शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
5
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
6
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
7
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
8
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
9
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
10
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
11
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
12
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
13
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
14
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
15
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
16
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
17
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
18
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
19
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
20
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!

पश्चिम वऱ्हाडातील जलसाठ्यात घट; सात धरणांचा जलसाठा शून्य टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 3:21 PM

अकोला: पश्चिम वऱ्हाडातील तीन जिल्ह्यातील सात धरणातील जलसाठा शून्य टक्के असून, उर्वरित पाच धरणातील जलसाठा संपण्याच्या मार्गावर आहे.

अकोला: पश्चिम वऱ्हाडातील तीन जिल्ह्यातील सात धरणातील जलसाठा शून्य टक्के असून, उर्वरित पाच धरणातील जलसाठा संपण्याच्या मार्गावर आहे. यात सर्वाधिक भीषण परिस्थिती बुलडाणा जिल्ह्यातील आहे. दरम्यान, वऱ्हाडातील पाच जिल्ह्यात केवळ १०.५५ टक्के जलसाठा शिल्लक आहे.वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यात पाच मोठे व १४ मध्यम सिंचन (धरण) प्रकल्प आहेत. यातील बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी व खडकपूर्णा मोठ्या धरणातील जलसाठा शून्य टक्के असून, नळगंगा धरणात केवळ ६.६६ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. या जिल्ह्यातील मस, कोरडी व तोरणा मध्यम प्रकल्पांची जलपातळी शून्य टक्के आहे. उर्वरित ज्ञानगंगा धरणात ४.६८ टक्के, पलढग ६.९२ टक्के, मन १२.६५ टक्के तर उतावळी धरणात १६.५७ टक्के जलसाठा आहे. अकोला शहराची जीवनरेखा बार्शीटाकळी तालुक्यातील काटेपूर्णा मोठ्या धरणात केवळ ६.६६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. तेल्हारा तालुक्यातील वान धरणात २५.२६ टक्के जलसाठा आहे. याच जिल्ह्यातील निर्गुणा मध्यम प्रकल्पात शून्य टक्के, उमा शून्य टक्के, घुंगशी बॅरेज शून्य टक्के जलसाठा असून, मोर्णा धरणात आजमितीस ९.६२ टक्के जलसाठा आहे. वाशिम जिल्ह्यात तीन मध्यम प्रकल्प असून, सोनल धरणातील जलसाठा शून्य टक्के आहे. अडाणमध्ये ३.३८ तर एकबुर्जी धरणात ४.८५ टक्केच जलसाठा शिल्लक आहे.

वऱ्हाडातील पाच जिल्ह्यात १०.५५ टक्केच जलसाठावऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती पाच जिल्ह्यात ९ मोठे, २४ मध्यम व ४६९ लघू प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पात २४ जून रोजी १०.५५ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाDamधरणwater scarcityपाणी टंचाईbuldhanaबुलडाणाwashimवाशिम