शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: केरळमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी, ९६ जागांवर घेतली आघाडी
2
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
3
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
4
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
5
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
6
बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
7
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
8
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
9
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
10
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
11
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
12
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
13
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
14
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
15
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
16
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
17
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
18
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
19
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
20
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:19 IST

मूर्तिजापूर : गत तीन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. यंदाही गत ...

मूर्तिजापूर : गत तीन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. यंदाही गत आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पिके पाण्याखाली आली असून, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाने उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

एसडीओंना दिलेल्या निवेदनानुसार, तालुक्यातील शेतकरी सतत तीन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे आर्थिक अडचणीत सापडला आहे. या वर्षीही झालेल्या पावसामुळे नदी व नाल्याकाठची शेती पूर्णपणे खरडून गेली असून, काही शेतांमध्ये पाणी साचलेले आहे. त्यामुळे मूग, सोयाबीन, तूर, उडीद या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष अरविंद कोकाटे यांनी उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनावर शहर अध्यक्ष शरद हजबे, उपाध्यक्ष हरीभाऊ वानखडे, विवेक शिंदे, सचिन शिंदे, मुन्ना नाईकनवरे, संदीप चौढाळे, पत्रकार विलास नसले, गणेश म्हसाये, अमोल ढोक, नगरसेवक सचिन देशमुख, राजेंद्र काळे, गणेश मोरे, सुनील ढवळे, गजानन मोरे, आशिष कोकाटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

---------------------------------

...अन्यथा शेतकऱ्यांच्या हितासाठी देणार लढा!

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या डोक्यावर बँकेच्या कर्जाचे ओझे, पाल्यांच्या शि‌क्षणाची जबाबदारी अशा प्रकारची अनेक संकटे उभी आहेत. शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला असून, हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे. अन्यथा अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा उभारण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.