शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाच्या जाचक अटीमुळे पदवीधर मतदानापासून वंचित

By admin | Updated: May 7, 2015 02:18 IST

सिनेट नोंदणीसाठी पदवी अनिवार्य

अकोला : विद्यापीठात सिनेट सदस्यांच्या निवडणुका होत असतात. या निवडणुकीत मतदान करण्यासाठी नोंदणीकरिता विद्यार्थ्यांना पदवीची प्रत देणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यावरही एक वर्षांपर्यंत पदवी मिळत नाही. त्यामुळे हजारो विद्यार्थी सिनेटच्या मतदानापासून वंचित राहतात. महाराष्ट्र युनिव्हर्सिटी अँक्ट १९९४ मधील कलम ९९ नुसार राज्यातील विद्यापीठातील पदवीधरांना नोंदणीकृत मतदारसंघात नावाची नोंदणी करता येते. या कलमामध्ये साध्या, सोप्या व सरळ पद्धतीने नाव नोंदविण्याची तरतूद आहे. नोंदणीसाठी पदवीच असावी, असा कुठेही उल्लेख नसताना कलम ९९ चा आधार घेऊन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या तरतुदींना जाचक स्वरूप देण्याचा प्रयत्न करून पदवी अनिवार्य करण्यात आली आहे. मूळ कायद्याच्या कलम ९९ नुसार पात्रतेविषयी कायद्यामध्ये नोंदणीकृत पदवीधर होण्यासाठी पदवीच असावी, असा कुठेही उल्लेख नाही. मात्र, त्यानंतरही विद्यापीठाच्या तरतुदीनुसार नोंदणीसाठी फक्त पदवीच असावी असे म्हटले आहे. एका जाचक अटीमुळे विद्यापीठाचे हजारो पदवीधर त्यांचे नाव नोंदविण्यापासून वंचित आहेत. विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यावरही केवळ पदवी नसल्यामुळे त्याच्या नावाची नोंद घेण्यात येत नाही. विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेच्या आधारावर त्यांच्या नावाची नोंद विद्यापीठात करायला हवी. अंतिम यादी जाहीर होण्यापूर्वी आपण विद्यार्थ्यांच्या नामांकन नोंदणी क्रमांकाच्या आधारे तो पदवीधर आहे की नाही, याची सहज पडताळणी करायला हवी. त्यानंतर सदर व्यक्ती अपात्र असल्यास अंतिम यादीत त्याचे नाव समाविष्ट करायला नको. असे केल्यास विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही व लोकशाहीत तो मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहणार नाही.