शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट ग्रामच्या बक्षिसांनी रोखला डिजिटल इंडियाचा मार्ग

By admin | Updated: July 17, 2017 03:20 IST

जिल्हा परिषदेने स्मरणपत्र देत केली निधीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: स्मार्ट ग्राम योजनेतील तालुका आणि जिल्हा स्तरावर बक्षीस वितरणासाठी शासनाकडून सात महिन्यानंतरही निधी न मिळाल्याने जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने शासनाला स्मरणपत्र देत निधी उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. जिल्हा परिषदेकडे प्राप्त ३४ लाख रुपये वाटपासाठी ठाणे जिल्हा परिषदेकडे वर्ग केलेला निधी मिळाल्याशिवाय हा निधी मुक्त होत नसल्याचीही अडचण आहे. केंद्र शासनाकडून ‘डिजिटल इंडिया’चे ढोल बडवले जात असताना त्यासाठी तयार असलेल्या ग्रामपंचायतींना बक्षिसांची रक्कम न देण्याचा करंटेपणाही केला जात असल्याचे चित्र आहे.स्मार्ट ग्राम योजनेची सुरुवात डिसेंबर २०१६ पासून झाली. त्यामध्ये सहभागी गावांची तालुका स्तरावर निवड करण्यात आली. त्या गावांना २६ जानेवारी रोजीच बक्षीस वितरण करण्याचे ठरले होते; मात्र निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे बक्षीस वितरण पुढे ढकलले. त्यानंतर जिल्हास्तरीय गावांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच १ मे महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम बक्षीस वितरणासाठी निश्चित झाला. या कार्यक्रमात संंबंधित पालकमंत्र्यांच्या हस्ते ग्रामपंचायतींना रोख बक्षिसांसह प्रमाणपत्र वितरण करण्याचे शासनाने आधीच बजावले होते. त्याचवेळी राज्यात १०४ कोटींची गरज असताना त्यातील केवळ दहा कोटी ५६ लाख रुपयेच शासनाने दिले. त्यामुळे महाराष्ट्र दिनी ग्रामपंचायतींना प्रमाणपत्रावर समाधान मानावे लागले. आधीचे पाच आणि त्यानंतर तीन महिने उलटले तरीही बक्षिसांची रक्कम जिल्हा परिषदांना मिळालेली नाही. प्रथम गावाला १० ते ४० लाखांचे रोख बक्षीस शासनाने स्मार्ट ग्राम योजनेत ग्रामपंचायतींना बक्षिसांची रक्कमही ठरवून दिली. त्यामध्ये तालुक्यातून प्रथम ग्रामपंचायतींना १० लाख रुपये, तर जिल्हा स्तरावर निवड झालेल्या ग्रामपंचायतीला ४० लाख रुपये रोख बक्षीस दिले जाते. निधीसाठी सातत्याने मागणीग्रामपंचायतींची निवड करून त्यांना २६ जानेवारी रोजी बक्षीस वितरणाचेही ठरले आहे; मात्र आचारसंहितेमुळे बक्षीस वितरण लांबले. त्यानंतर १ मे महाराष्ट्र दिनी संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते बक्षीस देण्याचे ठरले असतानाही त्यासाठी निधी देण्यात शासनानेच हात आखडता घेतला. बक्षिसांसाठी ७० लाख रुपये निधीच मिळत नसल्याने जिल्हा परिषदांना त्याबाबत सातत्याने शासनाला स्मरणपत्र देत मागणी करावी लागत आहे.स्मार्ट गावे तालुका स्मार्ट ग्राममध्ये अकोला तालुक्यातील म्हातोडी, बाळापूर- खिरपुरी बुद्रूक, पातूर- बेलुरा बुद्रूक, बार्शीटाकळी-धाबा, मूर्तिजापूर-जितापूर खेडकर, अकोट-धारेल, तेल्हारा- खापरखेड ही गावे १० लाखांच्या बक्षिसासाठी पात्र आहेत. निधीच नसल्याने जिल्हा स्तरावर निवड प्रक्रियेबाबतही माहिती उपलब्ध नाही.