शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

CoronaVirus : अकोल्यातील व्यापार क्षेत्र कोलमडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 11:15 AM

आगामी काळात केंद्र व राज्य शासनापुढे या संकटातून या क्षेत्राला सावरण्याचे आव्हान आहे.

- राजेश शेगोकार

अकोला : आधीच आर्थिक मंदीचा सामना करत असलेले उद्योग व व्यापार क्षेत्र कारोना अन् लॉकडाउनमुळे धोक्यात आले आहे. कोरानाचा सामना करण्यासाठी सरकारने वेळीच घेतलेला लॉकडाउनचा हा निर्णय हा अतिशय उपयुक्त ठरत असल्याचे दिसत आहे; मात्र या लॉकडाउनचे मोठे परिणाम सर्वच क्षेत्रावर होणार असून, व्यापार व उद्योग क्षेत्राची आर्थिक घडीच विस्कटली जाण्याची शक्यता आहे. आगामी काळात केंद्र व राज्य शासनापुढे या संकटातून या क्षेत्राला सावरण्याचे आव्हान आहे.लॉकडाउन सुरू असताना ग्रामीण भागासह शहरातील असंघटित कामगार, व्यापारी, कष्टकरी, मजूर वर्ग आता पुढे कसे होईल, या चिंतेने ग्रासलेले दिसत आहेत. अनेकांनी बँकांचे कर्ज घेतलेले आहे. त्याचे हप्ते भरण्याची अडचण होत आहे. दुसरीकडे या सर्वांना रोजगार पुरविणारे मोठे व्यापारीही संकटात आले आहेत. कष्टकरी, कामगार यांच्यासाठी शासनाने १ लाख ७० हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले. त्यात रेशन मिळणार असले तरी इतर फायदे हे नोंदणीकृत मजूरवर्गासोबतच असंघटित कामगारांना मिळणे अपेक्षित होते. रेशन मिळाले तरी भाजीपाला, साखर-चहापत्ती, तेल व वीज बिल, मोबाइल, घरभाडे आदी इतर घरखर्चासाठी रोख पैसा लागणार आहे. ही समस्या एकदम जीवनावश्यक नसली तरी याने दैनंदिन जीवन विस्कळीत होणार आहे.अकोल्यातील व्यापार क्षेत्रावर ३ हजार २२५ कोटीचे कर्जअकोल्याची व्यापार व उद्योग क्षेत्र हे पश्चिम वºहाडातील सर्वात मोठे उद्योग क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये लावण्यात आलेल्या भांडवलापोटी व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कर्जाची उचल केली आहे. एका अंदाजानुसार येथील उद्योग व्यापार क्षेत्रावर तब्बल ३ हजार २२५ कोटीचे कर्ज असल्याची माहिती आहे. त्यामुळे हे क्षेत्रच ठप्प झाल्यामुळे या कर्जाची मुद्दल व व्याज उभारण्याचे मोठे आव्हान या क्षेत्रावर आहे.

दुकान भाड्यापोटी ७० कोटीचा खर्चशहर व जिल्हाभरातील व्यापारांची सर्वच दुकाने मालकीची नाहीत तसेच अतिक्रमणामध्ये लावण्यात येणारी दुकाने व हातगाड्या यांचीही अवैध भाडे वसुली सुरूच असते. अशा एकूण भाड्यापोटी तब्बल ६० ते ७० कोटीचा खर्च होत असतो.

हमाल, मजूरही बेरोजगारलॉकडाउनमुळे खासगी कर्मचारी, कामगार, हमाल हेसुद्धा अडचणीत आले आहेत. बाहेर जाता येत नाही अन् घरी बसून पोट भरत नाही अशा विचित्र अवस्थेत बेरोजगारीचे मोठे संकट त्यांच्यापुढे उभे आहे. अनेकांनी घर, दुचाकी, चारचाकी, व्यक्तिगत, व्यापारी कर्ज काढले असून, त्यांच्या हप्त्याचा भरणा कसा होणार, हाही मोठा प्रश्न आहे.

आधी सर्वांचे आरोग्य महत्त्वाचे आहे, तरच इतर क्षेत्र राहतील. त्यामुळे या लॉकडाउनला सर्व व्यापार, उद्योग क्षेत्र सहकार्य करत आहे. हा लॉकडाउन जेव्हा संपेल तोपर्यंत हे क्षेत्र पूर्णत: कोलमडून जाईल. त्यासाठी अनेक अपेक्षा आहेत; मात्र तूर्तास बँकांच्या कर्जखात्यांना ‘एनपीए’च्या नियमातून किमान दोन महिने सवलत देणे गरजेचे आहे.- वसंत बाछुका, उद्योजक, अकोला 

 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस