात कार्बनडाय ऑक्साईड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे वृक्षापासून वातावरणात सोडल्या जाणार्‍या प्राणवायुची कार्यक्षमता कमी होते. त्याचे दीर्घ प्रतिकूल परिणाम मानव व प्राण्यांच्या आरोग्यावर होत आहेत.